शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

जशास तसे उत्तर देऊ, भारताचा पाकला इशारा, दोन अतिरेकी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:22 IST

पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मूतील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय चौक्या व गावांंना लक्ष्य करीत तोफमारा आणि गोळीबार केला. त्यामुळे गावांत अडकलेल्या ७२७ रहिवाशांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. दरम्यान, पाकच्या गोळीबारात सहा नागरिक जखमी झाले होते.

जम्मू/श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मूतील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय चौक्या व गावांंना लक्ष्य करीत तोफमारा आणि गोळीबार केला. त्यामुळे गावांत अडकलेल्या ७२७ रहिवाशांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. दरम्यान, पाकच्या गोळीबारात सहा नागरिक जखमी झाले होते.हे असेच सुरू राहिले, तर आम्ही याच भाषेत प्रत्युत्तर देऊ , असे भारताने म्हटले आहे. पाकच्या गोळीबारात आमचा एकही सैनिक वा रहिवासी यांना इजा झाली, तर तुमचीही भारतीय जवान खैर करणार नाही, असे भारताच्या डायरेक्टर जनरल आॅफ मिलिटरी आॅपरेश्न्स ए. के. भट यांनी पाकिस्तानी लष्करी अधिका-यांना कळविले आहे.जोराफार्म गावातील ७८ गुज्जर पाकिस्तानच्या गोळीबारात अडकले होते, तसेच अर्नियातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या अन्य गावातील रहिवासीही तोफमारा आणि गोळीबारात अडकल्याने त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. चालू आठवड्यात आंतरराष्टÑीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने गोळीबारासोबत तोफमारा सुरू आहे. (वृत्तसंस्था)>दहशतवाद्यांना अटकसीमा सशस्त्र दलाच्या पथकावर बुधवारी बनिहाल येथे करण्यात आलेल्या हल्ल्यातील दोन अतिरेक्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या अतिरेकी हल्ल्यात एक जवान शहीद झाला, तर अन्य एक जवानजखमीझाला होता. या अतिरेकी हल्ल्यानंतर बनिहाल पट्ट्यात पोलिसांनी २४ तासांची कसून शोधमोहीम राबवत गजनफर आणि अरिफ या दोन अतिरेक्यांना अटक केली, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहन लाल यांनी सांगितले.>भारतावरच उलटा आरोप...शस्त्रबंदी झुगारत आंतरराष्टÑीय सीमाआणि नियंत्रण रेषेगलगतच्या भारतीय चौक्या आणि नागरी वस्त्यांना सातत्याने लक्ष्य करणाºया पाकिस्तानने उलट बोंबा मारल्या आहेत. भारतीय लष्कराने छापर, चारवाह आणि हरपाल भागात केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे सहा नागरिक ठार झाले, असा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे.पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या हल्ल्यात आमचे २६ नागरिकही जखमी झाले आहेत.अनेक जण जखमीगुरुवारी पाकिस्तानने १५हून अधिक भारतीय सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानने नागरी वस्तीत केलेल्या अंधाधुंद गोळीबारात अनेक रहिवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.