शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तुमची ऑनलाइन फसवणूक झालीय?, मग वाचा RBIचे नवीन गाइडलाइन्स

By admin | Updated: July 7, 2017 12:45 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. एखाद्या ग्राहकाच्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन फसणवूक झाल्यास त्याद्वारे होणा-या नुकसानाची जबाबदारी आता ग्राहक नाही तर बँक स्वीकारणार आहेत. यासाठी ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या तीन दिवसांच्या आत ग्राहकाला तक्रार नोंदवणं आवश्यक आहे. 
 
ज्या दिवशी तुम्ही तक्रार नोंदवला, त्यानंतर 10 दिवसांच्या आत तुमच्या खात्यातून फसवणुकीद्वारे गेलेली रक्कम क्रेडिट करण्यात येईल. मात्र ग्राहकाकडून फसवणुकीची माहिती देण्यास 3 दिवसांहून अधिक कालावधी लागल्यास ग्राहकालाच 25,000 रुपयांपर्यतचे नुकसान सहन करावे लागेल. इंटरनेट बँकींग करणा-या ग्राहकाचं खाते आणि कार्डमधून अनधिकृतरित्या होणा-या व्यवहारांची प्रकरणं मोठ्या प्रमाणात समोर आली आहेत. ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ही मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहे. 
 
TERMS AND CONDITIONS APPLY 
 
मात्र, जर एखाद्या खातेदारानं स्वतःहून आपला पासवर्ड भलत्याच व्यक्तीसोबत शेअर केला आणि त्यानंतर फसवणूक झाल्याची बाब समोर आल्यास, या घटनेस संबंधित ग्राहक स्वतःच जबाबदार असतील,असेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं स्पष्ट केले आहे.  ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांपासून वाचण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रत्येक व्यवहारासंदर्भात संदेश आणि ई-मेल अलर्ट जारी केले आहेत.  अलर्टसोबत रिप्लायचा ऑप्शनही देण्यात आला आहे.
 
आणखी बातम्या वाचा
 
 
ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क करण्यासाठी मुंबई पोलिसांचा फिल्मी अंदाज
सध्याचं जग हे डिजीटल झालं आहे. बरेच व्यवहार आपण ऑनलाइन करतो आहे. ऑनलाइन सेवेमुळे व्यवहार पटकन होतो तसंच आपला वेळसुद्धा वाचतो. पण या ऑनलाइन व्यवहारांचे जसे फायदे आहेत तसेच तोटेसुद्धा आहेत. अनेक फेक साइट्स आज सक्रीय झाल्या आहेत. ज्याचा सर्वसामान्य लोकांना सामना करावा लागतो आहे. या साइट्सद्वारे लोकांची फसवणूकही बऱ्याचदा होते. ऑनलाइन साइट्सची विश्वासार्हता तपासून मगच व्यवहार करा याबद्दलची बरीच जनजागृती केली जाते आहे. 
ऑनलाइन फसवणुकीपासून लोकांना सावध करण्यासाठी मुंबई पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने नागरिकांना आवाहन केलं आहे. पोलिसांनी "अग्निपथ" सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध डायलॉगसह त्यांचा फोटो शेअर केला आहे
 
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांमुळे पोलीस सतत नागरिकांना सतर्क करत असतात. तरीही अनेक जण त्याला बळी पडतात. हे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी "अग्निपथ"मधील अमिताभचा "पूरा नाम, विजय दीनानाथ चौहान... !" हा डायलॉग फोटोवर लिहीत शेअर केला आणि त्याबरोबर सतर्कतेचा इशाराही दिला आहे. 
 
मुंबई पोलिसांनी हा प्रयोग पहिल्यांदाच केलेला नाही. यापूर्वीही त्यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून सतर्कतेचे संदेश दिले आहेत. यावेळी पासवर्ड, ओटीपी, एटीएम पिन नंबर अशी माहिती शेअर करू नये, असं आवाहन करण्यासाठी "अग्निपथ"मधील डायलॉगचा उपयोग करण्यात आला आहे. ऑनलाइनवर "हिरोगिरी" करू नका, असं आवाहन पोलिसांनी ट्विटमधून सर्वांना केलं आहे. याआधी स्वच्छतेचं आवाहन करण्यासाठी वाराणसीत अमिताभ बच्चन यांच्या "दीवार" सिनेमाचे पोस्टर्स लावण्यात आले होते.