शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
3
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
4
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
5
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
6
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
7
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
8
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
9
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
10
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
11
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
12
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
13
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
14
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
15
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
16
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
17
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
18
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
19
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
20
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

आक्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:39 IST

उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका बेभान क्षणी हे जगच सोडून गेली.

उपराजधानीत परवा आक्रित घडले. सहा तरुणतरुणींचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. कारमधून आनंद साजरा करायला निघालेली २१-२२ वर्षांची ही मुलं एका बेभान क्षणी हे जगच सोडून गेली. आपले जीवाभावाचे लोक आणि सा-या शहराला दु:खाच्या सागरात लोटून. होत्याचे नव्हते झाले. या मुलांनी अन् त्यांच्या पालकांनीही त्यांच्या भावी आयुष्याची किती सुंदर स्वप्ने रंगविली असतील. त्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला. असे का घडावे? नियतीपुढे कुणाचे चालत नाही असे म्हणतात. हा अपघातही नियतीचा खेळ असल्याची आपली समजूत करून घेत मुलांच्या या अकाली मरणाचे दु:ख पचवून घेऊ. पण खरंच हा केवळ नियतीचा खेळ होता का? हा अपघात टाळता आला नसता का? असे अनेक प्रश्न या भीषण अपघाताने पुन्हा एकदा निर्माण केले आहेत. आजवरच्या अपघातांवरून हे लक्षात आले आहे की बहुतांश अपघात हे मानवी चुकांमुळेच होत असतात. शुक्रवारी दुपारी नागपूर-अमरावती मार्गावर झालेला अपघातही तसाच होता. आठ मित्रमैत्रिणी कार्यक्रमाचे यश साजरे करण्याकरिता निघाले होते. प्रचंड उत्साह होता. परतताना त्यांच्या गाडीचा वेग एवढा जास्त होता की, चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून तिचे टायर फुटले अन् ती रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर आदळली. अपघाताची वार्ता कळल्यानंतर या विद्यार्थ्यांचे मित्र आणि त्यांच्या नातेवाईकांची झालेली अवस्था हृदय पिळवटून टाकणारी होती. त्यांचा आक्रोश थरकाप उडविणारा होता. अवघ्या काही तासांपूर्वी हसतखेळत घरातून बाहेर पडणाºया आपल्या मुलांचे कलेवरच घरी घेईल, याची पुसटशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. मनात एकच विचार येतो; या मुलांनी आपल्या मनावर आणि गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवले असते तर आज ते आपल्यात हसतखेळत असते. गेल्यावर्षी असेच विद्यार्थ्यांचे दोन मोठे अपघात नागपूरकरांनी अनुभवले आहेत. अमरावती मार्गावरील कार अपघातात अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला होता. ती कारसुद्धा प्रचंड वेगात होती. भूतकाळात डोकावले आणि या सर्व कार अपघातांवर नजर टाकली तर एक समान गोष्ट लक्षात येत ती म्हणजे गाडीचा वेग आणि वाढते पार्टी कल्चर. विशेषत: अमरावती मार्गावर ढाबे आणि हॉटेल्सची संख्या खूप वाढली आहे. तरुणाई वाढदिवस आणि इतर आनंद साजरा करण्याकरिता शहराबाहेर पडते आणि परत येताना हे अपघात घडतात. कुठलेही संकट सांगून येत नाही. पण काही संकटे आपण स्वत:हूनच ओढवून घेतो हे सुद्धा एक वास्तव आहे.

टॅग्स :Accidentअपघात