शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

शीखविरोधी दंगलीचे खटले पुन्हा नव्याने !

By admin | Updated: June 13, 2016 06:21 IST

एसआयटीने इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीशी संबंधित ७५ खटले पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- पंजाबमधे आगामी विधानसभेचा निवडणूक ज्वर एकीकडे वाढत असताना केंद्र सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीशी संबंधित ७५ खटले पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येनंतर शीख समुदायाविरुद्ध भडकलेल्या दंगलीत देशात ३,000 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. एकट्या दिल्लीतच २,७३३ लोक ठार झाले होते. शीखविरोधी दंगलीच्या आरोपावरून ५८७ गुन्हे नोंदवले गेले. यापैकी २४१ गुन्हे ज्यांच्या विरोधात घडले ते फिर्यादी तक्रार करण्यासाठी अथवा साक्षीपुरावे सादर करण्यासाठी पुढे आले नाहीत. अंतत: या गुन्ह्यांचा तपास बंद करावा लागला. २00६ साली १ आणि २0१३ साली चार खटले पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले. त्यात ३५ आरोपींना शिक्षा झाली. तथापि २३५ गुन्ह्यांशी संबंधित खटले आजही फाइल बंद अवस्थेत आहेत. या प्रकरणांच्या समीक्षेनंतर केंद्र सरकारच्या एसआयटीने ७५ खटले पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खटल्यातील साक्षीदारांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे यासाठी एसआयटीतर्फे लवकरच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. काही खटल्यांच्या सार्वजनिक सुनावण्या करण्याचाही एसआयटीचा इरादा आहे.शीख समुदायविरोधी दंगलींच्या खटल्याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात नरेंद्र मोदींना एक पत्र पाठवले होते. १९८४ च्या दंगलीसंदर्भात एकाही खटल्याची सुनावणी नव्याने सुरू करण्यास केंद्र सरकारची एसआयटी असमर्थ ठरली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीच्या राज्य सरकारला एसआयटी नियुक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी केजरीवाल यांनी या पत्रात केली होती. त्यांच्या पत्राच्या आधारेच केंद्र सरकारच्या एसआयटीने ताजा निर्णय घेतला आहे, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.>अचानक निर्णयामागे पंजाब निवडणूककेंद्र सरकारच्या यंत्रणेमार्फत अचानक हा निर्णय घेतला जाण्यामागे पंजाब विधानसभेची आगामी निवडणूक हे मुख्य कारण असल्याची चर्चा आहे. पंजाबच्या अकाली दल सरकारमधे भाजपा मित्रपक्ष आहे. अँटी इनकम्बन्सीमुळे आगामी निवडणुकीत अकाली दल-भाजपा आघाडीची स्थिती फारशी चांगली नाही. उडता पंजाब चित्रपटाच्या गाजत असलेल्या ताज्या वादात केंद्रीय सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्हे लागल्याने मोदी सरकारवरही नामुष्की ओढवली आहे. पंजाबमधे खरी झुंज केजरीवालांचा ‘आप’ व काँग्रेस पक्षातच आहे, असे ताजे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व ‘आप’मध्ये वितुष्ट निर्माण व्हावे, पंजाबी अस्मितेला काँग्रेसच्या विरोधात पुन्हा फुंकर घालता यावी, या इराद्याने १९८४ च्या दंगलीच्या जखमा पुन्हा ओल्या करण्याचा हा प्रयत्न आहे, असे बोलले जाते.