शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सर्व आघाड्यांवर लढण्यास लष्कर सज्ज

By admin | Updated: June 9, 2017 03:49 IST

सर्व आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानकडून असलेले बाह्य धोके आणि देशांतर्गत सुरक्षितता अबाधित राखणे अशा सर्व आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना जनरल रावत यांनी या सज्जतेस ‘अडीच आघाड्यांची सज्जता’ असे संबोधले. मात्र लष्कराची ही सिद्धता कोणताही ठराविक देश डोळ््यापुढे ठेवून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.जनरल रावत म्हणाले की, एकाच वेळी अनेक आघाड्यांचा मुकाबला करण्यास भारताची तयारी असली तरी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचे (युद्धाखेरीज) इतरही परिणामकारक मार्ग उपलब्ध असतात. याच संदर्भात, गेल्या ४० वर्षांत भारत-चीन सीमेवर एकही गोळी झाडण्याची कधी वेळ आलेली नाही, या पंतप्रधानांच्या विधानाचा त्यांनी संदर्भ दिला.लष्करप्रमुख म्हणाले की, सैन्यदलाच्या गरजांची सरकारला जाणीव आहे. त्यासाठी सरकारचा लष्करास संपूर्ण पाठिंबा आहे. ‘मेक इन इंडिया’चांगली कल्पना आहे. त्याचे दृष्य परिणाम दोन-तीन वर्षांत मिळतील. जगभरातील लष्करी दळे त्यांच्या शस्त्रायुधांचे गुणोत्तर ३०:४०:३० असे ठेवत असते. यात ३० टक्के शस्त्रसामुग्री अत्याधुनिक तर ४० टक्के आधुनिकीकरणाच्या टप्प्यात असते. >डायर म्हटल्याने दुखावलो नाहीबुद्धिजीवी पार्थ चटर्जी यांनी आपली तुलना जालियानवाला बाग हत्याकांड घडवून आणणाऱ्या जनरल डायर यांच्याशी केल्याने आपल्याला बिलकूल वाईट वाटले नाही, असे जनरल रावत म्हणाले. ते म्हणाले की, मी लष्करी अधिकारी आहे व उठसूठ कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही. अशा गोष्टींसाठी तयारी ठेवावीच लागते. शेवटी चांगले-वाईट लोक ठरवत असतात. बहुसंख्य लोक जे ठरवतात तेच बरोबर ठरत असते.पर्वतीय युद्धासाठी सैन्यबलपर्वतीय युद्धासाठी ‘१७ स्ट्राइक कॉर्पस््’ नावाचे खास सैन्यबल उभारण्यात येत आहे, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले. या कामी काहीसा विलंब झाल्याचे मान्य करत ते म्हणाले की, हे खूप गुंतागुंतीचे काम असल्याने वेळ लागणे स्वाभाविकही आहे. या सैन्यदलासाठी सध्या भरती सुरू आहे. भरती झाल्यापासून जवानास युद्धभूमीवर तैनातीसाठी हरतऱ्हेने तयार करण्यासाठी तीन वर्षांचा वेळ लागतोच.