शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 14:08 IST

काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना अरुण जेटली यांच्या मुलाने प्रत्युत्तर दिले आहे.

Rahul Gandhi on Arun Jaitley: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे काँग्रेसकडून राष्ट्रीय कायदेशीर परिषदचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात कृषी कायद्यांबद्दल बोलताना दिवंगत माजी मंत्री अरुण जेटली यांच्यावर गंभीर आरोप केले. शेतकरी आंदोलनादरम्यान अरुण जेटली यांना धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर लगेचच अरुण जेटली यांच्या मुलाने प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी मतांवरून कोणालाही धमकावणे माझ्या वडिलांच्या स्वभावात नव्हते असं रोहन जेटली यांनी म्हटलं.

देशाच्या शेती क्षेत्रात संबधित तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यात आले होते. शेतकऱ्याकंडून दिल्लीच्या वेशींवर वर्षभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं.  शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये ११ बैठका झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे दहा महिन्यांनी केंद्र सरकारने कायदे रद्द केले होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. शनिवारी परिषदेमध्ये बोलताना त्यांनी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर गंभीर आरोप केला.

"मला आठवतय जेव्हा मी कृषी कायद्यांविरुद्ध लढत होतो, तेव्हा अरुण जेटलीजींना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी मला सांगितले की जर मी सरकारला विरोध करत राहितो आणि कृषी कायद्यांविरुद्ध लढत राहिलो तर आम्हाला तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल. त्यानंतर मी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटलं की मला वाटत नाही की तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही कोणाशी बोलताय," असं राहुल गांधी  म्हणाले.

राहुल गांधींच्या आरोपानंतर माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांनी एक्स पोस्टवरुन प्रत्युत्तर दिलं. "राहुल गांधी आता दावा करतात की माझे दिवंगत वडील अरुण जेटली यांनी त्यांना शेती कायद्यांवरून धमकावले होते. मी त्यांना आठवण करून देतो की, माझ्या वडिलांचे २०१९ मध्ये निधन झाले. शेती कायदे २०२० मध्ये लागू करण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विरोधी मतांवरून कोणालाही धमकावणे माझ्या वडिलांच्या स्वभावात नव्हते. ते एक कट्टर लोकशाहीवादी होते आणि नेहमीच एकमत निर्माण करण्यावर विश्वास ठेवायचे. जर अशी परिस्थिती उद्भवली असती, जसे राजकारणात अनेकदा होते, तर त्यांनी तोडगा काढण्यासाठी सर्वांना चर्चेला बोलवलं असतं. आपल्यासोबत नसलेल्यांबद्दल राहुल गांधी जाणीवपूर्वक बोलले तर मला आवडेल. त्यांनी मनोहर पर्रिकरजींसोबतही असेच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता," असं रोहन जेटली म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीArun Jaitleyअरूण जेटलीFarmers Protestशेतकरी आंदोलन