शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

विकासविरोधी दहशतवाद ही दोन्ही राष्ट्रांची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 07:03 IST

दिल्ली आणि गुजरातनंतर मुंबईत दाखल झालेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली

मुंबई : दिल्ली आणि गुजरातनंतर मुंबईत दाखल झालेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर बिझनेस समीटमध्ये सहभागी होत दहशतवाद ही भारत आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांची समस्या असल्याचे सांगितले. मात्र, आता परिस्थिती बदलली असून कोणत्याही दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी दोन्ही राष्ट्रे सज्ज असल्याचेही ते म्हणाले.हॉटेल ताज येथे आयोजित ‘भारत-इस्रायल उद्योग संमेलन-२०१८’मध्ये बेंजामिन नेतान्याहू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही देशांतील उद्योजक उपस्थित होते. इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमॉन यांनी प्रास्ताविक केले. या वेळी नेतान्याहू म्हणाले की, भारत आणि इस्रायलची फार जुनी मैत्री असून दोन्ही देशांना उज्ज्वल भविष्य आहे. इस्रायलमध्ये चांगले संशोधक, तंत्रज्ञ आहेत. विकासाभिमुख वातावरण आहे. दोन्ही देशांच्या उद्योगवाढीसाठी चांगल्या संधी आहेत. आता एकत्र काम करून विकास साधायचा आहे.गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळबिझनेस लीडर असलेल्या महाराष्ट्रात इस्रायलच्या उद्योगपतींनी उद्योग सुरू करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात केले. इस्रायलने केलेल्या कृषी क्रांतीचे जगभर कौतुक होत आहे. भारताने वेळोवेळी इस्रायली कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साधला आहे. उत्पादनवाढीसाठी होत असलेले विविध संशोधन आणि प्रयोग याचा फायदा कृषी उद्योगाला होत आहे.महाराष्ट्रात उद्योगवाढीस पोषक वातावरण आहे. देशातील अन्य राज्यांपेक्षा सर्वांत मोठी ५० टक्के आर्थिक गुंतवणूक या राज्यात झाली आहे. इस्रायलच्या उद्योजकांसाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ व संधी आहे. दहशतवादासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दोन्ही राष्ट्रे दहशतवादाविरुद्ध लढत आहेत. आता एकत्रपणे लढून दहशतवाद मोडून काढायचा आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू