शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

तुमची ऑनलाइन फसवणूक झालीय?, मग वाचा RBIचे नवीन गाइडलाइन्स

By admin | Updated: July 7, 2017 12:45 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. एखाद्या ग्राहकाच्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन फसणवूक झाल्यास त्याद्वारे होणा-या नुकसानाची जबाबदारी आता ग्राहक नाही तर बँक स्वीकारणार आहेत. यासाठी ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या तीन दिवसांच्या आत ग्राहकाला तक्रार नोंदवणं आवश्यक आहे. 
 
ज्या दिवशी तुम्ही तक्रार नोंदवला, त्यानंतर 10 दिवसांच्या आत तुमच्या खात्यातून फसवणुकीद्वारे गेलेली रक्कम क्रेडिट करण्यात येईल. मात्र ग्राहकाकडून फसवणुकीची माहिती देण्यास 3 दिवसांहून अधिक कालावधी लागल्यास ग्राहकालाच 25,000 रुपयांपर्यतचे नुकसान सहन करावे लागेल. इंटरनेट बँकींग करणा-या ग्राहकाचं खाते आणि कार्डमधून अनधिकृतरित्या होणा-या व्यवहारांची प्रकरणं मोठ्या प्रमाणात समोर आली आहेत. ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ही मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहे. 
 
TERMS AND CONDITIONS APPLY 
 
मात्र, जर एखाद्या खातेदारानं स्वतःहून आपला पासवर्ड भलत्याच व्यक्तीसोबत शेअर केला आणि त्यानंतर फसवणूक झाल्याची बाब समोर आल्यास, या घटनेस संबंधित ग्राहक स्वतःच जबाबदार असतील,असेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं स्पष्ट केले आहे.  ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांपासून वाचण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रत्येक व्यवहारासंदर्भात संदेश आणि ई-मेल अलर्ट जारी केले आहेत.  अलर्टसोबत रिप्लायचा ऑप्शनही देण्यात आला आहे.
 
आणखी बातम्या वाचा
 
 
ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क करण्यासाठी मुंबई पोलिसांचा फिल्मी अंदाज
सध्याचं जग हे डिजीटल झालं आहे. बरेच व्यवहार आपण ऑनलाइन करतो आहे. ऑनलाइन सेवेमुळे व्यवहार पटकन होतो तसंच आपला वेळसुद्धा वाचतो. पण या ऑनलाइन व्यवहारांचे जसे फायदे आहेत तसेच तोटेसुद्धा आहेत. अनेक फेक साइट्स आज सक्रीय झाल्या आहेत. ज्याचा सर्वसामान्य लोकांना सामना करावा लागतो आहे. या साइट्सद्वारे लोकांची फसवणूकही बऱ्याचदा होते. ऑनलाइन साइट्सची विश्वासार्हता तपासून मगच व्यवहार करा याबद्दलची बरीच जनजागृती केली जाते आहे. 
ऑनलाइन फसवणुकीपासून लोकांना सावध करण्यासाठी मुंबई पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने नागरिकांना आवाहन केलं आहे. पोलिसांनी "अग्निपथ" सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध डायलॉगसह त्यांचा फोटो शेअर केला आहे
 
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांमुळे पोलीस सतत नागरिकांना सतर्क करत असतात. तरीही अनेक जण त्याला बळी पडतात. हे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी "अग्निपथ"मधील अमिताभचा "पूरा नाम, विजय दीनानाथ चौहान... !" हा डायलॉग फोटोवर लिहीत शेअर केला आणि त्याबरोबर सतर्कतेचा इशाराही दिला आहे. 
 
मुंबई पोलिसांनी हा प्रयोग पहिल्यांदाच केलेला नाही. यापूर्वीही त्यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून सतर्कतेचे संदेश दिले आहेत. यावेळी पासवर्ड, ओटीपी, एटीएम पिन नंबर अशी माहिती शेअर करू नये, असं आवाहन करण्यासाठी "अग्निपथ"मधील डायलॉगचा उपयोग करण्यात आला आहे. ऑनलाइनवर "हिरोगिरी" करू नका, असं आवाहन पोलिसांनी ट्विटमधून सर्वांना केलं आहे. याआधी स्वच्छतेचं आवाहन करण्यासाठी वाराणसीत अमिताभ बच्चन यांच्या "दीवार" सिनेमाचे पोस्टर्स लावण्यात आले होते.