शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

आक्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:39 IST

उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका बेभान क्षणी हे जगच सोडून गेली.

उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका बेभान क्षणी हे जगच सोडून गेली. आपले जीवाभावाचे लोक आणि सा-या शहराला दु:खाच्या सागरात लोटून. होत्याचे नव्हते झाले. या मुलांनी अन् त्यांच्या पालकांनीही त्यांच्या भावी आयुष्याची किती सुंदर स्वप्ने रंगविली असतील. त्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला. असे का घडावे? नियतीपुढे कुणाचे चालत नाही असे म्हणतात. हा अपघातही नियतीचा खेळ असल्याची आपली समजूत करून घेत मुलांच्या या अकाली मरणाचे दु:ख पचवून घेऊ. पण खरंच हा केवळ नियतीचा खेळ होता का? हा अपघात टाळता आला नसता का? असे अनेक प्रश्न या भीषण अपघाताने पुन्हा एकदा निर्माण केले आहेत. आजवरच्या अपघातांवरून हे लक्षात आले आहे की बहुतांश अपघात हे मानवी चुकांमुळेच होत असतात. शुक्रवारी दुपारी नागपूर-अमरावती मार्गावर झालेला अपघातही तसाच होता. आठ मित्रमैत्रिणी कार्यक्रमाचे यश साजरे करण्याकरिता निघाले होते. प्रचंड उत्साह होता. परतताना त्यांच्या गाडीचा वेग एवढा जास्त होता की, चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून तिचे टायर फुटले अन् ती रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर आदळली. अपघाताची वार्ता कळल्यानंतर या विद्यार्थ्यांचे मित्र आणि त्यांच्या नातेवाईकांची झालेली अवस्था हृदय पिळवटून टाकणारी होती. त्यांचा आक्रोश थरकाप उडविणारा होता. अवघ्या काही तासांपूर्वी हसतखेळत घरातून बाहेर पडणाºया आपल्या मुलांचे कलेवरच घरी घेईल, याची पुसटशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. मनात एकच विचार येतो; या मुलांनी आपल्या मनावर आणि गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवले असते तर आज ते आपल्यात हसतखेळत असते. गेल्यावर्षी असेच विद्यार्थ्यांचे दोन मोठे अपघात नागपूरकरांनी अनुभवले आहेत. अमरावती मार्गावरील कार अपघातात अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला होता. ती कारसुद्धा प्रचंड वेगात होती. भूतकाळात डोकावले आणि या सर्व कार अपघातांवर नजर टाकली तर एक समान गोष्ट लक्षात येत ती म्हणजे गाडीचा वेग आणि वाढते पार्टी कल्चर. विशेषत: अमरावती मार्गावर ढाबे आणि हॉटेल्सची संख्या खूप वाढली आहे. तरुणाई वाढदिवस आणि इतर आनंद साजरा करण्याकरिता शहराबाहेर पडते आणि परत येताना हे अपघात घडतात. कुठलेही संकट सांगून येत नाही. पण काही संकटे आपण स्वत:हूनच ओढवून घेतो हे सुद्धा एक वास्तव आहे.

टॅग्स :Accidentअपघात