शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 05:10 IST

म्हणाले, ‘कारवाईची पद्धत, लक्ष्य आणि वेळ निवडीचे लष्कराला स्वातंत्र्य, दहशतवादाला चिरडून टाकणे आमचा राष्ट्रीय संकल्प’

नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्याची पद्धत, लक्ष्य व वेळ निवडण्याचे सशस्त्र दलांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख यांच्यासमवेत बैठक घेतली. दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढा देण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहानही बैठकीला उपस्थित होते.

RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स

मोदी म्हणाले, ‘सशस्त्र दलांच्या क्षमतेवर देशवासीयांना पूर्ण विश्वास आहे. पहलगाम हल्ल्यात देशभरातील पर्यटकांचा मृत्यू झाला. या भीषण कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत विविध पर्यायांचा विचार करीत आहे.’ हल्ला करणाऱ्यांनी कल्पनाही केली नसेल इतकी कठोर शिक्षा भारत त्यांना देईल, असा इशारा पंतप्रधानांनी आधीच दिला आहे. पाकिस्तानचा या दहशतवाद्यांना पाठिंबा असून, त्याला धडा शिकविण्यासाठी भारताने कारवाई करावी, अशी मागणी देशभरातून होत आहे. पंतप्रधानां कठोर पवित्रा पाहता, भारताकडून पाकला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी शक्यता आहे. 

मोदी, शाह, राजनाथ यांच्यात चर्चा 

तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान मोदी यांची बैठक तब्बल दीड तास चालली. या बैठकीनंतर लगेचच पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली.

‘पाकिस्तान हा धोकादायक देश’ : पाकिस्तानने दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याचे त्यांचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत कबूल केले. पाकिस्तान धोकादायक देश आहे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले, असे भारताच्या संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरुपी प्रतिनिधी योजना पटेल यांनी सांगितले.

५० लाखांचे अर्थसाहाय्य, थेट वारसांना नोकरी

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची तसेच प्रत्येक कुटुंबातील एका थेट वारसास सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत चर्चा करण्यात आली.

सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि जे मरण पावले त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठाम उभे असल्याचा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय त्यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर