शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तिकिटावरील सबसिडी सोडण्यासाठी रेल्वे करणार आवाहन

By admin | Updated: July 6, 2017 18:36 IST

धर्तीवर रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडण्याचं प्रवाशांना आवाहन करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - गेल्या काही दिवसांपूर्वीच स्वयंपाक गॅसवरील सबसिडी सोडण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं होतं. आता त्याच धर्तीवर रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडण्याचं प्रवाशांना आवाहन करण्यात येणार आहे. मात्र स्वयंपाकाच्या गॅससारखेच रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडणं हे प्रवाशांसाठी ऐच्छिक असणार आहे, असंही रेल्वेनं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. पुढच्या महिन्यापासून रेल्वेकडून नवी योजना लागू केली जाणार असून, योजनेंतर्गत 50 टक्के आणि 100 टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये प्रवाशांना सबसिडी सोडता येणार आहे. रेल्वेला होणारी नुकसानभरपाई भरून निघावी, यासाठीच रेल्वेकडून असं आवाहन करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेला सद्यस्थितीत हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. प्रवाशांनी ऑनलाइन आणि रेल्वे तिकीट खिडकीवरून बुकिंग करणाऱ्या तिकिटांवरील सबसिडी सोडल्यास रेल्वेला त्याचा फायदा होणार आहे. मोदींच्या डिजिटल इंडिया या योजनेला डोळ्यांसमोर ठेवून रेल्वे प्रशासन हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणेच रेल्वेचा तोटा भरून काढण्यासाठी डायनामिक फेअर पद्धत अवलंब केला जाणार आहे. राजधानी, शताब्दी या रेल्वे गाड्यांमध्ये आधीपासूनच डायनामिक फेअर पद्धत लागू करण्यात आली आहे.

आणखी वाचा(पश्चिम रेल्वेवरील प्रवास होणार सुसाट)(ऑनलाइन रेल्वे तिकीट महागण्याची शक्यता)ऑनलाइन रेल्वे तिकीट महाग होण्याची शक्यता आहे. इंडियन रेल्वेने अर्थमंत्रालयाकडे त्या संदर्भातील मागणी केली आहे. ऑनलाइन रेल्वे तिकीटांवर पुन्हा एकदा सर्व्हिस चार्ज लावण्याची मागणी इंडियन रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगवर आधीच अनेक पद्धतीने सूट दिली जाते आहे म्हणूनच रेल्वे तिकिटांवर देण्यात येत असलेली सर्व्हिस चार्जची सूट 30 जून नंतर स्थगित केली आहे. अर्थ मंत्रालयाकडून रेल्वेची ही मागणी स्वीकारली गेली तर ऑनलाइन तिकीट बूक करताना प्रवाशांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागू शकतो. 

यामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर एसी बोगीच्या तिकीटावरील सर्व्हिस टॅक्समध्ये आर्ध्या टक्क्यांनी वाढ केली आहे. सध्या एसी क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 4.5 टक्के टॅक्स भरावा लागतो. जीएसटी लागू झाल्यानंतर हा टॅक्स 5 टक्के होईल. 
विशेष म्हणजे रेल्वे बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाइन रेल्वे तिकिटांवर सर्व्हिस टॅक्स रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्व्हिस टॅक्स कधीपर्यंत रद्द केला जाणार आहे यासंदर्भातील माहिती जेटलींनी दिली नव्हती. 
याआधी रेल्वे प्रवास सुरक्षेच्या कारणास्तव महाग होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली गेली होती. रेल्वे प्रवाशांवर सेफ्टी सेस लावण्याचा विचार केला जातो आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे सेफ्टी फंडासाठी योगदान देण्याचं आवाहन प्रवाशांना केलं होतं. पाच वर्षापूर्वी रेल्वे सेफ्टीसाठी एक लाख करोड देण्याचा निर्णय झाला होता.