शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळी सत्ताधाऱ्यांच्या राजकारणापासून लष्कर दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 04:53 IST

सुधीर देवरे यांचे मत। दोन्ही देशांमध्ये लोकसंवाद; नेपाळमधील सत्ताधारी नकाशाचे राजकारण करीत आहेत

टेकचंद सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लिपुलेख वादावरून भारतीय लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांना प्रत्युत्तर देण्यास नेपाळचे लष्करप्रमुख पूर्ण चंद्र थापा यांनी नकार दिल्याने लष्कर व सत्ताधाऱ्यांमधील वाद समोर आले आहेत. लष्कराने या वादात सत्ताधाºयांच्या भारतविरोधात न पडण्याची भूमिका घेतली. प्रत्यक्षात दोन्ही देशांमध्ये सीमेवरून वाद कधीच नव्हता; परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचे लक्ष हटवण्यासाठी व राष्ट्रवादाला प्रोत्साहन देण्यासाठीच नेपाळमधील सत्ताधारी नकाशाचे राजकारण करीत असल्याचे मत माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांनी व्यक्त केले.नेपाळमधील अंतर्गत राजकारणात तेथील लष्कराला पडायचे नसल्याचे नमूद करून देवरे म्हणाले, नेपाळी लष्कराला दाखवायचे की, आम्ही प्रोफेशनल आहोत. राजकीय मुद्यांमध्ये आम्ही भाग घेत नाही. भारत चीनमध्येही तणाव आहे. भारत नेपाळमध्येही कालापानी, लिपुलेखवरून सध्या तणाव आहे; पण नेपाळी लष्करास त्यात पडायचे नाही. कारण दोन्ही देशांमध्ये पीपल टू पीपल अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत.कोरोनामुळे भारताने लॉकडाऊन केले. काही जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नेपाळमध्ये भासू लागली; पण चिनी व्हायरसपेक्षा भारतीय व्हायरस जास्त भयावह आहे, हे पंतप्रधान ओली यांचे मत नेपाळी लोकांना अजिबात आवडले नाही. कारण लॉकडाऊनचा दोष भारताला देण्यात काहीच अर्थ नाही, त्यात भारताचा काहीच दोष नाही, असे स्थानिकांचे ठाम मत आहे. शिवाय सध्या नेपाळवर चीनचा प्रभाव जास्त आहे.कुणाच्या तरी इशाºयावरूनचीनचा उल्लेख न करता नरवणे यांनी ‘इतर’ कुणाच्यातरी इशाºयावरून नेपाळ या मार्गाचा विरोध करीत आहे, असे विधान केले. नेपाळमधून सत्ताधाºयांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. लष्करप्रमुख थापा यांनी पंतप्रधान ओली यांची सूचना धुडकावून नरवणेंना प्रत्युत्तर देण्याचे टाळले. घटनाक्रमाचा वेध देवरे यांनी खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी घेतला.पंतप्रधान ओली का करीत आहेत भारतविरोध?च्मुळात ओली दोन वर्षांपूर्वी नेपाळी राष्ट्रवादावरच (अँटी इंडियनिझम) निवडून आले. तोच मुद्दा ते अजूनही काढत असतात. अलीकडे त्यांना स्थानिककम्युनिस्ट पक्षातही विरोधसुरू झाला.च्कारकीर्द संपत असताना गव्हर्नर टीका करीत होते. चीनने मध्यस्थी केली म्हणून त्यांचे पद स्थिर झाले. त्या पार्श्वभूमीवर ते भारतविरोध करीत आहेत. आता नेपाळमध्ये चीनविरोध सुरू झाला.च्भारतीय लष्करप्रमुख नेपाळी लष्कराचे सन्माननीय जनरल असतात. गोरखा भारतीय लष्करात आहेत. त्यामुळे दोन्ही देशांचे वाद चर्चेतून नक्की सुटू शकतील.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNepalनेपाळ