शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 14:08 IST

काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना अरुण जेटली यांच्या मुलाने प्रत्युत्तर दिले आहे.

Rahul Gandhi on Arun Jaitley: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे काँग्रेसकडून राष्ट्रीय कायदेशीर परिषदचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात कृषी कायद्यांबद्दल बोलताना दिवंगत माजी मंत्री अरुण जेटली यांच्यावर गंभीर आरोप केले. शेतकरी आंदोलनादरम्यान अरुण जेटली यांना धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर लगेचच अरुण जेटली यांच्या मुलाने प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी मतांवरून कोणालाही धमकावणे माझ्या वडिलांच्या स्वभावात नव्हते असं रोहन जेटली यांनी म्हटलं.

देशाच्या शेती क्षेत्रात संबधित तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यात आले होते. शेतकऱ्याकंडून दिल्लीच्या वेशींवर वर्षभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं.  शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये ११ बैठका झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे दहा महिन्यांनी केंद्र सरकारने कायदे रद्द केले होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. शनिवारी परिषदेमध्ये बोलताना त्यांनी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर गंभीर आरोप केला.

"मला आठवतय जेव्हा मी कृषी कायद्यांविरुद्ध लढत होतो, तेव्हा अरुण जेटलीजींना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी मला सांगितले की जर मी सरकारला विरोध करत राहितो आणि कृषी कायद्यांविरुद्ध लढत राहिलो तर आम्हाला तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल. त्यानंतर मी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटलं की मला वाटत नाही की तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही कोणाशी बोलताय," असं राहुल गांधी  म्हणाले.

राहुल गांधींच्या आरोपानंतर माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांनी एक्स पोस्टवरुन प्रत्युत्तर दिलं. "राहुल गांधी आता दावा करतात की माझे दिवंगत वडील अरुण जेटली यांनी त्यांना शेती कायद्यांवरून धमकावले होते. मी त्यांना आठवण करून देतो की, माझ्या वडिलांचे २०१९ मध्ये निधन झाले. शेती कायदे २०२० मध्ये लागू करण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विरोधी मतांवरून कोणालाही धमकावणे माझ्या वडिलांच्या स्वभावात नव्हते. ते एक कट्टर लोकशाहीवादी होते आणि नेहमीच एकमत निर्माण करण्यावर विश्वास ठेवायचे. जर अशी परिस्थिती उद्भवली असती, जसे राजकारणात अनेकदा होते, तर त्यांनी तोडगा काढण्यासाठी सर्वांना चर्चेला बोलवलं असतं. आपल्यासोबत नसलेल्यांबद्दल राहुल गांधी जाणीवपूर्वक बोलले तर मला आवडेल. त्यांनी मनोहर पर्रिकरजींसोबतही असेच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता," असं रोहन जेटली म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीArun Jaitleyअरूण जेटलीFarmers Protestशेतकरी आंदोलन