शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

लक्षद्वीपमधील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली, स्वतंत्र महामंडळाचीही स्थापना होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 03:05 IST

बंगालच्या उपसागरातील लक्षद्वीप बेटसमूहातील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली करण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून, तेथील पर्यटनाच्या विकासासाठी स्वतंत्र लक्षद्वीप पर्यटन विकास महामंडळही स्थापन करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातील लक्षद्वीप बेटसमूहातील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली करण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून, तेथील पर्यटनाच्या विकासासाठी स्वतंत्र लक्षद्वीप पर्यटन विकास महामंडळही स्थापन करण्यात येणार आहे.लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार बेटसमूहांतील २६ बेटांना समन्वित विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली असून, त्यासाठी गेल्या जूनमध्ये ‘आयलंड डेव्हलपमेंट एजन्सी’ही स्थापन केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लक्षद्वीपमधील १२ नव्या बेटांचा विकास होणार आहे.लक्षद्वीप हा २९ लहान-मोठ्या बेटांचा समूह आहे. त्यापैकी निम्म्या बेटांवर आदिम जमातींची वस्ती आहे. लक्षद्वीपचे प्रशासक फारुक खान यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यटनासाठी खुल्या केल्या जायच्या १२ पैकी १० बेटांवर प्रथम काम सुरू होईल. पहिल्या टप्प्यात तेथे पर्यटकांसाठी सुमारे १५० निवासी खोल्यांची सोय केली जाईल. हे काम खासगी विकासकांच्या मदतीने केले जाईल. त्यासाठी विकासक, हॉटेल व्यावसायिक व सहल आयोजकांची परिषद भरविण्यात येईल.मिनिकॉय, कदमाट, अगाट्टी, चेतलाट, बित्रा, बंगाराम, तिनाकार्रा, चेरियन, सुहेली व कल्पेनी या १० बेटांवर पहिल्या टप्प्यात काम सुरू होईल. यापैकी ८४ निवासी खोल्या आधीपासून वस्ती असलेल्या बंगाराम व सुहेली या बेटांवर बांधल्या जातील. येथे खोलीचे एका रात्रीचे १५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे ही नवी सोय सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नसेल. सध्या लक्षद्वीपमध्ये अगाट्टी येथे विमानतळ आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून हवाई दलाच्या मदतीने मिनिकॉय बेटावरही विमानतळ बांधण्याची योजना आहे. जेथे ‘सी प्लेन्स’ उतरू शकतील, अशी ‘लगून्स’ही निवडली जातील.>नाजूक पर्यावरण जपणारलक्षद्वीप उष्ण कटिबंधातील जगातील एक सर्वोत्तम प्रवाळ द्वीपसमूह म्हणून ओळखला जातो. पर्यटनामुळे तेथील पर्यावरणाचे नाजूक संतुलन बिघडू नये यासाठी काळजी घेतली जाईल. पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवली जाईल. प्रत्येक हॉटेल व रिसॉर्टला विजेची सर्व गरज सौरऊर्जेने भागविणे, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे आणि पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी ‘आरओ’ संयंत्रे बसविणे सक्तीचे केले जाईल. ज्या बेटांवर वस्ती आहे, तेथे आदिम जमातींची संस्कृती जपण्यासाठी पर्यटकांच्या फिरण्यावर मर्यादा घातल्या जातील.