शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

जशास तसे उत्तर देऊ, भारताचा पाकला इशारा, दोन अतिरेकी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:22 IST

पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मूतील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय चौक्या व गावांंना लक्ष्य करीत तोफमारा आणि गोळीबार केला. त्यामुळे गावांत अडकलेल्या ७२७ रहिवाशांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. दरम्यान, पाकच्या गोळीबारात सहा नागरिक जखमी झाले होते.

जम्मू/श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मूतील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय चौक्या व गावांंना लक्ष्य करीत तोफमारा आणि गोळीबार केला. त्यामुळे गावांत अडकलेल्या ७२७ रहिवाशांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. दरम्यान, पाकच्या गोळीबारात सहा नागरिक जखमी झाले होते.हे असेच सुरू राहिले, तर आम्ही याच भाषेत प्रत्युत्तर देऊ , असे भारताने म्हटले आहे. पाकच्या गोळीबारात आमचा एकही सैनिक वा रहिवासी यांना इजा झाली, तर तुमचीही भारतीय जवान खैर करणार नाही, असे भारताच्या डायरेक्टर जनरल आॅफ मिलिटरी आॅपरेश्न्स ए. के. भट यांनी पाकिस्तानी लष्करी अधिका-यांना कळविले आहे.जोराफार्म गावातील ७८ गुज्जर पाकिस्तानच्या गोळीबारात अडकले होते, तसेच अर्नियातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या अन्य गावातील रहिवासीही तोफमारा आणि गोळीबारात अडकल्याने त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. चालू आठवड्यात आंतरराष्टÑीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने गोळीबारासोबत तोफमारा सुरू आहे. (वृत्तसंस्था)>दहशतवाद्यांना अटकसीमा सशस्त्र दलाच्या पथकावर बुधवारी बनिहाल येथे करण्यात आलेल्या हल्ल्यातील दोन अतिरेक्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या अतिरेकी हल्ल्यात एक जवान शहीद झाला, तर अन्य एक जवानजखमीझाला होता. या अतिरेकी हल्ल्यानंतर बनिहाल पट्ट्यात पोलिसांनी २४ तासांची कसून शोधमोहीम राबवत गजनफर आणि अरिफ या दोन अतिरेक्यांना अटक केली, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहन लाल यांनी सांगितले.>भारतावरच उलटा आरोप...शस्त्रबंदी झुगारत आंतरराष्टÑीय सीमाआणि नियंत्रण रेषेगलगतच्या भारतीय चौक्या आणि नागरी वस्त्यांना सातत्याने लक्ष्य करणाºया पाकिस्तानने उलट बोंबा मारल्या आहेत. भारतीय लष्कराने छापर, चारवाह आणि हरपाल भागात केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे सहा नागरिक ठार झाले, असा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे.पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या हल्ल्यात आमचे २६ नागरिकही जखमी झाले आहेत.अनेक जण जखमीगुरुवारी पाकिस्तानने १५हून अधिक भारतीय सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानने नागरी वस्तीत केलेल्या अंधाधुंद गोळीबारात अनेक रहिवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.