शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

नक्षल्यांची वार्षिक वसुली १०० कोटींची

By admin | Updated: June 23, 2014 04:35 IST

देशात नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव छत्तीसगड राज्यात आहे. माओवाद्यांना येथून मिळणारा भरमसाठ पैसा हे त्यामागील मुख्य कारण आहे.

रायपूर : देशात नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव छत्तीसगड राज्यात आहे. माओवाद्यांना येथून मिळणारा भरमसाठ पैसा हे त्यामागील मुख्य कारण आहे. विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माओवादी राज्यातून दरवर्षी सुमारे ८० ते १०० कोटी रुपये गोळा करतात. नक्षलग्रस्त राजनांदगाव जिल्ह्यातील सीतागाव आणि औंधीच्या जंगलात यावर्षी ४ मार्चला सुरक्षा दलांनी नक्षल्यांनी तयार केलेली एक भूमिगत तिजोरी जप्त केली. यात २९ लाख रुपये होते. पोलिसांकडून नक्षल्यांची एवढी रक्कम पकडण्याची ही पहिलीच घटना होती. नक्षलग्रस्त भागात अशा शेकडो भूमिगत तिजोऱ्या असून, यात नक्षली आपला पैसा लपवून ठेवत असतात. जमीन खोदून एक खड्डा तयार केला जातो व त्यात ही तिजोरी ठेवली जाते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, देशातील बडे नक्षली नेता या राज्यावर लक्ष ठेवून आहेत; कारण त्यांना येथून फार मोठी रक्कम मिळत असते. ही रक्कम वर्षाला ८० ते १०० कोटींपर्यंत जात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना विविध माध्यमांकडून मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता गुडसा उसेंडी ऊर्फ जीवीके प्रसाद यानेसुद्धा याला दुजोरा दिला आहे. नक्षली त्यांचा दबाव असलेल्या क्षेत्रातील सामान्य लोकांकडून तीन कोटी, व्यापाऱ्यांकडून १० कोटी, ठेकेदार २० कोटी, ट्रान्स्पोर्टर्स १० कोटी, तेंदूपत्ता ठेकेदार २० कोटी, बांबू आणि जंगल तोडणाऱ्यांकडून १५ कोटी, उद्योगपतींकडून २० कोटी तर या भागात कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून देणगीच्या रूपात जवळपास दोन कोटी रुपये वर्षाला वसूल करतात. नक्षल्यांकडून ही वसुली अत्यंत सावधपणे होत असते. तसेच ही रक्कम ठेवण्याची गुप्त ठिकाणेही प्रत्येक भागात फक्त दोघांना माहिती असतात. या पैशाचे नियोजनही फार काळजीपूर्वक केले जाते. (वृत्तसंस्था)