शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

14 एप्रिल: सारोळे फोकस..

By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST

महापालिका आयुक्तांसमोरील आव्हाने

महापालिका आयुक्तांसमोरील आव्हाने
दोन महिन्यांनंतर विजयकुमार काळम-पाटील यांच्या रूपाने महापालिकेला नवीन आयुक्त मिळाला. चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीनंतर महापालिकेची विकासकामे खोळंबली आहेत. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे आता करायचे काय, असा सर्वांसमोर प्रश्न आहे. अशा अवस्थेत सूत्रे हाती घेतल्यानंतर काळम-पाटील यांनी लागलीच स्थितीचा अभ्यास करून उत्पन्नाच्या स्रोताकडे लक्ष केंद्रित केले आहे. असे असताना नागरिक सध्या दररोज ज्या समस्येला तोंड देत आहेत तो म्हणजे पाणी व कचरा हा प्रश्न त्यांनी हाती घेतला आहे. पाण्यावर कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्च झाले आहेत. पण पाण्याचे नियोजन जमलेले नाही. तीन व चार दिवसाआड पाण्याचे नियोजन झालेले आहे. पण या नियोजनाप्रमाणे कोठेच पाणी जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. शहरात पाणी कमी मिळते ही ओरड आहे, तर हद्दवाढ भागात विशेष करून विडी घरकूल परिसरात आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाण्याबाबत नागरिकांची ओरड वाढल्यावर पदाधिकार्‍यांनी कंबर कसली. नांदणीचा बीपीटी (ब्रेक प्रेशर टँक) कार्यान्वित झाल्यावर दोन दिवसाआड पाणीपुरवठा होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. सध्या तीन पंप सुरू आहेत. यातून आणखी एक पंप वाढविता येईल. यातून 10 ते 15 एमएलडी पाणी वाढेल, असा अंदाज आहे. 1 मेपासून हे नियोजन अपेक्षित आहे. त्या भरवशावर पदाधिकारी लोकांना आश्वासन देत आहेत, पण हे गणित चुकणार आहे. सध्या बर्‍याच भागात नियोजनानुसार पाणी जात नाही. पाणी थोडे वाढले तर हेच वेळापत्रक दुरुस्त होईल. पण दोन दिवसाआड पाणीपुरवठा मृगजळच ठरणार आहे. मेच्या कडाक्यानंतर पावसाळा सुरू होईल आणि ही समस्या आपोआप सुटेल. पण सध्या लोकांचा संताप पाहता सदस्यांना प्रभागात फिरणे मुश्कील झाले आहे. एकतर चार दिवसाआड पाणी आणि तेही वेळेवर व व्यवस्थित दाबाने वितरित होत नाही. अशात वर्षभराची पाणीप?ी का घेता, असा लोकांचा संताप आहे. गतवर्षी पाणीप?ी माफ करण्याचे गाजर दाखविण्यात आले. यंदाही हीच स्थिती आहे. करवसुलीसाठी तर महापालिकेची पथके फिरत आहेत. पण नागरी सुविधेच्या नावाने मोठी बोंब होत आहे. घंटागाड्यांचा विषय कळीचा मुद्दा बनला आहे. गल्लोगल्लीचा कचरा रस्त्यावर आला आहे. पाणी व कचर्‍याचे नियोजन होणे गरजेचे आहे.
?राजकुमार सारोळे