शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लक्षद्वीपमधील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली, स्वतंत्र महामंडळाचीही स्थापना होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 03:05 IST

बंगालच्या उपसागरातील लक्षद्वीप बेटसमूहातील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली करण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून, तेथील पर्यटनाच्या विकासासाठी स्वतंत्र लक्षद्वीप पर्यटन विकास महामंडळही स्थापन करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातील लक्षद्वीप बेटसमूहातील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली करण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून, तेथील पर्यटनाच्या विकासासाठी स्वतंत्र लक्षद्वीप पर्यटन विकास महामंडळही स्थापन करण्यात येणार आहे.लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार बेटसमूहांतील २६ बेटांना समन्वित विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली असून, त्यासाठी गेल्या जूनमध्ये ‘आयलंड डेव्हलपमेंट एजन्सी’ही स्थापन केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लक्षद्वीपमधील १२ नव्या बेटांचा विकास होणार आहे.लक्षद्वीप हा २९ लहान-मोठ्या बेटांचा समूह आहे. त्यापैकी निम्म्या बेटांवर आदिम जमातींची वस्ती आहे. लक्षद्वीपचे प्रशासक फारुक खान यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यटनासाठी खुल्या केल्या जायच्या १२ पैकी १० बेटांवर प्रथम काम सुरू होईल. पहिल्या टप्प्यात तेथे पर्यटकांसाठी सुमारे १५० निवासी खोल्यांची सोय केली जाईल. हे काम खासगी विकासकांच्या मदतीने केले जाईल. त्यासाठी विकासक, हॉटेल व्यावसायिक व सहल आयोजकांची परिषद भरविण्यात येईल.मिनिकॉय, कदमाट, अगाट्टी, चेतलाट, बित्रा, बंगाराम, तिनाकार्रा, चेरियन, सुहेली व कल्पेनी या १० बेटांवर पहिल्या टप्प्यात काम सुरू होईल. यापैकी ८४ निवासी खोल्या आधीपासून वस्ती असलेल्या बंगाराम व सुहेली या बेटांवर बांधल्या जातील. येथे खोलीचे एका रात्रीचे १५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे ही नवी सोय सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नसेल. सध्या लक्षद्वीपमध्ये अगाट्टी येथे विमानतळ आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून हवाई दलाच्या मदतीने मिनिकॉय बेटावरही विमानतळ बांधण्याची योजना आहे. जेथे ‘सी प्लेन्स’ उतरू शकतील, अशी ‘लगून्स’ही निवडली जातील.>नाजूक पर्यावरण जपणारलक्षद्वीप उष्ण कटिबंधातील जगातील एक सर्वोत्तम प्रवाळ द्वीपसमूह म्हणून ओळखला जातो. पर्यटनामुळे तेथील पर्यावरणाचे नाजूक संतुलन बिघडू नये यासाठी काळजी घेतली जाईल. पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवली जाईल. प्रत्येक हॉटेल व रिसॉर्टला विजेची सर्व गरज सौरऊर्जेने भागविणे, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे आणि पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी ‘आरओ’ संयंत्रे बसविणे सक्तीचे केले जाईल. ज्या बेटांवर वस्ती आहे, तेथे आदिम जमातींची संस्कृती जपण्यासाठी पर्यटकांच्या फिरण्यावर मर्यादा घातल्या जातील.