शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:46 IST

त्यागी यादव याने ७ मे रोजी प्रिया कुमारीशी लग्न केलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ मे रोजी त्याला पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचा आदेश मिळाला.

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच भावुक केलं. जिल्ह्यातील केशव ब्लॉकमधील नंदन गावातील रहिवासी त्यागी यादव याने ७ मे रोजी प्रिया कुमारीशी लग्न केलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ मे रोजी त्याला पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचा आदेश मिळाला. देशसेवेच्या कर्तव्यामुळे नवविवाहित पत्नीला सोडून जवानाला सीमेवर जावं लागलं.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे लष्कराने आपल्या सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सीमेवरील परिस्थिती अजूनही संवेदनशील आहे, त्यामुळे त्यागी यादवची रजा देखील रद्द करण्यात आली आणि त्यांना ताबडतोब कर्तव्यावर परतण्याचे निर्देश देण्यात आले. 

त्यागी यादवने दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी खास सुट्टी घेतली होती, परंतु आता देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत, देशाप्रती असलेलं कर्तव्य वैयक्तिक आयुष्यापेक्षा मोठं आहे. त्याचा हा निर्णय संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनला आहे. त्यागीच्या कुटुंबालाही त्याच्या देशभक्तीचा अभिमान वाटत आहे. त्याच्या पालकांनी त्याला आशीर्वाद दिला.

त्यागी यादव याचा चुलत भाऊ ओमप्रकाश यादव जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे तैनात आहे आणि मामा मंगल यादव देखील सैन्यात आहेत. तीन पिढ्यांपासून देशसेवेत असलेलं हे कुटुंब आज संपूर्ण गावाचा अभिमान आहे. पंजाब, काश्मीर आणि जम्मूच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये गोळीबाराचा आवाज येत असला तरी तिथे राहणारे लोक घाबरले नाहीत. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याच्या ते तयारीत आहेत.

"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार

हल्ला झाल्यास नेमकं काय करायचं हे महिला त्यांच्या मुलांना शिकवत आहेत आणि माजी सैनिक तरुणांना देश आधी येतो, मग सर्व काही... हे समजावून सांगत आहेत. "आम्ही गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू" असा निर्धार पंजाबपासून काश्मीरपर्यंत करण्यात आला आहे. लोक म्हणाले की १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही आम्ही कुठेही गेलो नाही. यावेळीही जाणार नाही. जवानांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे त्याच्यासोबत आम्ही उभे आहोत. जे काही लागेल ते आम्ही करू - अगदी आमचा जीवन देऊ. युद्ध झालं तरी आम्ही गाव सोडणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं आहे असं म्हटलं. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक