शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जशास तसे उत्तर देऊ, भारताचा पाकला इशारा, दोन अतिरेकी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:22 IST

पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मूतील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय चौक्या व गावांंना लक्ष्य करीत तोफमारा आणि गोळीबार केला. त्यामुळे गावांत अडकलेल्या ७२७ रहिवाशांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. दरम्यान, पाकच्या गोळीबारात सहा नागरिक जखमी झाले होते.

जम्मू/श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मूतील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय चौक्या व गावांंना लक्ष्य करीत तोफमारा आणि गोळीबार केला. त्यामुळे गावांत अडकलेल्या ७२७ रहिवाशांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. दरम्यान, पाकच्या गोळीबारात सहा नागरिक जखमी झाले होते.हे असेच सुरू राहिले, तर आम्ही याच भाषेत प्रत्युत्तर देऊ , असे भारताने म्हटले आहे. पाकच्या गोळीबारात आमचा एकही सैनिक वा रहिवासी यांना इजा झाली, तर तुमचीही भारतीय जवान खैर करणार नाही, असे भारताच्या डायरेक्टर जनरल आॅफ मिलिटरी आॅपरेश्न्स ए. के. भट यांनी पाकिस्तानी लष्करी अधिका-यांना कळविले आहे.जोराफार्म गावातील ७८ गुज्जर पाकिस्तानच्या गोळीबारात अडकले होते, तसेच अर्नियातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या अन्य गावातील रहिवासीही तोफमारा आणि गोळीबारात अडकल्याने त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. चालू आठवड्यात आंतरराष्टÑीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने गोळीबारासोबत तोफमारा सुरू आहे. (वृत्तसंस्था)>दहशतवाद्यांना अटकसीमा सशस्त्र दलाच्या पथकावर बुधवारी बनिहाल येथे करण्यात आलेल्या हल्ल्यातील दोन अतिरेक्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या अतिरेकी हल्ल्यात एक जवान शहीद झाला, तर अन्य एक जवानजखमीझाला होता. या अतिरेकी हल्ल्यानंतर बनिहाल पट्ट्यात पोलिसांनी २४ तासांची कसून शोधमोहीम राबवत गजनफर आणि अरिफ या दोन अतिरेक्यांना अटक केली, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहन लाल यांनी सांगितले.>भारतावरच उलटा आरोप...शस्त्रबंदी झुगारत आंतरराष्टÑीय सीमाआणि नियंत्रण रेषेगलगतच्या भारतीय चौक्या आणि नागरी वस्त्यांना सातत्याने लक्ष्य करणाºया पाकिस्तानने उलट बोंबा मारल्या आहेत. भारतीय लष्कराने छापर, चारवाह आणि हरपाल भागात केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे सहा नागरिक ठार झाले, असा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे.पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या हल्ल्यात आमचे २६ नागरिकही जखमी झाले आहेत.अनेक जण जखमीगुरुवारी पाकिस्तानने १५हून अधिक भारतीय सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानने नागरी वस्तीत केलेल्या अंधाधुंद गोळीबारात अनेक रहिवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.