शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

14 एप्रिल: सारोळे फोकस..

By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST

महापालिका आयुक्तांसमोरील आव्हाने

महापालिका आयुक्तांसमोरील आव्हाने
दोन महिन्यांनंतर विजयकुमार काळम-पाटील यांच्या रूपाने महापालिकेला नवीन आयुक्त मिळाला. चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीनंतर महापालिकेची विकासकामे खोळंबली आहेत. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे आता करायचे काय, असा सर्वांसमोर प्रश्न आहे. अशा अवस्थेत सूत्रे हाती घेतल्यानंतर काळम-पाटील यांनी लागलीच स्थितीचा अभ्यास करून उत्पन्नाच्या स्रोताकडे लक्ष केंद्रित केले आहे. असे असताना नागरिक सध्या दररोज ज्या समस्येला तोंड देत आहेत तो म्हणजे पाणी व कचरा हा प्रश्न त्यांनी हाती घेतला आहे. पाण्यावर कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्च झाले आहेत. पण पाण्याचे नियोजन जमलेले नाही. तीन व चार दिवसाआड पाण्याचे नियोजन झालेले आहे. पण या नियोजनाप्रमाणे कोठेच पाणी जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. शहरात पाणी कमी मिळते ही ओरड आहे, तर हद्दवाढ भागात विशेष करून विडी घरकूल परिसरात आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाण्याबाबत नागरिकांची ओरड वाढल्यावर पदाधिकार्‍यांनी कंबर कसली. नांदणीचा बीपीटी (ब्रेक प्रेशर टँक) कार्यान्वित झाल्यावर दोन दिवसाआड पाणीपुरवठा होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. सध्या तीन पंप सुरू आहेत. यातून आणखी एक पंप वाढविता येईल. यातून 10 ते 15 एमएलडी पाणी वाढेल, असा अंदाज आहे. 1 मेपासून हे नियोजन अपेक्षित आहे. त्या भरवशावर पदाधिकारी लोकांना आश्वासन देत आहेत, पण हे गणित चुकणार आहे. सध्या बर्‍याच भागात नियोजनानुसार पाणी जात नाही. पाणी थोडे वाढले तर हेच वेळापत्रक दुरुस्त होईल. पण दोन दिवसाआड पाणीपुरवठा मृगजळच ठरणार आहे. मेच्या कडाक्यानंतर पावसाळा सुरू होईल आणि ही समस्या आपोआप सुटेल. पण सध्या लोकांचा संताप पाहता सदस्यांना प्रभागात फिरणे मुश्कील झाले आहे. एकतर चार दिवसाआड पाणी आणि तेही वेळेवर व व्यवस्थित दाबाने वितरित होत नाही. अशात वर्षभराची पाणीप?ी का घेता, असा लोकांचा संताप आहे. गतवर्षी पाणीप?ी माफ करण्याचे गाजर दाखविण्यात आले. यंदाही हीच स्थिती आहे. करवसुलीसाठी तर महापालिकेची पथके फिरत आहेत. पण नागरी सुविधेच्या नावाने मोठी बोंब होत आहे. घंटागाड्यांचा विषय कळीचा मुद्दा बनला आहे. गल्लोगल्लीचा कचरा रस्त्यावर आला आहे. पाणी व कचर्‍याचे नियोजन होणे गरजेचे आहे.
?राजकुमार सारोळे