शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
5
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
6
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
7
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
8
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
9
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
10
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
11
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
13
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
14
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
15
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
16
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
17
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
18
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
19
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोषाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:46 IST

त्यागी यादव याने ७ मे रोजी प्रिया कुमारीशी लग्न केलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ मे रोजी त्याला पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचा आदेश मिळाला.

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच भावुक केलं. जिल्ह्यातील केशव ब्लॉकमधील नंदन गावातील रहिवासी त्यागी यादव याने ७ मे रोजी प्रिया कुमारीशी लग्न केलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ मे रोजी त्याला पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचा आदेश मिळाला. देशसेवेच्या कर्तव्यामुळे नवविवाहित पत्नीला सोडून जवानाला सीमेवर जावं लागलं.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे लष्कराने आपल्या सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सीमेवरील परिस्थिती अजूनही संवेदनशील आहे, त्यामुळे त्यागी यादवची रजा देखील रद्द करण्यात आली आणि त्यांना ताबडतोब कर्तव्यावर परतण्याचे निर्देश देण्यात आले. तो एका अशा पदावर तैनात आहे, जिथे प्रत्येक क्षणी सतर्कतेची आवश्यकता आहे.

त्यागी यादवने दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी खास सुट्टी घेतली होती, परंतु आता देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत, देशाप्रती असलेलं कर्तव्य वैयक्तिक आयुष्यापेक्षा मोठं आहे. त्याचा हा निर्णय संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनला आहे. त्यागीच्या कुटुंबालाही त्याच्या देशभक्तीचा अभिमान वाटत आहे. त्याच्या पालकांनी त्याला आशीर्वाद दिला.

त्यागी यादव याचा चुलत भाऊ ओमप्रकाश यादव जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे तैनात आहे आणि मामा मंगल यादव देखील सैन्यात आहेत. तीन पिढ्यांपासून देशसेवेत असलेलं हे कुटुंब आज संपूर्ण गावाचा अभिमान आहे. पंजाब, काश्मीर आणि जम्मूच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये गोळीबाराचा आवाज येत असला तरी तिथे राहणारे लोक घाबरले नाहीत. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याच्या ते तयारीत आहेत.

"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार

हल्ला झाल्यास नेमकं काय करायचं हे महिला त्यांच्या मुलांना शिकवत आहेत आणि माजी सैनिक तरुणांना देश आधी येतो, मग सर्व काही... हे समजावून सांगत आहेत. "आम्ही गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू" असा निर्धार पंजाबपासून काश्मीरपर्यंत करण्यात आला आहे. लोक म्हणाले की १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही आम्ही कुठेही गेलो नाही. यावेळीही जाणार नाही. जवानांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे त्याच्यासोबत आम्ही उभे आहोत. जे काही लागेल ते आम्ही करू - अगदी आमचा जीवन देऊ. युद्ध झालं तरी आम्ही गाव सोडणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं आहे असं म्हटलं. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक