शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘भिम’ला ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ने उत्तर

By admin | Updated: April 15, 2017 01:26 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खराखुरा वारसदार कोण? यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. निवडणुकांमध्ये बाबासाहेबांच्या नावाने मते देणारी पेटी

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खराखुरा वारसदार कोण? यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. निवडणुकांमध्ये बाबासाहेबांच्या नावाने मते देणारी पेटी हाती राखण्यासाठी दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने त्या वारशावर दावा करीत आहेत. कांशीराम यांच्यानंतर मायावती यांनी त्या वारशावर वर्चस्व निर्माण केले; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने त्यात तडा निर्माण केला. दलित मते ही वर्षानुवर्षे काँग्रेसकडेच होती. त्याला मायावती यांनी असाच तडाखा दिला होता.मोदी हे सत्तारूढ होताच महात्मा गांधींपासून ते वल्लभभाई पटेल, मदनमोहन मालवीय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशावर भाजपाने दावा केला. काँग्रेसने नेहरू कुटुंबाशिवाय इतर कोणत्याही पुढाऱ्याला पुढे येऊ दिले नाही, असा आरोप काँग्रेसवर भाजपाने केला व येथूनच भाजपा व काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू झाला. मोदी यांनी आंबेडकर यांच्या जयंती दिनी (शुक्रवारी) नागपूरला जाऊन आंबेडकरांना आदरांजली वाहिली व आंबेडकरांच्या अनुयायींना संदेशही दिला. दीक्षा भूमीवर जाऊन बाबासाहेबांचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. इकडे काँग्रेसमध्ये आम्हीच आंबेडकरांच्या वारशाचे अस्सल राखणदार आहोत हे कसे पटवून द्यावे याबद्दल अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी, काँग्रेसने बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित संकेतस्थळ (वेबसाइट) सुरू केले. त्याचे नाव ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ असून, त्यात बाबासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे चित्रण आहे आणि काँग्रेसने बाबासाहेबांना किती महत्त्व दिले हे दाखवण्याचा प्रयत्नही. या संकेतस्थळावर चार भागांत ३०० दुर्मीळ छायाचित्रे आहेत. त्यातून बाबासाहेब आणि काँग्रेस नेत्यांतील संबंधांचे कथन होते. त्यावर ९७ दुर्मीळ दस्तावेजही उपलब्ध करण्यात आले आहेत.एकीकडे मोदी यांनी सुरू केलेले ‘भिम अ‍ॅप’ तर त्याला उत्तर म्हणून काँग्रेसचे हे ‘संकेतस्थळ’. बाबासाहेबांचा खराखुरा वारसदार काँग्रेसच आहे व त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम करीत आहे हे दलितांनी समजून घ्यावे असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.आम्ही कधीही देखावा करीत नाही - अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष के. राजू म्हणाले की, काँग्रेस बाबासाहेबांचे वारसदार आम्हीच आहोत याचा देखावा करीत नाही. दलितांचे हक्क मिळण्यासाठी काँग्रेस लढत आहे व लढत राहील. बाबासाहेबांच्या वारशावरून आता त्रिकोणी संघर्ष सुरू झाला आहे.त्यात भाजपा आणि बसपचा समावेश आहे. आता दलित काय निर्णय घेतात याकडे तिन्ही पक्षांची नजर आहे.