शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

विकासविरोधी दहशतवाद ही दोन्ही राष्ट्रांची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 07:03 IST

दिल्ली आणि गुजरातनंतर मुंबईत दाखल झालेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली

मुंबई : दिल्ली आणि गुजरातनंतर मुंबईत दाखल झालेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर बिझनेस समीटमध्ये सहभागी होत दहशतवाद ही भारत आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांची समस्या असल्याचे सांगितले. मात्र, आता परिस्थिती बदलली असून कोणत्याही दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी दोन्ही राष्ट्रे सज्ज असल्याचेही ते म्हणाले.हॉटेल ताज येथे आयोजित ‘भारत-इस्रायल उद्योग संमेलन-२०१८’मध्ये बेंजामिन नेतान्याहू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही देशांतील उद्योजक उपस्थित होते. इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमॉन यांनी प्रास्ताविक केले. या वेळी नेतान्याहू म्हणाले की, भारत आणि इस्रायलची फार जुनी मैत्री असून दोन्ही देशांना उज्ज्वल भविष्य आहे. इस्रायलमध्ये चांगले संशोधक, तंत्रज्ञ आहेत. विकासाभिमुख वातावरण आहे. दोन्ही देशांच्या उद्योगवाढीसाठी चांगल्या संधी आहेत. आता एकत्र काम करून विकास साधायचा आहे.गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळबिझनेस लीडर असलेल्या महाराष्ट्रात इस्रायलच्या उद्योगपतींनी उद्योग सुरू करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात केले. इस्रायलने केलेल्या कृषी क्रांतीचे जगभर कौतुक होत आहे. भारताने वेळोवेळी इस्रायली कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साधला आहे. उत्पादनवाढीसाठी होत असलेले विविध संशोधन आणि प्रयोग याचा फायदा कृषी उद्योगाला होत आहे.महाराष्ट्रात उद्योगवाढीस पोषक वातावरण आहे. देशातील अन्य राज्यांपेक्षा सर्वांत मोठी ५० टक्के आर्थिक गुंतवणूक या राज्यात झाली आहे. इस्रायलच्या उद्योजकांसाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ व संधी आहे. दहशतवादासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दोन्ही राष्ट्रे दहशतवादाविरुद्ध लढत आहेत. आता एकत्रपणे लढून दहशतवाद मोडून काढायचा आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू