शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अनुपम खेर झाला उपहासाचा विषय

By admin | Updated: February 1, 2016 01:08 IST

बॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. माणसाला आपल्या शब्दांत कसा शब्दच्छळ करावा लागतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे अनुपम खेर. याची दोन कारणे आहेत.

लोकमत स्पेशल, अनुज अलंकारबॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. माणसाला आपल्या शब्दांत कसा शब्दच्छळ करावा लागतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे अनुपम खेर. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे आहे की, मोदी सरकारने त्यांना पद्मभूषण दिले असून, दुसरे कारण हे आहे की, काही वर्षांपूर्वी याच अनुपम खेर यांनी या पुरस्कारांना ‘सरकारची चमचेगिरी’ या शब्दांत संबोधले होते. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनुपम खेर यांचे दोन टिष्ट्वट गाजत आहेत. एका टिष्ट्वटमध्ये ते या पुरस्कारावर टीका करीत असून, दुसऱ्या टिष्ट्वटमध्ये ते मोदी सरकारकडून मिळालेला पद्म पुरस्कार आपल्या जीवनातील सर्वात आनंदी दिवस असे संबोधून स्वत:ला धन्य मानत आहेत. अनुपम खेर यांच्याशिवाय मधुर भांडारकर आणि उत्तर प्रदेशच्या लोकगायिका मालिनी अवस्थी यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. अनुपम खेर यांच्यासह या दोघांनी असहिष्णुतेच्या प्रकरणी सरकारच्या बाजूने बिगुल वाजविला होता आणि दिल्लीत एक रॅलीही काढली होती. हे तिघेही मोदी सरकारच्या जवळचे असल्याने त्यांना हे पुरस्कार मिळाले यात संशय नाही. त्याचमुळे या तिघांवर सोशल मीडियातून टीकाटिप्पणीला सामोरे जावे लागत आहे.त्यातही अनुपम खेर सर्वात जास्त चर्चेत आहेत. ही बाब त्यांना पद्म पुरस्कार मिळाला म्हणून नव्हे, तर एकेकाळी ते स्वत:ला गैरराजकीय व्यक्ती समजत होते.चित्रपट क्षेत्रात त्यांनी शानदार यश मिळविले आहे. मात्र, आता त्यांची दररोजची राजकीय वक्तव्ये पाहता एके दिवशी ते भाजपाचे अधिकृत सदस्य बनल्यास आश्चर्य वाटावयास नको. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपा त्यांना सिमला येथून उमेदवारी देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. कदाचित त्यांना राज्यसभेवर घेतले जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनुपम खेर राजकारणात सामील होणे ही काही चूक नाही. त्यांना तो नागरी अधिकार आहे. त्याबद्दल कोणी सवालही उपस्थित करू शकत नाही. आणखी ते राजकीय नेते बनलेले नाहीत; पण राजकारणाच्या दलदलीत ते आपल्या विश्वासार्हतेला डाग लावून घेतील काय, असा सवाल निर्माण झाला आहे. येणारा काळच त्याचे उत्तर देईल. आता ते काहीही बोलले तरी ती बातमी होईल आणि सोशल मीडियावर चांगल्या-वाईट प्रतिक्रिया येतील हे मात्र निश्चित.