शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद; अरुंधती रॉय यांच्या सूचनेवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 06:16 IST

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अरुंधती रॉय यांचे भाषण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता येईल, अशी तरतूद करण्याची गरज  आहे,  अशी सूचना प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी केली आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने प्रेस  क्लब ऑफ इंडियामध्ये आयोजित कार्यक्रमात अरुंधती रॉय यांचे भाषण झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, राजा-महाराजांचा जमाना आता संपला आहे. एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता आले पाहिजे. एकदा हे पद भूषविल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला या पदावर काम करण्याची संधी द्यायला हवी. यावेळी त्यांनी कुणाही व्यक्तीचे नाव घेतले नाही. त्या म्हणाल्या, मोदी सरकारने दहशतवादाची व्याख्या बदलली असून सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा सारख्या बुद्धिजीवींना दहशतवादी ठरविले आहे. यूएपीए या कायद्याचा दुरुपयोग करून निरपराध व्यक्तींना अनेक महिन्यांपासून तुरुंगात कोंडले.

या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावा लागेल, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कृषी कायदे मागे घ्यावे लागले त्याचप्रमाणे एनआरसीचा कायदाही मागे घ्यावा लागेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते.   

टॅग्स :prime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकार