शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

सैन्याने दिल्लीकडे कूच केले नव्हते - व्ही.के.सिंह

By admin | Updated: January 10, 2016 16:33 IST

सैन्याने दिल्लीच्या दिशेने कूच केले होते हा वरिष्ठ काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलेला आरोप केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी रविवारी फेटाळून लावला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - सैन्य दलाने २०१२ साली तत्कालीन केंद्र सरकारला कोणतीही पूर्वकल्पना न देता दिल्लीच्या दिशेने कूच केले होते हा वरिष्ठ  काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलेला आरोप केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी रविवारी फेटाळून लावला. 
सध्या मनिष तिवारी रिकामे आहेत. त्यांच्याकडे काहीही काम नाही. या विषयावर माझे पुस्तक आहे. ते त्यांनी वाचावे. त्यातून त्यांच्या सर्व शंका दूर होतील असे व्ही.के.सिंह यांनी सांगितले. दिल्लीत शनिवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मनिष तिवारी यांनी या घटनेचा उल्लेख केला. 
सैन्याने दिल्लीच्या दिशेने कूच केल्याचे चार एप्रिल २०१२ मध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिध्द झालेले ते वृत्त खरे होते. त्यावेळी मी संरक्षण खात्याच्या स्थायी समितीवर होतो. सैन्याने  दिल्लीच्या दिशेने कूच केले हे दुर्देवी आहे पण हे वृत्त खरे आहे. यावरुन मला आता वाद करायचा नाही असेही ते म्हणाले. 
विद्यमान केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह २०१२ मध्ये लष्करप्रमुख होते. त्यांचा  जन्मतारखेच्या मुद्यावरुन केंद्र सरकारबरोबर त्यावेळी वाद सुरु होता. १६ जानेवारी २०१२ च्या रात्री शेजारच्या हरणायामधून सैन्याची एक तुकडी केंद्र सरकारला कोणतीही पूर्वकल्पना न देता दिल्लीच्या दिशेने निघाली होती असे वृत्त चार एप्रिल २०१२ मध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिध्द झाले होते. हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर व्ही.के.सिंह यांनी आरोप फेटाळून लावताना हे वृत्त मूर्खपणा असल्याचे म्हटले होते.