शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सर्व आघाड्यांवर लढण्यास लष्कर सज्ज

By admin | Updated: June 9, 2017 03:49 IST

सर्व आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानकडून असलेले बाह्य धोके आणि देशांतर्गत सुरक्षितता अबाधित राखणे अशा सर्व आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना जनरल रावत यांनी या सज्जतेस ‘अडीच आघाड्यांची सज्जता’ असे संबोधले. मात्र लष्कराची ही सिद्धता कोणताही ठराविक देश डोळ््यापुढे ठेवून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.जनरल रावत म्हणाले की, एकाच वेळी अनेक आघाड्यांचा मुकाबला करण्यास भारताची तयारी असली तरी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचे (युद्धाखेरीज) इतरही परिणामकारक मार्ग उपलब्ध असतात. याच संदर्भात, गेल्या ४० वर्षांत भारत-चीन सीमेवर एकही गोळी झाडण्याची कधी वेळ आलेली नाही, या पंतप्रधानांच्या विधानाचा त्यांनी संदर्भ दिला.लष्करप्रमुख म्हणाले की, सैन्यदलाच्या गरजांची सरकारला जाणीव आहे. त्यासाठी सरकारचा लष्करास संपूर्ण पाठिंबा आहे. ‘मेक इन इंडिया’चांगली कल्पना आहे. त्याचे दृष्य परिणाम दोन-तीन वर्षांत मिळतील. जगभरातील लष्करी दळे त्यांच्या शस्त्रायुधांचे गुणोत्तर ३०:४०:३० असे ठेवत असते. यात ३० टक्के शस्त्रसामुग्री अत्याधुनिक तर ४० टक्के आधुनिकीकरणाच्या टप्प्यात असते. >डायर म्हटल्याने दुखावलो नाहीबुद्धिजीवी पार्थ चटर्जी यांनी आपली तुलना जालियानवाला बाग हत्याकांड घडवून आणणाऱ्या जनरल डायर यांच्याशी केल्याने आपल्याला बिलकूल वाईट वाटले नाही, असे जनरल रावत म्हणाले. ते म्हणाले की, मी लष्करी अधिकारी आहे व उठसूठ कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही. अशा गोष्टींसाठी तयारी ठेवावीच लागते. शेवटी चांगले-वाईट लोक ठरवत असतात. बहुसंख्य लोक जे ठरवतात तेच बरोबर ठरत असते.पर्वतीय युद्धासाठी सैन्यबलपर्वतीय युद्धासाठी ‘१७ स्ट्राइक कॉर्पस््’ नावाचे खास सैन्यबल उभारण्यात येत आहे, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले. या कामी काहीसा विलंब झाल्याचे मान्य करत ते म्हणाले की, हे खूप गुंतागुंतीचे काम असल्याने वेळ लागणे स्वाभाविकही आहे. या सैन्यदलासाठी सध्या भरती सुरू आहे. भरती झाल्यापासून जवानास युद्धभूमीवर तैनातीसाठी हरतऱ्हेने तयार करण्यासाठी तीन वर्षांचा वेळ लागतोच.