शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

अरुणाचल आमचाच, चीनला सुनावले खडे बोल; केंद्र सरकारने फटकारले, आक्षेप फेटाळून लावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 5:30 AM

अरुणाचल प्रदेशचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात दौरा केला होता. अरुणाचल प्रदेश आमचा असून, भारताच्या हालचालींमुळे हा प्रश्न आणखी जटिल होणार आहे, असेही चीनने म्हटले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या नुकत्याच केलेल्या दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला होता. या भूमिकेबद्दल भारताने चीनने खडे बोल सुनावले आहेत. अरुणाचल हा भारताचाच अविभाज्य भाग होता व भविष्यातही तो राहील, असे केंद्र सरकारने चीनला ठणकावून सांगितले आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेश हा आमचाच अविभाज्य भाग आहे ही भारताची ठाम भूमिका आहे व ती वेळोवेळी चीनला सांगण्यात आली आहे. या भारताच्या नेत्यांनी केलेला दौरा किंवा त्या भागात केलेली विकासकामे यांना चीन नेहमी आक्षेप घेतो. 

अरुणाचल प्रदेशचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात दौरा केला होता. अरुणाचल प्रदेश आमचा असून, भारताच्या हालचालींमुळे हा प्रश्न आणखी जटिल होणार आहे, असेही चीनने म्हटले होते. अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने सातत्याने केला आहे.

‘चीनने काहीही म्हटले, तरी वस्तुस्थिती बदलणार नाही’

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, चीनने काहीही आक्षेप घेतले तरी वस्तुस्थिती काही बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे व तो कायम राहील. भारतातील नेते अन्य राज्यांप्रमाणे अरुणाचल प्रदेशचाही दौरा करत असतात.

‘तणावामुळे कोणाचाच फायदा झाला नाही’

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील सीमाप्रश्नावरून भारत व चीनमध्ये गेल्या चार वर्षांपासून तणाव निर्माण झाला आहे. त्याचा दोन्ही देशांना काहीही फायदा झालेला नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. 

या सीमाप्रश्नावर योग्य तोडगा काढण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. मात्र, या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दोन्ही देशांनी परस्परांचा सन्मान राखून करार करायला हवा व नियंत्रण रेषेला मान्यता द्यायला हवी, असे एस. जयशंकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार