शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

आक्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:39 IST

उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका बेभान क्षणी हे जगच सोडून गेली.

उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका बेभान क्षणी हे जगच सोडून गेली. आपले जीवाभावाचे लोक आणि सा-या शहराला दु:खाच्या सागरात लोटून. होत्याचे नव्हते झाले. या मुलांनी अन् त्यांच्या पालकांनीही त्यांच्या भावी आयुष्याची किती सुंदर स्वप्ने रंगविली असतील. त्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला. असे का घडावे? नियतीपुढे कुणाचे चालत नाही असे म्हणतात. हा अपघातही नियतीचा खेळ असल्याची आपली समजूत करून घेत मुलांच्या या अकाली मरणाचे दु:ख पचवून घेऊ. पण खरंच हा केवळ नियतीचा खेळ होता का? हा अपघात टाळता आला नसता का? असे अनेक प्रश्न या भीषण अपघाताने पुन्हा एकदा निर्माण केले आहेत. आजवरच्या अपघातांवरून हे लक्षात आले आहे की बहुतांश अपघात हे मानवी चुकांमुळेच होत असतात. शुक्रवारी दुपारी नागपूर-अमरावती मार्गावर झालेला अपघातही तसाच होता. आठ मित्रमैत्रिणी कार्यक्रमाचे यश साजरे करण्याकरिता निघाले होते. प्रचंड उत्साह होता. परतताना त्यांच्या गाडीचा वेग एवढा जास्त होता की, चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून तिचे टायर फुटले अन् ती रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर आदळली. अपघाताची वार्ता कळल्यानंतर या विद्यार्थ्यांचे मित्र आणि त्यांच्या नातेवाईकांची झालेली अवस्था हृदय पिळवटून टाकणारी होती. त्यांचा आक्रोश थरकाप उडविणारा होता. अवघ्या काही तासांपूर्वी हसतखेळत घरातून बाहेर पडणाºया आपल्या मुलांचे कलेवरच घरी घेईल, याची पुसटशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. मनात एकच विचार येतो; या मुलांनी आपल्या मनावर आणि गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवले असते तर आज ते आपल्यात हसतखेळत असते. गेल्यावर्षी असेच विद्यार्थ्यांचे दोन मोठे अपघात नागपूरकरांनी अनुभवले आहेत. अमरावती मार्गावरील कार अपघातात अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला होता. ती कारसुद्धा प्रचंड वेगात होती. भूतकाळात डोकावले आणि या सर्व कार अपघातांवर नजर टाकली तर एक समान गोष्ट लक्षात येत ती म्हणजे गाडीचा वेग आणि वाढते पार्टी कल्चर. विशेषत: अमरावती मार्गावर ढाबे आणि हॉटेल्सची संख्या खूप वाढली आहे. तरुणाई वाढदिवस आणि इतर आनंद साजरा करण्याकरिता शहराबाहेर पडते आणि परत येताना हे अपघात घडतात. कुठलेही संकट सांगून येत नाही. पण काही संकटे आपण स्वत:हूनच ओढवून घेतो हे सुद्धा एक वास्तव आहे.

टॅग्स :Accidentअपघात