शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अरुंधती रॉय यांनी 'त्या' वक्तव्याबाबत मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 12:44 IST

अरुंधती रॉय यांनी 2011 मध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल लेखिका अरुंधती रॉय यांनी माफी मागितली आहे. जवळपास नऊ वर्षापूर्वी म्हणजेच 2011मध्ये अरुंधती रॉय यांनी केलेल्या वक्तव्याचा जुना व्हिडीओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन अरुंधती रॉय यांना नेटिझन्सच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, अरुंधती रॉय यांनी 'द प्रिंट'ला दिलेल्या मुलाखतील म्हटले आहे की, 'आपण सर्वजण आयुष्यात एखाद्यावेळी चुकून असे बोलतो, जे मुर्खपणाचे असते. चुकीचे असते. जर माझ्या या वक्तव्यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण झाला असेल तर मी याबाबत माफी मागते.'  

अरुंधती रॉय यांनी 2011 मध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की, 'काश्मीर, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड यासारख्या राज्यामध्ये आपल युद्ध करत आहोत. 1947 पासून आपण काश्मीर, तेलंगना, गोवा, पंजाब, मणिपूर, नागालँडमध्ये लढत आहोत. भारत एक असा देश आहे, ज्याने लष्कराला आपल्या लोकांच्या विरोधात तैनात केले. पाकिस्तानने सुद्धा असे लष्काराला आपल्या लोकांविरोधात उभे केले नाही.' 

याचबरोबर, पूर्वोत्तर राज्यांमध्ये आदिवासी, काश्मीरमध्ये मुस्लीम, पंजाबमध्ये शीख आणि गोव्यात ख्रिश्चनांविरुद्ध भारतीय राज्ये लढत आहेत. असे वाटते जणू हा उच्चवर्णीय हिंदूंचाच देश आहे, असे अरुंधती रॉय यांनी म्हटले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून अरुंधती रॉय यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन अरुंधती रॉय यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे अरुंधती रॉय यांनी अखेर माफी मागितली आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल