शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

'2012 मध्ये गळा फाडून ओडरणारे देशभक्त आता पांघरुन घेऊन झोपलेत का?'

By महेश गलांडे | Updated: February 17, 2021 19:16 IST

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता.

ठळक मुद्देसन 2012 च्या पूर्वीचे देशभक्त 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोलच्या आणि 30 ते 35 रुपय लिटर डिझेलच्या किंमतीवर गळा फाडून ओरडत होते., तेंव्हा यांच्या काळजाला आग लागली होती. आता, शेतकरी, सर्वसामान्य आमि गरीब माणूस महागाईनं मरायला लागलाय

मुंबई - देशात काँग्रेस आघाडीचं सरकार असताना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरुन सेलिब्रिटींनी आवाज उठवला होता. पेट्रोलमुळे महागाई वाढल्याचं ट्विट या सेलिब्रिटींनी केलं होत. त्यामध्ये, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचा समावेश होता. आता, देशात पेट्रोलने शंभरी गाठली आहे, तरीही हे सेलिब्रिटी काहीही बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे, या अभिनेत्यांचे जुने ट्विट व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरुन या सेलिब्रिटींना नेटीझन्स प्रश्न विचारत आहेत. बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या सेलिब्रिटींच्या गप्प बसण्यावर टीका केलीय.     

काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर (Fuel Pirce hike) टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रीक कार चालवतात का?, असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी यापूर्वी लगावला होता. आता, राजदनेही ट्विट करुन महानायकासह इतरांनाही आता गप्प का, पांघरुन घेऊन झोपलात का? असा सवाल विचारला आहे. 

सन 2012 च्या पूर्वीचे देशभक्त 50 ते 55 रुपये लिटर पेट्रोलच्या आणि 30 ते 35 रुपय लिटर डिझेलच्या किंमतीवर गळा फाडून ओरडत होते., तेंव्हा यांच्या काळजाला आग लागली होती. आता, शेतकरी, सर्वसामान्य आमि गरीब माणूस महागाईनं मरायला लागलाय. पण, हे निर्लज्जपणाची चादर पांघरुन झोपलेत, असे ट्विट बिहारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने केले आहे. या ट्विटसोबत राजदने बिग बी अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, अनुपम खेर आणि चेतन भगत या सेलिब्रिटींचे जुने ट्विट शेअर केले आहेत. सन 2012 साली या सेलिब्रिटींनी ट्विट करुन पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. मात्र, सध्या पेट्रोल 100 रुपयांपर्यंत पोहोचले असतानाही हे सर्व गप्प आहेत. त्यामुळे, या सेलिब्रिटींविरुद्ध सर्वसामान्य नागरिकही प्रश्न विचारत आहेत.

भाई जगताप यांनीही केलं होतं लक्ष्य

देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची शंभरीकडे वाटचाल सुरू असताना हे कलाकार शांत का?  असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. भाई जगताप यांनी बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खैर यांनी २०१२ साली केलेल्या ट्विटची आठवण करुन दिली आहे. केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी रामायणाचा दाखल देत गाड्या कॅशमध्ये करता येतील पण पेट्रोलसाठी कर्ज काढावं लागेल असं म्हटलं होतं. तर अक्षय कुमारने आता सायकल चालवण्याची वेळ आली आहे असं म्हटलं होतं. यासोबतच अनुपम खैर यांनी एक विनोद ट्विट करत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन काँग्रेस सरकारची खिल्ली उडवली होती. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलAmitabh Bachchanअमिताभ बच्चनAkshay Kumarअक्षय कुमारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल