शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

अनुपम खेर झाला उपहासाचा विषय

By admin | Updated: February 1, 2016 01:08 IST

बॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. माणसाला आपल्या शब्दांत कसा शब्दच्छळ करावा लागतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे अनुपम खेर. याची दोन कारणे आहेत.

लोकमत स्पेशल, अनुज अलंकारबॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. माणसाला आपल्या शब्दांत कसा शब्दच्छळ करावा लागतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे अनुपम खेर. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे आहे की, मोदी सरकारने त्यांना पद्मभूषण दिले असून, दुसरे कारण हे आहे की, काही वर्षांपूर्वी याच अनुपम खेर यांनी या पुरस्कारांना ‘सरकारची चमचेगिरी’ या शब्दांत संबोधले होते. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनुपम खेर यांचे दोन टिष्ट्वट गाजत आहेत. एका टिष्ट्वटमध्ये ते या पुरस्कारावर टीका करीत असून, दुसऱ्या टिष्ट्वटमध्ये ते मोदी सरकारकडून मिळालेला पद्म पुरस्कार आपल्या जीवनातील सर्वात आनंदी दिवस असे संबोधून स्वत:ला धन्य मानत आहेत. अनुपम खेर यांच्याशिवाय मधुर भांडारकर आणि उत्तर प्रदेशच्या लोकगायिका मालिनी अवस्थी यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. अनुपम खेर यांच्यासह या दोघांनी असहिष्णुतेच्या प्रकरणी सरकारच्या बाजूने बिगुल वाजविला होता आणि दिल्लीत एक रॅलीही काढली होती. हे तिघेही मोदी सरकारच्या जवळचे असल्याने त्यांना हे पुरस्कार मिळाले यात संशय नाही. त्याचमुळे या तिघांवर सोशल मीडियातून टीकाटिप्पणीला सामोरे जावे लागत आहे.त्यातही अनुपम खेर सर्वात जास्त चर्चेत आहेत. ही बाब त्यांना पद्म पुरस्कार मिळाला म्हणून नव्हे, तर एकेकाळी ते स्वत:ला गैरराजकीय व्यक्ती समजत होते.चित्रपट क्षेत्रात त्यांनी शानदार यश मिळविले आहे. मात्र, आता त्यांची दररोजची राजकीय वक्तव्ये पाहता एके दिवशी ते भाजपाचे अधिकृत सदस्य बनल्यास आश्चर्य वाटावयास नको. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपा त्यांना सिमला येथून उमेदवारी देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. कदाचित त्यांना राज्यसभेवर घेतले जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनुपम खेर राजकारणात सामील होणे ही काही चूक नाही. त्यांना तो नागरी अधिकार आहे. त्याबद्दल कोणी सवालही उपस्थित करू शकत नाही. आणखी ते राजकीय नेते बनलेले नाहीत; पण राजकारणाच्या दलदलीत ते आपल्या विश्वासार्हतेला डाग लावून घेतील काय, असा सवाल निर्माण झाला आहे. येणारा काळच त्याचे उत्तर देईल. आता ते काहीही बोलले तरी ती बातमी होईल आणि सोशल मीडियावर चांगल्या-वाईट प्रतिक्रिया येतील हे मात्र निश्चित.