शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
2
Smriti Mandhana : "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
3
EMI चा भार हलका होणार! RBI च्या निर्णयापाठोपाठ 'या' ४ बँकांकडून कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात
4
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
5
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
6
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
7
Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद...
8
कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन...
9
नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
10
फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड
11
गोवा आग प्रकरणात मोठी कारवाई; क्लबच्या मालकाला अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
12
बनावट कागदपत्रं दाखवून लाटली सरकारी नोकरी, १० वर्षांनंतर फुटलं बिंग, स्टाफ नर्सवर कारवाई
13
गोव्यातील क्लब दुर्घटनेनंतर मोठा प्रश्न! गॅस स्फोटात विम्याचे नियम काय? 'या' चुकीमुळे ५० लाखांचे कवच गमावले!
14
इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
15
Video: यशस्वीने विराटला केक भरवला, रोहितकडे येताच हिटमॅन म्हणाला- 'नको रे, परत जाड होईल...'
16
इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
17
IND vs SA : टॉस जिंकला नसता तर... विराट-अर्शदीपचा 'सेंच्युरी पे सेंच्युरी' व्हिडिओ व्हायरल
18
अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला
19
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
20
हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
Daily Top 2Weekly Top 5

आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:46 IST

त्यागी यादव याने ७ मे रोजी प्रिया कुमारीशी लग्न केलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ मे रोजी त्याला पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचा आदेश मिळाला.

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच भावुक केलं. जिल्ह्यातील केशव ब्लॉकमधील नंदन गावातील रहिवासी त्यागी यादव याने ७ मे रोजी प्रिया कुमारीशी लग्न केलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ मे रोजी त्याला पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचा आदेश मिळाला. देशसेवेच्या कर्तव्यामुळे नवविवाहित पत्नीला सोडून जवानाला सीमेवर जावं लागलं.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे लष्कराने आपल्या सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सीमेवरील परिस्थिती अजूनही संवेदनशील आहे, त्यामुळे त्यागी यादवची रजा देखील रद्द करण्यात आली आणि त्यांना ताबडतोब कर्तव्यावर परतण्याचे निर्देश देण्यात आले. 

त्यागी यादवने दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी खास सुट्टी घेतली होती, परंतु आता देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत, देशाप्रती असलेलं कर्तव्य वैयक्तिक आयुष्यापेक्षा मोठं आहे. त्याचा हा निर्णय संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनला आहे. त्यागीच्या कुटुंबालाही त्याच्या देशभक्तीचा अभिमान वाटत आहे. त्याच्या पालकांनी त्याला आशीर्वाद दिला.

त्यागी यादव याचा चुलत भाऊ ओमप्रकाश यादव जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे तैनात आहे आणि मामा मंगल यादव देखील सैन्यात आहेत. तीन पिढ्यांपासून देशसेवेत असलेलं हे कुटुंब आज संपूर्ण गावाचा अभिमान आहे. पंजाब, काश्मीर आणि जम्मूच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये गोळीबाराचा आवाज येत असला तरी तिथे राहणारे लोक घाबरले नाहीत. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याच्या ते तयारीत आहेत.

"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार

हल्ला झाल्यास नेमकं काय करायचं हे महिला त्यांच्या मुलांना शिकवत आहेत आणि माजी सैनिक तरुणांना देश आधी येतो, मग सर्व काही... हे समजावून सांगत आहेत. "आम्ही गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू" असा निर्धार पंजाबपासून काश्मीरपर्यंत करण्यात आला आहे. लोक म्हणाले की १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही आम्ही कुठेही गेलो नाही. यावेळीही जाणार नाही. जवानांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे त्याच्यासोबत आम्ही उभे आहोत. जे काही लागेल ते आम्ही करू - अगदी आमचा जीवन देऊ. युद्ध झालं तरी आम्ही गाव सोडणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं आहे असं म्हटलं. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक