शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

सहा महिन्यात लष्कराने केला 80 दहशतवाद्यांचा खात्मा, अजूनही 115 दहशतवादी रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:00 IST

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलं आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लष्कराच्या अभियानाला यश मिळताना दिसत आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलं आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लष्कराच्या अभियानाला यश मिळताना दिसत आहे. लष्कराने गेल्या सहा महिन्यात 80 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या दक्षिण काश्मीरमध्येही अद्यापही 115 दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती लष्कराने दिली आहे. जवळपास 100 स्थानिक दहशतवादी असून, 15 परदेशी दहशतवादी दबा धरुन लपून बसलेले आहेत. 

गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. पम्पोरजवळील गावात झालेल्या या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचं नाव बदर होतं. तो जैश-ए-मोहम्मदचा सदस्य होता. जनरल ऑफिस कमांडिगने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने गेल्या सहा महिन्यात 80 दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊटअंतर्गत लष्कराने आपला मोर्चा दक्षिण काश्मीरच्या दिशेने वळवला असून, जिहादींचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा प्लान आखला आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियन जिल्हा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचं सांगितलं जातं. तिथे खुलेपणाने दहशतवादी कारवाया सुरु असतात. लष्कराने याठिकाणीही आपली गस्त वाढवली आहे. लष्कराने नवे कॅम्प उभारले असून, सीआरपीएफच्या रिझर्व्ह बटालियनलादेखील तैनात केलं आहे. 

दुसरीकडे, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी सरकाने इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांना जम्मू काश्मीरमधील सर्व पक्षांशी सतत चर्चा करण्यासाठी नियुक्त केलं आहे. 

'पाकिस्तानवर गोळीबार करु नका, पण जर त्यांनी केला तर सोडू नका'भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली होती. तसंच पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. राजनाथ सिंह यांनी सांगितलं होतं की, 'भारतीय जवानांना पाकिस्तानवर गोळीबार न करण्याचा आदेश दिला आहे. मात्र जर त्यांनी गोळीबार केल्यास असंख्य गोळ्यांचा वर्षाव करत योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला आहे'. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी