शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

'सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावे', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 21:11 IST

Rajnath Singh : 'जगभरात अस्थिरता असूनही भारत शांत आहे, परंतु आपण सावध राहण्याची गरज आहे.'

Rajnath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. "भारत एक शांतताप्रिय देश आहे, पण शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी सज्ज असणे आवश्यक आहे," असे विधान राजनाथ सिंह यांनी केले. लखनौ येथील पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी सशस्त्र दलांचे राष्ट्रीय हित जपण्यासाठी आणि 'आत्मनिर्भर भारत'  संकल्पनेत अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमांडर्सच्या संयुक्त परिषदेत राजनाथ सिंह म्हणाले की, जगभरात अस्थिरता असूनही भारत शांत आहे, परंतु आपण सावध राहण्याची गरज आहे. यादरम्यान संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही सैन्यांमधील एकात्मता वाढवण्याच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. तसेच, सशस्त्र दलातील बदलांच्या अनुषंगाने संयुक्त लष्करी दृष्टीकोन विकसित करण्याच्या आणि भविष्यातील युद्धांमध्ये देशासमोरील आव्हानांसाठी तयारी करण्यावरही त्यांनी भर दिला. 

अनपेक्षित हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तयार राहारशिया-युक्रेन, इस्रायल-हमास संघर्ष आणि बांग्लादेशातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीचा संदर्भ देत संरक्षणमंत्र्यांनी कमांडर्सना या घटनांचे विश्लेषण करण्यास सांगितले आहे. तसेच भविष्यात देशाला भेडसावणाऱ्या समस्या आणि अनपेक्षित हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि या भागातील शांतता आणि स्थैर्याला आव्हान देणाऱ्या शेजारील देशांमध्ये घडणाऱ्या घटनांचा विचार करून सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने सखोल विश्लेषण करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली. 

सशस्त्र दलांना अधिक चांगली शस्त्रे द्याराजनाथ सिंह पुढे म्हणाले की, आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सध्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे मजबूत उपकरणे असणे आवश्यक आहे. आपल्याकडे सर्व प्रकारची व्यवस्था असावी. यादरम्यान संरक्षणमंत्र्यांनी कमांडर्सना सशस्त्र दलांच्या शस्त्रागारात पारंपारिक आणि आधुनिक युद्धसामग्रीचा समावेश करण्यास सांगितले. यादरम्यान त्यांनी लष्करी नेतृत्वाला डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवान