शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

५ वर्षांत १४ राज्यांत ‘इसिस’च्या १२७ समर्थकांना केली अटक; ‘एनआयए’ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 06:17 IST

महाराष्ट्रातून १२ हस्तक जेरबंद

नवी दिल्ली : अत्यंत कर्मठ अशा सलाफी इस्लामी विचारसरणीचा अवलंब करून जगात इस्लामी सत्ता स्थापन करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘इस्लामी स्टेट’ (इसिस) या निरंकुश दहशतवादी संघटनेच्या एकूण १२७ समर्थकांना सन २०१४ पासून देशाच्या १४ राज्यांमधून अटक केली गेल्याची माहिती ‘राष्ट्रीय तपासी यंत्रणे’ने (एनआयए) दिली आहे.

‘एनआयए’च्या सूत्रांनी सांगितले की, एकूण २८ प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून त्यासंबंधीचे खटले विविध टप्प्यांवर प्रलंबित आहेत. ‘इसिस’चे सर्वादिक म्हणजे ३३ समर्थक तमिळनाडूतून पकडले गेले. या संघटनेचे १२ हस्तक महाराष्ट्रातून जेरबंद केले गेले.

पकडल्या गेलेल्या या बहुतांश हस्तकांनी ‘इसिस’च्या विखारी प्रचाराला बळी पडून स्थानिक पातळीवर आपापले गट स्थापन केले होते. पण यातील सामायिक दुवा म्हणजे या सर्वांचे सूत्रधार ‘इसिस’च्या खलिफांसाठी काम करणारे विदेशी होते. तपासातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली ती अशी की, दहशतवादी विचारांनी तरुणांची माथी भडकाविणे, त्यांची भरती करणे, प्रशिक्षण देणे, त्यांना विविध प्रकारची कामे नेमून देणे व प्रत्यक्षात ती कामे करून घेणे या सर्वांसाठी ‘इसिस’च्या म्होरक्यांनी इंटरनेटचा फार प्रभावीपणे वापर केला. भारतातील व परदेशातील इस्लामी धर्मप्रचारकांची इंटरनेटवर उपलब्ध असलेली भाषणे ऐकून आपण ‘इसिस’च्या प्रभावाखाली आल्याची कबुली अटक झालेल्या सर्वांनीच दिली. त्यापैकी अनेकांनी आता परागंदा होऊन मलशियात वास्तव्य करणारे धर्मप्रचारक व ‘इस्लामिक रीसर्च फौंडेशन’चे संस्थापक डॉ. झाकिर नाईक यांच्या भाषणांनी प्रभावित झाल्याचा उल्लेख केला. नाईक यांच्याविरुद्ध भारतात खटले सुरु आहेत.अटक संख्यातमिळनाडू ३३उत्तर प्रदेश १९केरळ १७तेलंगणा १४महाराष्ट्र १२कर्नाटक ८दिल्ली ७उत्तराखंड ४प. बंगाल ४जम्मू-काश्मीर ३राजस्थान २गुजरात २बिहार १मध्य प्रदेश १

टॅग्स :ISISइसिस