शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'2012 मध्ये गळा फाडून ओडरणारे देशभक्त आता पांघरुन घेऊन झोपलेत का?'

By महेश गलांडे | Updated: February 17, 2021 19:16 IST

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता.

ठळक मुद्देसन 2012 च्या पूर्वीचे देशभक्त 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोलच्या आणि 30 ते 35 रुपय लिटर डिझेलच्या किंमतीवर गळा फाडून ओरडत होते., तेंव्हा यांच्या काळजाला आग लागली होती. आता, शेतकरी, सर्वसामान्य आमि गरीब माणूस महागाईनं मरायला लागलाय

मुंबई - देशात काँग्रेस आघाडीचं सरकार असताना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन सेलिब्रिटींनी आवाज उठवला होता. पेट्रोलमुळे महागाई वाढल्याचं ट्विट या सेलिब्रिटींनी केलं होत. त्यामध्ये, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचा समावेश होता. आता, देशात पेट्रोलने शंभरी गाठली आहे, तरीही हे सेलिब्रिटी काहीही बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे, या अभिनेत्यांचे जुने ट्विट व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरुन या सेलिब्रिटींना नेटीझन्स प्रश्न विचारत आहेत. बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या सेलिब्रिटींच्या गप्प बसण्यावर टीका केलीय.     

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता. आता, राजदनेही ट्विट करुन महानायकासह इतरांनाही आता गप्प का, पांघरुन घेऊन झोपलात का? असा सवाल विचारला आहे. 

सन 2012 च्या पूर्वीचे देशभक्त 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोलच्या आणि 30 ते 35 रुपय लिटर डिझेलच्या किंमतीवर गळा फाडून ओरडत होते., तेंव्हा यांच्या काळजाला आग लागली होती. आता, शेतकरी, सर्वसामान्य आमि गरीब माणूस महागाईनं मरायला लागलाय. पण, हे निर्लज्जपणाची चादर पांघरुन झोपलेत, असे ट्विट बिहारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने केले आहे. या ट्विटसोबत राजदने बिग बी अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, अनुपम खेर आणि चेतन भगत या सेलिब्रिटींचे जुने ट्विट शेअर केले आहेत. सन 2012 साली या सेलिब्रिटींनी ट्विट करुन पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. मात्र, सध्या पेट्रोल 100 रुपयांपर्यंत पोहोचले असतानाही हे सर्व गप्प आहेत. त्यामुळे, या सेलिब्रिटींविरुद्ध सर्वसामान्य नागरिकही प्रश्न विचारत आहेत.

भाई जगताप यांनीही केलं होतं लक्ष्य

देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची शंभरीकडे वाटचाल सुरू असताना हे कलाकार शांत का?  असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. भाई जगताप यांनी बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खैर यांनी २०१२ साली केलेल्या ट्विटची आठवण करुन दिली आहे. केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी रामायणाचा दाखल देत गाड्या कॅशमध्ये करता येतील पण पेट्रोलसाठी कर्ज काढावं लागेल असं म्हटलं होतं. तर अक्षय कुमारने आता सायकल चालवण्याची वेळ आली आहे असं म्हटलं होतं. यासोबतच अनुपम खैर यांनी एक विनोद ट्विट करत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन काँग्रेस सरकारची खिल्ली उडवली होती. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलAmitabh Bachchanअमिताभ बच्चनAkshay Kumarअक्षय कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल