शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

‘भिम’ला ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ने उत्तर

By admin | Updated: April 15, 2017 01:26 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खराखुरा वारसदार कोण? यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. निवडणुकांमध्ये बाबासाहेबांच्या नावाने मते देणारी पेटी

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खराखुरा वारसदार कोण? यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. निवडणुकांमध्ये बाबासाहेबांच्या नावाने मते देणारी पेटी हाती राखण्यासाठी दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने त्या वारशावर दावा करीत आहेत. कांशीराम यांच्यानंतर मायावती यांनी त्या वारशावर वर्चस्व निर्माण केले; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने त्यात तडा निर्माण केला. दलित मते ही वर्षानुवर्षे काँग्रेसकडेच होती. त्याला मायावती यांनी असाच तडाखा दिला होता.मोदी हे सत्तारूढ होताच महात्मा गांधींपासून ते वल्लभभाई पटेल, मदनमोहन मालवीय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशावर भाजपाने दावा केला. काँग्रेसने नेहरू कुटुंबाशिवाय इतर कोणत्याही पुढाऱ्याला पुढे येऊ दिले नाही, असा आरोप काँग्रेसवर भाजपाने केला व येथूनच भाजपा व काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू झाला. मोदी यांनी आंबेडकर यांच्या जयंती दिनी (शुक्रवारी) नागपूरला जाऊन आंबेडकरांना आदरांजली वाहिली व आंबेडकरांच्या अनुयायींना संदेशही दिला. दीक्षा भूमीवर जाऊन बाबासाहेबांचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. इकडे काँग्रेसमध्ये आम्हीच आंबेडकरांच्या वारशाचे अस्सल राखणदार आहोत हे कसे पटवून द्यावे याबद्दल अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी, काँग्रेसने बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित संकेतस्थळ (वेबसाइट) सुरू केले. त्याचे नाव ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ असून, त्यात बाबासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे चित्रण आहे आणि काँग्रेसने बाबासाहेबांना किती महत्त्व दिले हे दाखवण्याचा प्रयत्नही. या संकेतस्थळावर चार भागांत ३०० दुर्मीळ छायाचित्रे आहेत. त्यातून बाबासाहेब आणि काँग्रेस नेत्यांतील संबंधांचे कथन होते. त्यावर ९७ दुर्मीळ दस्तावेजही उपलब्ध करण्यात आले आहेत.एकीकडे मोदी यांनी सुरू केलेले ‘भिम अ‍ॅप’ तर त्याला उत्तर म्हणून काँग्रेसचे हे ‘संकेतस्थळ’. बाबासाहेबांचा खराखुरा वारसदार काँग्रेसच आहे व त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम करीत आहे हे दलितांनी समजून घ्यावे असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.आम्ही कधीही देखावा करीत नाही - अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष के. राजू म्हणाले की, काँग्रेस बाबासाहेबांचे वारसदार आम्हीच आहोत याचा देखावा करीत नाही. दलितांचे हक्क मिळण्यासाठी काँग्रेस लढत आहे व लढत राहील. बाबासाहेबांच्या वारशावरून आता त्रिकोणी संघर्ष सुरू झाला आहे.त्यात भाजपा आणि बसपचा समावेश आहे. आता दलित काय निर्णय घेतात याकडे तिन्ही पक्षांची नजर आहे.