शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
4
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
5
“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
6
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
7
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
8
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
9
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
10
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
11
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
12
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
13
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
14
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
15
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
16
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
17
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
18
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
19
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
20
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर

सर्व आघाड्यांवर लढण्यास लष्कर सज्ज

By admin | Updated: June 9, 2017 03:49 IST

सर्व आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानकडून असलेले बाह्य धोके आणि देशांतर्गत सुरक्षितता अबाधित राखणे अशा सर्व आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना जनरल रावत यांनी या सज्जतेस ‘अडीच आघाड्यांची सज्जता’ असे संबोधले. मात्र लष्कराची ही सिद्धता कोणताही ठराविक देश डोळ््यापुढे ठेवून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.जनरल रावत म्हणाले की, एकाच वेळी अनेक आघाड्यांचा मुकाबला करण्यास भारताची तयारी असली तरी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचे (युद्धाखेरीज) इतरही परिणामकारक मार्ग उपलब्ध असतात. याच संदर्भात, गेल्या ४० वर्षांत भारत-चीन सीमेवर एकही गोळी झाडण्याची कधी वेळ आलेली नाही, या पंतप्रधानांच्या विधानाचा त्यांनी संदर्भ दिला.लष्करप्रमुख म्हणाले की, सैन्यदलाच्या गरजांची सरकारला जाणीव आहे. त्यासाठी सरकारचा लष्करास संपूर्ण पाठिंबा आहे. ‘मेक इन इंडिया’चांगली कल्पना आहे. त्याचे दृष्य परिणाम दोन-तीन वर्षांत मिळतील. जगभरातील लष्करी दळे त्यांच्या शस्त्रायुधांचे गुणोत्तर ३०:४०:३० असे ठेवत असते. यात ३० टक्के शस्त्रसामुग्री अत्याधुनिक तर ४० टक्के आधुनिकीकरणाच्या टप्प्यात असते. >डायर म्हटल्याने दुखावलो नाहीबुद्धिजीवी पार्थ चटर्जी यांनी आपली तुलना जालियानवाला बाग हत्याकांड घडवून आणणाऱ्या जनरल डायर यांच्याशी केल्याने आपल्याला बिलकूल वाईट वाटले नाही, असे जनरल रावत म्हणाले. ते म्हणाले की, मी लष्करी अधिकारी आहे व उठसूठ कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही. अशा गोष्टींसाठी तयारी ठेवावीच लागते. शेवटी चांगले-वाईट लोक ठरवत असतात. बहुसंख्य लोक जे ठरवतात तेच बरोबर ठरत असते.पर्वतीय युद्धासाठी सैन्यबलपर्वतीय युद्धासाठी ‘१७ स्ट्राइक कॉर्पस््’ नावाचे खास सैन्यबल उभारण्यात येत आहे, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले. या कामी काहीसा विलंब झाल्याचे मान्य करत ते म्हणाले की, हे खूप गुंतागुंतीचे काम असल्याने वेळ लागणे स्वाभाविकही आहे. या सैन्यदलासाठी सध्या भरती सुरू आहे. भरती झाल्यापासून जवानास युद्धभूमीवर तैनातीसाठी हरतऱ्हेने तयार करण्यासाठी तीन वर्षांचा वेळ लागतोच.