शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

अरुणाचलमध्ये काँग्रेस संकटात - मुख्यमंत्र्यांसह ४३ आमदार नव्या पक्षात

By admin | Updated: September 17, 2016 04:19 IST

मुख्यमंत्री बनलेल्या पेमा खांडू यांनी ४३ आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसची सोबत सोडून पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशमध्ये विलीन झाल्याची घोषणाही केली

शीलेश शर्मा, नवी दिल्ली/इटानगर काँग्रेस पक्षाला शुक्रवारी अरुणाचल प्रदेशमधील सरकार गमवावे लागले. नुकतेच मुख्यमंत्री बनलेल्या पेमा खांडू यांनी ४३ आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसची सोबत सोडून पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशमध्ये (पीपीए) विलीन झाल्याची घोषणाही केली. यामुळे अप्रत्यक्ष का असेना भारतीय जनता पार्टीची तेथे सत्ता असेल. काँग्रेस या राजकीय भूकंपाला तोंड देत आहे.काँग्रेसचे प्रभारी महासचिव सी. पी. जोशी यांना आपल्या पक्षात बंडखोरी होत असल्याची कुणकुणही लागली नाही. जेव्हा बंडखोरीची वार्ता पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विशेष म्हणजे पूर्वोत्तर राज्यांत जोशी जेथे कुठे प्रभारी आहेत तेथे अंतर्गत असंतोषाने टोक गाठले आहे.

अरुणाचल प्रदेशात झालेल्या या बंडखोरीनंतर काँग्रेसने कशीबशी बाजू सावरताना मोदी सरकार आणि भाजपवर हल्ला केला. राज्यात पुन्हा निवडणुका घ्या, अशी मागणीही केली. पक्षाचे नेते रणदीप सूरजेवाला आणि जोशी यांनी असा युक्तिवाद केला की सगळेच आमदार हे काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडून आले होते, लोकांनी काँग्रेसला मते दिली होती म्हणून आता नव्याने निवडणूक घ्यायला हवीच. लोकांनी काँग्रेसला कौल दिला होता पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेशला नाही. काँग्रेसने नबाम तुकी यांना दूर करून पेमा खांडू यांना मुख्यमंत्री बनविले होते. आज तेच तुकी काँग्रेससोबत असून इतर सगळे आमदार पेमा खांडू यांच्यासोबत पीपीएच्या तंबूत दाखल झाले आहेत.अरुणाचलमध्ये दुसऱ्यांदा काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. पहिले बंड २०१५मध्ये झाले होते. तेव्हा कालिको पुल २४ आमदारांसोबत स्थानिक पक्ष पीपीएमध्ये दाखल झाले होते. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले. तेथे काँग्रेसला सरकार तर पुन्हा मिळाले; परंतु बहुमत सिद्ध करण्यास मुख्यमंत्री नबाम तुकी यांना पदावरून दूर करावे लागले. बंडखोरांच्या दडपणामुळे दोरजी यांचे चिरंजीव पेमा खांडू यांना मुख्यमंत्रिपद द्यावे लागले. काँग्रेसचा भाजपावर आरोप... या बंडखोरीला काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनाच जबाबदार धरले आहे. मोदी देशाच्या संघरचनेला खिळखिळे करीत आहेत. योजना आयोगाला बंद पाडून निति आयोगाच्या नावावर राज्यांना केंद्राकडून दिला जाणारा निधी राजकीय कारणांसाठी खर्च होत आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये याच पैशांच्या आधारे काँग्रेसमध्ये बंडखोरी घडवून आणली व तो कट मोदी आणि शाह यांनी रचला होता, असा काँग्रेसचा आरोप आहे.