शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

सैन्याने दिल्लीकडे कूच केले नव्हते - व्ही.के.सिंह

By admin | Updated: January 10, 2016 16:33 IST

सैन्याने दिल्लीच्या दिशेने कूच केले होते हा वरिष्ठ काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलेला आरोप केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी रविवारी फेटाळून लावला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - सैन्य दलाने २०१२ साली तत्कालीन केंद्र सरकारला कोणतीही पूर्वकल्पना न देता दिल्लीच्या दिशेने कूच केले होते हा वरिष्ठ  काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलेला आरोप केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी रविवारी फेटाळून लावला. 
सध्या मनिष तिवारी रिकामे आहेत. त्यांच्याकडे काहीही काम नाही. या विषयावर माझे पुस्तक आहे. ते त्यांनी वाचावे. त्यातून त्यांच्या सर्व शंका दूर होतील असे व्ही.के.सिंह यांनी सांगितले. दिल्लीत शनिवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मनिष तिवारी यांनी या घटनेचा उल्लेख केला. 
सैन्याने दिल्लीच्या दिशेने कूच केल्याचे चार एप्रिल २०१२ मध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिध्द झालेले ते वृत्त खरे होते. त्यावेळी मी संरक्षण खात्याच्या स्थायी समितीवर होतो. सैन्याने  दिल्लीच्या दिशेने कूच केले हे दुर्देवी आहे पण हे वृत्त खरे आहे. यावरुन मला आता वाद करायचा नाही असेही ते म्हणाले. 
विद्यमान केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह २०१२ मध्ये लष्करप्रमुख होते. त्यांचा  जन्मतारखेच्या मुद्यावरुन केंद्र सरकारबरोबर त्यावेळी वाद सुरु होता. १६ जानेवारी २०१२ च्या रात्री शेजारच्या हरणायामधून सैन्याची एक तुकडी केंद्र सरकारला कोणतीही पूर्वकल्पना न देता दिल्लीच्या दिशेने निघाली होती असे वृत्त चार एप्रिल २०१२ मध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिध्द झाले होते. हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर व्ही.के.सिंह यांनी आरोप फेटाळून लावताना हे वृत्त मूर्खपणा असल्याचे म्हटले होते.