शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

काहीही होवो, नद्या जोड प्रकल्प राबवणारच -केंद्र

By admin | Updated: January 14, 2015 00:31 IST

पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून अनेक वर्षांपासून रखडलेला नद्या जोड प्रकल्प पुढे रेटण्याचा मनोदय केंद्र सरकारने व्यक्त केला आहे़

नवी दिल्ली : पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून अनेक वर्षांपासून रखडलेला नद्या जोड प्रकल्प पुढे रेटण्याचा मनोदय केंद्र सरकारने व्यक्त केला आहे़ नद्या जोड प्रकल्प कुठल्याही स्थितीत राबवला जाईल आणि या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर तोडगा शोधला जाईल़ प्रसंगी त्याला डावलून हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असा ठाम निर्धार केंद्र सरकारने मंगळवारी बोलून दाखवला़गेल्या अनेक वर्षांपासून नद्या जोड प्रकल्प रखडलेला आहे़ नद्या जोडणीमुळे सागरी जीवन धोक्यात येईल़ जैवविविधता आणि परिसंस्थेलाही यामुळे धोका उद्भवेल, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे़ त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांनी विरोध चालवला आहे़ या पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्री एम़ वेंकय्या नायडू यांनी ‘भारत जल सप्ताह’प्रसंगी बोलताना नद्या जोड प्रकल्पाच्या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली़ आमचे काही पर्यावरणवादी मित्र नद्या जोड प्रकल्पाबाबत चिंतित आहेत़ लोकशाहीत आवाज उठवण्याचा अधिकार आहे़ तो उठत असेल तर उठू द्या;मात्र त्याचे उत्तरही आहे़ आम्ही प्राधान्यक्रमाने नद्या जोड प्रकल्प राबवणार, मग काहीही होवो, असे नायडू यावेळी म्हणाले़ या प्रकल्पाच्या मार्गात कुठलीही बाधा येवो, तिच्यावर तोडगा काढला जाईल वा तिला मार्गातून हटविले जाईल़ विकसित देश आपल्याला ‘शिकवत’ आहेत़ आता आपल्यालाही विकसित व्हावे लागेल़, असेही त्यांनी स्पष्ट केले़ यावेळी पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जल सुरक्षेसाठी ठोस जल व्यवस्थापनेवर भर दिला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)