शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

सहा महिन्यात लष्कराने केला 80 दहशतवाद्यांचा खात्मा, अजूनही 115 दहशतवादी रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:00 IST

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलं आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लष्कराच्या अभियानाला यश मिळताना दिसत आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलं आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लष्कराच्या अभियानाला यश मिळताना दिसत आहे. लष्कराने गेल्या सहा महिन्यात 80 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या दक्षिण काश्मीरमध्येही अद्यापही 115 दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती लष्कराने दिली आहे. जवळपास 100 स्थानिक दहशतवादी असून, 15 परदेशी दहशतवादी दबा धरुन लपून बसलेले आहेत. 

गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. पम्पोरजवळील गावात झालेल्या या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचं नाव बदर होतं. तो जैश-ए-मोहम्मदचा सदस्य होता. जनरल ऑफिस कमांडिगने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने गेल्या सहा महिन्यात 80 दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊटअंतर्गत लष्कराने आपला मोर्चा दक्षिण काश्मीरच्या दिशेने वळवला असून, जिहादींचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा प्लान आखला आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियन जिल्हा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचं सांगितलं जातं. तिथे खुलेपणाने दहशतवादी कारवाया सुरु असतात. लष्कराने याठिकाणीही आपली गस्त वाढवली आहे. लष्कराने नवे कॅम्प उभारले असून, सीआरपीएफच्या रिझर्व्ह बटालियनलादेखील तैनात केलं आहे. 

दुसरीकडे, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी सरकाने इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांना जम्मू काश्मीरमधील सर्व पक्षांशी सतत चर्चा करण्यासाठी नियुक्त केलं आहे. 

'पाकिस्तानवर गोळीबार करु नका, पण जर त्यांनी केला तर सोडू नका'भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली होती. तसंच पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. राजनाथ सिंह यांनी सांगितलं होतं की, 'भारतीय जवानांना पाकिस्तानवर गोळीबार न करण्याचा आदेश दिला आहे. मात्र जर त्यांनी गोळीबार केल्यास असंख्य गोळ्यांचा वर्षाव करत योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला आहे'. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी