शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाने सरकारचे जावई आहेत का?

By admin | Updated: June 17, 2015 01:33 IST

साखर कारखाने सरकारचे

साखर कारखाने सरकारचे
जावई आहेत का?
- चंद्रकांत पाटील यांचा सवाल
मुंबई - साखर कारखानदारी हा व्यवसाय असून त्यास व्यवसायाचे सर्व नियम लागू होतात. एफआरपी नुसार दर देणे शक्य नव्हते तर कारखान्यांनी ऊस घेतलाच कशाला, असा सवाल सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. सरकारने मदत केल्यानंतर द्यावयाची १४०० कोटी रुपयांची रक्कम कारखान्यांना उभारावीच लागेल, असही त्यांनी बजावले.
मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत पाटील म्हणाले की, एफआरपीसाठी साखर उद्योगाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दोन हजार कोटी रूपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.मात्र त्यानंतरही साखर कारखान्यांकडे १४०० कोटी रूपयांची थकबाकी राहणार आहे.ही रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा व्हावी म्हणून साखर कारखान्यांना स्वतंत्र बँक खाते उघडण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. एफआरपीनुसार दर न देणा-या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असेही ते म्हणाले.
कारखान्यांचा नफा तोटा हा त्यांचा त्यांना सांभाळायचा आहे.त्यांना शेतक-यांचे पैसे देण्यासाठी कर्ज द्यायचे,आणखी देणी देण्यासाठी परत पैसे द्यायचे,नवा हंगाम सुरू करण्यासाठी पैसे द्यायचे ते काय सरकारचे जावई आहेत काय? असा सवालही पाटील यांनी केला. केंद्र सरकारने पाच वर्षांचे बिनव्याजी कर्ज देऊ केले आहे .प्रत्येक कारखान्याला मिळणारी रक्कम त्यांनी स्वतंत्र बँक खात्यात ठेवायची आहे.या रकमेत त्यांनी स्वनिधीची भर घालायची आहे.तरीही १४०० कोटी कमी पडतील असे कारखान्यांचे म्हणणे आहे.मात्र त्याची सोय त्यांची त्यांनीच करायची आहे.शेतक-यांना एफआरपीनुसार दर द्यावाच लागेल असेही ते म्हणाले.(विशेष प्रतिनिधी)
--------------------------------
कोल्हापूर टोलचा अहवाल तीन आठवडयात
कोल्हापूर टोलप्रश्नावर समिती नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल तीन आठवड्यांत प्राप्त होणार आहे.आयआरबी कंपनीने ६०० कोटी रूपयांचा खर्च झाल्याचा दावा केला आहे.कंपनीचा दावा तपासण्यात येणार आहे.रस्त्यासाठी कोणत्या दर्जाच्या वस्तूंचा वापर केला याची तपासणी यंत्राच्या सहायाने करण्यात येणार आहे.समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार याबाबत योग्य निर्णय घेईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
-------------------------------