शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अनुपम खेर झाला उपहासाचा विषय

By admin | Updated: February 1, 2016 01:08 IST

बॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. माणसाला आपल्या शब्दांत कसा शब्दच्छळ करावा लागतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे अनुपम खेर. याची दोन कारणे आहेत.

लोकमत स्पेशल, अनुज अलंकारबॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. माणसाला आपल्या शब्दांत कसा शब्दच्छळ करावा लागतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे अनुपम खेर. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे आहे की, मोदी सरकारने त्यांना पद्मभूषण दिले असून, दुसरे कारण हे आहे की, काही वर्षांपूर्वी याच अनुपम खेर यांनी या पुरस्कारांना ‘सरकारची चमचेगिरी’ या शब्दांत संबोधले होते. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनुपम खेर यांचे दोन टिष्ट्वट गाजत आहेत. एका टिष्ट्वटमध्ये ते या पुरस्कारावर टीका करीत असून, दुसऱ्या टिष्ट्वटमध्ये ते मोदी सरकारकडून मिळालेला पद्म पुरस्कार आपल्या जीवनातील सर्वात आनंदी दिवस असे संबोधून स्वत:ला धन्य मानत आहेत. अनुपम खेर यांच्याशिवाय मधुर भांडारकर आणि उत्तर प्रदेशच्या लोकगायिका मालिनी अवस्थी यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. अनुपम खेर यांच्यासह या दोघांनी असहिष्णुतेच्या प्रकरणी सरकारच्या बाजूने बिगुल वाजविला होता आणि दिल्लीत एक रॅलीही काढली होती. हे तिघेही मोदी सरकारच्या जवळचे असल्याने त्यांना हे पुरस्कार मिळाले यात संशय नाही. त्याचमुळे या तिघांवर सोशल मीडियातून टीकाटिप्पणीला सामोरे जावे लागत आहे.त्यातही अनुपम खेर सर्वात जास्त चर्चेत आहेत. ही बाब त्यांना पद्म पुरस्कार मिळाला म्हणून नव्हे, तर एकेकाळी ते स्वत:ला गैरराजकीय व्यक्ती समजत होते.चित्रपट क्षेत्रात त्यांनी शानदार यश मिळविले आहे. मात्र, आता त्यांची दररोजची राजकीय वक्तव्ये पाहता एके दिवशी ते भाजपाचे अधिकृत सदस्य बनल्यास आश्चर्य वाटावयास नको. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपा त्यांना सिमला येथून उमेदवारी देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. कदाचित त्यांना राज्यसभेवर घेतले जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनुपम खेर राजकारणात सामील होणे ही काही चूक नाही. त्यांना तो नागरी अधिकार आहे. त्याबद्दल कोणी सवालही उपस्थित करू शकत नाही. आणखी ते राजकीय नेते बनलेले नाहीत; पण राजकारणाच्या दलदलीत ते आपल्या विश्वासार्हतेला डाग लावून घेतील काय, असा सवाल निर्माण झाला आहे. येणारा काळच त्याचे उत्तर देईल. आता ते काहीही बोलले तरी ती बातमी होईल आणि सोशल मीडियावर चांगल्या-वाईट प्रतिक्रिया येतील हे मात्र निश्चित.