शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अर्णव गोस्वामींच्या चॅनलला २० लाखांचा दंड; 'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाची कारवाई

By मोरेश्वर येरम | Updated: December 23, 2020 11:42 IST

'यूके'मधील हिंदी भाषिकांपर्यंत 'रिपब्लिक भारत' वाहिननीचं प्रसारण पोहोचविण्यासाठीचं लायसन्स असलेल्या 'वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क'ला 'यूके'च्या प्रसारण मंडळानं २० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे.

ठळक मुद्देअर्णव गोस्वामी यांच्या 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीला दणका'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाकडून २० लाखांचा दंडपाकिस्तान विरोधात द्वेष भावना पसरविण्याचा ठपका

नवी दिल्ली'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या 'रिपब्लिक भारत' या हिंदी वृत्तवाहिनीला 'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाने २० लाखांचा दंड ठोठावला आहे. पाकिस्तानी लोकांबद्दल द्वेष आणि त्याचा प्रचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

'यूके'मधील हिंदी भाषिकांपर्यंत 'रिपब्लिक भारत' वाहिननीचं प्रसारण पोहोचविण्यासाठीचं लायसन्स असलेल्या 'वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क'ला 'यूके'च्या प्रसारण मंडळानं २० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. एखाद्या समाजाबद्दल किंवा द्वेषाची भावना निर्माण होईल असे कार्यक्रम यापुढे वाहिनीवर चालवले जाणार नाहीत याची लेखी हमी देखील देण्याचे आदेश 'रिपब्लिक'ला देण्यात आले आहेत. 

अर्णव गोस्वामी यांच्या 'पूछता है भारत' या टीव्ही शोमध्ये ६ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या चर्चेबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गोस्वामी यांच्याकडून पाकिस्तानी नागरिकांवर वारंवार हल्ला आणि त्यांच्याविरोधात समाजात द्वेष पसविण्याचं काम केल्याचं 'ऑफकॉम'ने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये ऑगस्ट २०१९ पासून 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीचं प्रसारण सुरू आहे. या दरम्यान 'पूछता है भारत' या कार्यक्रमावर यूकेच्या प्रसारण नियामक मंडळाचं सातत्यानं लक्ष होतं. दैनंदिन पातळीवर हा कार्यक्रम चालवला जात असून त्याचं भाषांतर करुन आता लक्ष ठेवलं जाणार असल्याचं ऑफकॉमने म्हटलं आहे. 

याआधीही २२ जुलै २०१९ रोजी भारताच्या 'मिशन चांद्रयान-२' बाबतच्या शोमध्ये अर्णब गोस्वामी यांच्यासोबत तीन भारतीय आणि तीन पाकिस्तानी पाहुणे चर्चेसाठी बोलविले होते. या चर्चेत भारताच्या अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबाबत पाकिस्तानशी तुलना केली गेली. भारताविरोधात पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया केल्या जातात असा आरोप  देखील यामध्ये करण्यात आला, अशी नोंद ऑफकॉमने केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये कलम ३७० च्या मुद्द्यावरुन तणावाची परिस्थिती असतानाच अशा टेलिव्हिजन कार्यक्रमांचं आयोजन करुन तणावात भर टाकण्याचं काम केलं गेलं, असा ठपका 'रिपब्लिक भारत'वर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRepublic TVरिपब्लिक टीव्ही