शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

आक्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:39 IST

उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका बेभान क्षणी हे जगच सोडून गेली.

उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका बेभान क्षणी हे जगच सोडून गेली. आपले जीवाभावाचे लोक आणि सा-या शहराला दु:खाच्या सागरात लोटून. होत्याचे नव्हते झाले. या मुलांनी अन् त्यांच्या पालकांनीही त्यांच्या भावी आयुष्याची किती सुंदर स्वप्ने रंगविली असतील. त्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला. असे का घडावे? नियतीपुढे कुणाचे चालत नाही असे म्हणतात. हा अपघातही नियतीचा खेळ असल्याची आपली समजूत करून घेत मुलांच्या या अकाली मरणाचे दु:ख पचवून घेऊ. पण खरंच हा केवळ नियतीचा खेळ होता का? हा अपघात टाळता आला नसता का? असे अनेक प्रश्न या भीषण अपघाताने पुन्हा एकदा निर्माण केले आहेत. आजवरच्या अपघातांवरून हे लक्षात आले आहे की बहुतांश अपघात हे मानवी चुकांमुळेच होत असतात. शुक्रवारी दुपारी नागपूर-अमरावती मार्गावर झालेला अपघातही तसाच होता. आठ मित्रमैत्रिणी कार्यक्रमाचे यश साजरे करण्याकरिता निघाले होते. प्रचंड उत्साह होता. परतताना त्यांच्या गाडीचा वेग एवढा जास्त होता की, चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून तिचे टायर फुटले अन् ती रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर आदळली. अपघाताची वार्ता कळल्यानंतर या विद्यार्थ्यांचे मित्र आणि त्यांच्या नातेवाईकांची झालेली अवस्था हृदय पिळवटून टाकणारी होती. त्यांचा आक्रोश थरकाप उडविणारा होता. अवघ्या काही तासांपूर्वी हसतखेळत घरातून बाहेर पडणाºया आपल्या मुलांचे कलेवरच घरी घेईल, याची पुसटशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. मनात एकच विचार येतो; या मुलांनी आपल्या मनावर आणि गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवले असते तर आज ते आपल्यात हसतखेळत असते. गेल्यावर्षी असेच विद्यार्थ्यांचे दोन मोठे अपघात नागपूरकरांनी अनुभवले आहेत. अमरावती मार्गावरील कार अपघातात अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला होता. ती कारसुद्धा प्रचंड वेगात होती. भूतकाळात डोकावले आणि या सर्व कार अपघातांवर नजर टाकली तर एक समान गोष्ट लक्षात येत ती म्हणजे गाडीचा वेग आणि वाढते पार्टी कल्चर. विशेषत: अमरावती मार्गावर ढाबे आणि हॉटेल्सची संख्या खूप वाढली आहे. तरुणाई वाढदिवस आणि इतर आनंद साजरा करण्याकरिता शहराबाहेर पडते आणि परत येताना हे अपघात घडतात. कुठलेही संकट सांगून येत नाही. पण काही संकटे आपण स्वत:हूनच ओढवून घेतो हे सुद्धा एक वास्तव आहे.

टॅग्स :Accidentअपघात