शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

अर्णव गोस्वामींच्या चॅनलला २० लाखांचा दंड; 'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाची कारवाई

By मोरेश्वर येरम | Updated: December 23, 2020 11:42 IST

'यूके'मधील हिंदी भाषिकांपर्यंत 'रिपब्लिक भारत' वाहिननीचं प्रसारण पोहोचविण्यासाठीचं लायसन्स असलेल्या 'वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क'ला 'यूके'च्या प्रसारण मंडळानं २० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे.

ठळक मुद्देअर्णव गोस्वामी यांच्या 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीला दणका'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाकडून २० लाखांचा दंडपाकिस्तान विरोधात द्वेष भावना पसरविण्याचा ठपका

नवी दिल्ली'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या 'रिपब्लिक भारत' या हिंदी वृत्तवाहिनीला 'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाने २० लाखांचा दंड ठोठावला आहे. पाकिस्तानी लोकांबद्दल द्वेष आणि त्याचा प्रचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

'यूके'मधील हिंदी भाषिकांपर्यंत 'रिपब्लिक भारत' वाहिननीचं प्रसारण पोहोचविण्यासाठीचं लायसन्स असलेल्या 'वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क'ला 'यूके'च्या प्रसारण मंडळानं २० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. एखाद्या समाजाबद्दल किंवा द्वेषाची भावना निर्माण होईल असे कार्यक्रम यापुढे वाहिनीवर चालवले जाणार नाहीत याची लेखी हमी देखील देण्याचे आदेश 'रिपब्लिक'ला देण्यात आले आहेत. 

अर्णव गोस्वामी यांच्या 'पूछता है भारत' या टीव्ही शोमध्ये ६ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या चर्चेबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गोस्वामी यांच्याकडून पाकिस्तानी नागरिकांवर वारंवार हल्ला आणि त्यांच्याविरोधात समाजात द्वेष पसविण्याचं काम केल्याचं 'ऑफकॉम'ने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये ऑगस्ट २०१९ पासून 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीचं प्रसारण सुरू आहे. या दरम्यान 'पूछता है भारत' या कार्यक्रमावर यूकेच्या प्रसारण नियामक मंडळाचं सातत्यानं लक्ष होतं. दैनंदिन पातळीवर हा कार्यक्रम चालवला जात असून त्याचं भाषांतर करुन आता लक्ष ठेवलं जाणार असल्याचं ऑफकॉमने म्हटलं आहे. 

याआधीही २२ जुलै २०१९ रोजी भारताच्या 'मिशन चांद्रयान-२' बाबतच्या शोमध्ये अर्णब गोस्वामी यांच्यासोबत तीन भारतीय आणि तीन पाकिस्तानी पाहुणे चर्चेसाठी बोलविले होते. या चर्चेत भारताच्या अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबाबत पाकिस्तानशी तुलना केली गेली. भारताविरोधात पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया केल्या जातात असा आरोप  देखील यामध्ये करण्यात आला, अशी नोंद ऑफकॉमने केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये कलम ३७० च्या मुद्द्यावरुन तणावाची परिस्थिती असतानाच अशा टेलिव्हिजन कार्यक्रमांचं आयोजन करुन तणावात भर टाकण्याचं काम केलं गेलं, असा ठपका 'रिपब्लिक भारत'वर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRepublic TVरिपब्लिक टीव्ही