शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

अखेर अरुंधती रॉय यांनी 'त्या' वक्तव्याबाबत मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 12:44 IST

अरुंधती रॉय यांनी 2011 मध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल लेखिका अरुंधती रॉय यांनी माफी मागितली आहे. जवळपास नऊ वर्षापूर्वी म्हणजेच 2011मध्ये अरुंधती रॉय यांनी केलेल्या वक्तव्याचा जुना व्हिडीओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन अरुंधती रॉय यांना नेटिझन्सच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, अरुंधती रॉय यांनी 'द प्रिंट'ला दिलेल्या मुलाखतील म्हटले आहे की, 'आपण सर्वजण आयुष्यात एखाद्यावेळी चुकून असे बोलतो, जे मुर्खपणाचे असते. चुकीचे असते. जर माझ्या या वक्तव्यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण झाला असेल तर मी याबाबत माफी मागते.'  

अरुंधती रॉय यांनी 2011 मध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की, 'काश्मीर, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड यासारख्या राज्यामध्ये आपल युद्ध करत आहोत. 1947 पासून आपण काश्मीर, तेलंगना, गोवा, पंजाब, मणिपूर, नागालँडमध्ये लढत आहोत. भारत एक असा देश आहे, ज्याने लष्कराला आपल्या लोकांच्या विरोधात तैनात केले. पाकिस्तानने सुद्धा असे लष्काराला आपल्या लोकांविरोधात उभे केले नाही.' 

याचबरोबर, पूर्वोत्तर राज्यांमध्ये आदिवासी, काश्मीरमध्ये मुस्लीम, पंजाबमध्ये शीख आणि गोव्यात ख्रिश्चनांविरुद्ध भारतीय राज्ये लढत आहेत. असे वाटते जणू हा उच्चवर्णीय हिंदूंचाच देश आहे, असे अरुंधती रॉय यांनी म्हटले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून अरुंधती रॉय यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन अरुंधती रॉय यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे अरुंधती रॉय यांनी अखेर माफी मागितली आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल