शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

'2012 मध्ये गळा फाडून ओडरणारे देशभक्त आता पांघरुन घेऊन झोपलेत का?'

By महेश गलांडे | Updated: February 17, 2021 19:16 IST

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता.

ठळक मुद्देसन 2012 च्या पूर्वीचे देशभक्त 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोलच्या आणि 30 ते 35 रुपय लिटर डिझेलच्या किंमतीवर गळा फाडून ओरडत होते., तेंव्हा यांच्या काळजाला आग लागली होती. आता, शेतकरी, सर्वसामान्य आमि गरीब माणूस महागाईनं मरायला लागलाय

मुंबई - देशात काँग्रेस आघाडीचं सरकार असताना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन सेलिब्रिटींनी आवाज उठवला होता. पेट्रोलमुळे महागाई वाढल्याचं ट्विट या सेलिब्रिटींनी केलं होत. त्यामध्ये, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचा समावेश होता. आता, देशात पेट्रोलने शंभरी गाठली आहे, तरीही हे सेलिब्रिटी काहीही बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे, या अभिनेत्यांचे जुने ट्विट व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरुन या सेलिब्रिटींना नेटीझन्स प्रश्न विचारत आहेत. बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या सेलिब्रिटींच्या गप्प बसण्यावर टीका केलीय.     

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता. आता, राजदनेही ट्विट करुन महानायकासह इतरांनाही आता गप्प का, पांघरुन घेऊन झोपलात का? असा सवाल विचारला आहे. 

सन 2012 च्या पूर्वीचे देशभक्त 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोलच्या आणि 30 ते 35 रुपय लिटर डिझेलच्या किंमतीवर गळा फाडून ओरडत होते., तेंव्हा यांच्या काळजाला आग लागली होती. आता, शेतकरी, सर्वसामान्य आमि गरीब माणूस महागाईनं मरायला लागलाय. पण, हे निर्लज्जपणाची चादर पांघरुन झोपलेत, असे ट्विट बिहारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने केले आहे. या ट्विटसोबत राजदने बिग बी अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, अनुपम खेर आणि चेतन भगत या सेलिब्रिटींचे जुने ट्विट शेअर केले आहेत. सन 2012 साली या सेलिब्रिटींनी ट्विट करुन पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. मात्र, सध्या पेट्रोल 100 रुपयांपर्यंत पोहोचले असतानाही हे सर्व गप्प आहेत. त्यामुळे, या सेलिब्रिटींविरुद्ध सर्वसामान्य नागरिकही प्रश्न विचारत आहेत.

भाई जगताप यांनीही केलं होतं लक्ष्य

देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची शंभरीकडे वाटचाल सुरू असताना हे कलाकार शांत का?  असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. भाई जगताप यांनी बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खैर यांनी २०१२ साली केलेल्या ट्विटची आठवण करुन दिली आहे. केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी रामायणाचा दाखल देत गाड्या कॅशमध्ये करता येतील पण पेट्रोलसाठी कर्ज काढावं लागेल असं म्हटलं होतं. तर अक्षय कुमारने आता सायकल चालवण्याची वेळ आली आहे असं म्हटलं होतं. यासोबतच अनुपम खैर यांनी एक विनोद ट्विट करत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन काँग्रेस सरकारची खिल्ली उडवली होती. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलAmitabh Bachchanअमिताभ बच्चनAkshay Kumarअक्षय कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल