शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

आर्मीने यापूर्वी सुद्धा LOC ओलांडली पण दहशतवादी तळ पहिल्यांदाच केले उद्धवस्त

By admin | Updated: October 19, 2016 08:02 IST

सर्जिकल स्ट्राईक्स कोणाच्या कार्यकाळात कसे झाले यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - सर्जिकल स्ट्राईक्स कोणाच्या कार्यकाळात कसे झाले यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. यापार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी संसदीय समितीच्या सदस्यांना माहिती देताना यापूर्वी सुद्धा लष्कराने नियंत्रण रेषा पार करुन कारवाई केल्याचे मान्य केले. 
 
पण २९ सप्टेंबरचे सर्जिकल स्ट्राईक्स पूर्वीच्या कारवाईपेक्षा पूर्णपणे भिन्न होते असे सरकारच्यावतीने परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी सांगितले. काँग्रेस खासदार सत्यव्रत चर्तेुवेदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.  
 
परराष्ट्र विषयावरील संसदेच्या स्थायी समितीला मंगळवारी सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती देण्यात आली. लष्कराने यापूर्वी नियंत्रण रेषा पार केली होती का ? तर त्याचे उत्तर 'हो' आहे पण लाँच पॅड म्हणजे दहशतवादी तळ नष्ट केले होते का ? तर त्याचे उत्तर नाही असल्याचे परराष्ट्रसचिवांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.