शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘भिम’ला ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ने उत्तर

By admin | Updated: April 15, 2017 01:26 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खराखुरा वारसदार कोण? यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. निवडणुकांमध्ये बाबासाहेबांच्या नावाने मते देणारी पेटी

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खराखुरा वारसदार कोण? यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. निवडणुकांमध्ये बाबासाहेबांच्या नावाने मते देणारी पेटी हाती राखण्यासाठी दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने त्या वारशावर दावा करीत आहेत. कांशीराम यांच्यानंतर मायावती यांनी त्या वारशावर वर्चस्व निर्माण केले; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने त्यात तडा निर्माण केला. दलित मते ही वर्षानुवर्षे काँग्रेसकडेच होती. त्याला मायावती यांनी असाच तडाखा दिला होता.मोदी हे सत्तारूढ होताच महात्मा गांधींपासून ते वल्लभभाई पटेल, मदनमोहन मालवीय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशावर भाजपाने दावा केला. काँग्रेसने नेहरू कुटुंबाशिवाय इतर कोणत्याही पुढाऱ्याला पुढे येऊ दिले नाही, असा आरोप काँग्रेसवर भाजपाने केला व येथूनच भाजपा व काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू झाला. मोदी यांनी आंबेडकर यांच्या जयंती दिनी (शुक्रवारी) नागपूरला जाऊन आंबेडकरांना आदरांजली वाहिली व आंबेडकरांच्या अनुयायींना संदेशही दिला. दीक्षा भूमीवर जाऊन बाबासाहेबांचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. इकडे काँग्रेसमध्ये आम्हीच आंबेडकरांच्या वारशाचे अस्सल राखणदार आहोत हे कसे पटवून द्यावे याबद्दल अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी, काँग्रेसने बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित संकेतस्थळ (वेबसाइट) सुरू केले. त्याचे नाव ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ असून, त्यात बाबासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे चित्रण आहे आणि काँग्रेसने बाबासाहेबांना किती महत्त्व दिले हे दाखवण्याचा प्रयत्नही. या संकेतस्थळावर चार भागांत ३०० दुर्मीळ छायाचित्रे आहेत. त्यातून बाबासाहेब आणि काँग्रेस नेत्यांतील संबंधांचे कथन होते. त्यावर ९७ दुर्मीळ दस्तावेजही उपलब्ध करण्यात आले आहेत.एकीकडे मोदी यांनी सुरू केलेले ‘भिम अ‍ॅप’ तर त्याला उत्तर म्हणून काँग्रेसचे हे ‘संकेतस्थळ’. बाबासाहेबांचा खराखुरा वारसदार काँग्रेसच आहे व त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम करीत आहे हे दलितांनी समजून घ्यावे असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.आम्ही कधीही देखावा करीत नाही - अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष के. राजू म्हणाले की, काँग्रेस बाबासाहेबांचे वारसदार आम्हीच आहोत याचा देखावा करीत नाही. दलितांचे हक्क मिळण्यासाठी काँग्रेस लढत आहे व लढत राहील. बाबासाहेबांच्या वारशावरून आता त्रिकोणी संघर्ष सुरू झाला आहे.त्यात भाजपा आणि बसपचा समावेश आहे. आता दलित काय निर्णय घेतात याकडे तिन्ही पक्षांची नजर आहे.