शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

'सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावे', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 21:11 IST

Rajnath Singh : 'जगभरात अस्थिरता असूनही भारत शांत आहे, परंतु आपण सावध राहण्याची गरज आहे.'

Rajnath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. "भारत एक शांतताप्रिय देश आहे, पण शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी सज्ज असणे आवश्यक आहे," असे विधान राजनाथ सिंह यांनी केले. लखनौ येथील पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी सशस्त्र दलांचे राष्ट्रीय हित जपण्यासाठी आणि 'आत्मनिर्भर भारत'  संकल्पनेत अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमांडर्सच्या संयुक्त परिषदेत राजनाथ सिंह म्हणाले की, जगभरात अस्थिरता असूनही भारत शांत आहे, परंतु आपण सावध राहण्याची गरज आहे. यादरम्यान संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही सैन्यांमधील एकात्मता वाढवण्याच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. तसेच, सशस्त्र दलातील बदलांच्या अनुषंगाने संयुक्त लष्करी दृष्टीकोन विकसित करण्याच्या आणि भविष्यातील युद्धांमध्ये देशासमोरील आव्हानांसाठी तयारी करण्यावरही त्यांनी भर दिला. 

अनपेक्षित हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तयार राहारशिया-युक्रेन, इस्रायल-हमास संघर्ष आणि बांग्लादेशातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीचा संदर्भ देत संरक्षणमंत्र्यांनी कमांडर्सना या घटनांचे विश्लेषण करण्यास सांगितले आहे. तसेच भविष्यात देशाला भेडसावणाऱ्या समस्या आणि अनपेक्षित हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि या भागातील शांतता आणि स्थैर्याला आव्हान देणाऱ्या शेजारील देशांमध्ये घडणाऱ्या घटनांचा विचार करून सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने सखोल विश्लेषण करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली. 

सशस्त्र दलांना अधिक चांगली शस्त्रे द्याराजनाथ सिंह पुढे म्हणाले की, आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सध्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे मजबूत उपकरणे असणे आवश्यक आहे. आपल्याकडे सर्व प्रकारची व्यवस्था असावी. यादरम्यान संरक्षणमंत्र्यांनी कमांडर्सना सशस्त्र दलांच्या शस्त्रागारात पारंपारिक आणि आधुनिक युद्धसामग्रीचा समावेश करण्यास सांगितले. यादरम्यान त्यांनी लष्करी नेतृत्वाला डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवान