शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

अरुणाचलमध्ये काँग्रेस संकटात - मुख्यमंत्र्यांसह ४३ आमदार नव्या पक्षात

By admin | Updated: September 17, 2016 04:19 IST

मुख्यमंत्री बनलेल्या पेमा खांडू यांनी ४३ आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसची सोबत सोडून पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशमध्ये विलीन झाल्याची घोषणाही केली

शीलेश शर्मा, नवी दिल्ली/इटानगर काँग्रेस पक्षाला शुक्रवारी अरुणाचल प्रदेशमधील सरकार गमवावे लागले. नुकतेच मुख्यमंत्री बनलेल्या पेमा खांडू यांनी ४३ आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसची सोबत सोडून पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशमध्ये (पीपीए) विलीन झाल्याची घोषणाही केली. यामुळे अप्रत्यक्ष का असेना भारतीय जनता पार्टीची तेथे सत्ता असेल. काँग्रेस या राजकीय भूकंपाला तोंड देत आहे.काँग्रेसचे प्रभारी महासचिव सी. पी. जोशी यांना आपल्या पक्षात बंडखोरी होत असल्याची कुणकुणही लागली नाही. जेव्हा बंडखोरीची वार्ता पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विशेष म्हणजे पूर्वोत्तर राज्यांत जोशी जेथे कुठे प्रभारी आहेत तेथे अंतर्गत असंतोषाने टोक गाठले आहे.

अरुणाचल प्रदेशात झालेल्या या बंडखोरीनंतर काँग्रेसने कशीबशी बाजू सावरताना मोदी सरकार आणि भाजपवर हल्ला केला. राज्यात पुन्हा निवडणुका घ्या, अशी मागणीही केली. पक्षाचे नेते रणदीप सूरजेवाला आणि जोशी यांनी असा युक्तिवाद केला की सगळेच आमदार हे काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडून आले होते, लोकांनी काँग्रेसला मते दिली होती म्हणून आता नव्याने निवडणूक घ्यायला हवीच. लोकांनी काँग्रेसला कौल दिला होता पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशला नाही. काँग्रेसने नबाम तुकी यांना दूर करून पेमा खांडू यांना मुख्यमंत्री बनविले होते. आज तेच तुकी काँग्रेससोबत असून इतर सगळे आमदार पेमा खांडू यांच्यासोबत पीपीएच्या तंबूत दाखल झाले आहेत.अरुणाचलमध्ये दुसऱ्यांदा काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. पहिले बंड २०१५मध्ये झाले होते. तेव्हा कालिको पुल २४ आमदारांसोबत स्थानिक पक्ष पीपीएमध्ये दाखल झाले होते. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले. तेथे काँग्रेसला सरकार तर पुन्हा मिळाले; परंतु बहुमत सिद्ध करण्यास मुख्यमंत्री नबाम तुकी यांना पदावरून दूर करावे लागले. बंडखोरांच्या दडपणामुळे दोरजी यांचे चिरंजीव पेमा खांडू यांना मुख्यमंत्रिपद द्यावे लागले. काँग्रेसचा भाजपावर आरोप... या बंडखोरीला काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनाच जबाबदार धरले आहे. मोदी देशाच्या संघरचनेला खिळखिळे करीत आहेत. योजना आयोगाला बंद पाडून निति आयोगाच्या नावावर राज्यांना केंद्राकडून दिला जाणारा निधी राजकीय कारणांसाठी खर्च होत आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये याच पैशांच्या आधारे काँग्रेसमध्ये बंडखोरी घडवून आणली व तो कट मोदी आणि शाह यांनी रचला होता, असा काँग्रेसचा आरोप आहे.