शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

लग्नमंडप अक्षदा पडण्यापूर्वीच सोडण्याची दुर्दैवी वेळ हृदयद्रावक : मेहुण्यांचा मृत्यू झाल्याने घरातच झाला अनिल पवारचा विवाह

By admin | Updated: March 29, 2016 00:25 IST

जळगाव : लग्न सोहळा म्हटले की, आबालवृद्धांच्या आनंदाला उधाण येते. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण. हाच मंगलमय क्षण अनुभवणार्‍या अनिल पवारच्या बाबतीत मात्र, फारच अघटित घडले. नियतीच्या विचित्र खेळीने पवार कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. त्याच्या लग्नासाठी उभारलेल्या मंडपात वर्‍हाडी मंडळींकडून अक्षदा पडण्यापूर्वीच हा मंडप सोडण्याची दुर्दैवी वेळ आली. अनिलच्या हळदीच्या दिवशी त्याच्या चुलत मेहुण्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी घरातच साध्या पद्धतीने विवाह झाला.

जळगाव : लग्न सोहळा म्हटले की, आबालवृद्धांच्या आनंदाला उधाण येते. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण. हाच मंगलमय क्षण अनुभवणार्‍या अनिल पवारच्या बाबतीत मात्र, फारच अघटित घडले. नियतीच्या विचित्र खेळीने पवार कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. त्याच्या लग्नासाठी उभारलेल्या मंडपात वर्‍हाडी मंडळींकडून अक्षदा पडण्यापूर्वीच हा मंडप सोडण्याची दुर्दैवी वेळ आली. अनिलच्या हळदीच्या दिवशी त्याच्या चुलत मेहुण्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी घरातच साध्या पद्धतीने विवाह झाला.
ममुराबाद रस्त्यावरील पवननगरात राहणारा अनिल रमेश पवार याचा विवाह सुरत येथील रहिवासी अशोक कदम यांच्या मुलीशी ठरलेला होता. २७ मार्चला सायंकाळी हळद समारंभ होता. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर पाहुणे मंडळीची जेवणाची पंगत बसलेली होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना अचानक लग्न मंडपाच्या काही लोखंडी पाईपमध्ये विजेचा प्रवाह उतरला. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर अनिलचे चुलत मेहुणे जितेंद्र बळीराम मराठे (वय ३२, रा.थाळनेर, ता.शिरपूर) हे हात धुण्यासाठी मंडपाच्या बाहेर जात होते. त्याच वेळी पाईपला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या प्रकाराने मंडपात गोंधळ उडाला. पळापळीत रेखा संतोष जगताप (वय ४०, रा.तळवेल), ज्योती संजय चौधरी (वय २५, रा.चौघुले प्लॉट, जळगाव) व भरत ओंकार पवार (वय ६०, रा.पवननगर, जळगाव) यांनाही विजेचा धक्का बसला. काही लोकांनी प्रसंगावधान राखत वीज प्रवाह खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर जखमींना नागरिकांनी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी जितेंद्र मराठे यांना मृत घोषित केल्याने एकच शोककळा पसरली.
घरात झाला विवाह
लग्नासाठी दोन्ही पक्षाकडील वर्‍हाडी मंडळी बाहेरगावाहून जळगावला येण्यासाठी निघालेली होती. वधू पक्षाकडील वर्‍हाडीदेखील सुरतहून रविवारी सायंकाळीच निघालेले होते. त्यानंतर रात्रीच्या ११ वाजता अशी दुर्दैवी घटना घडल्याने त्यांना रस्त्यातूनच परत पाठवणे शक्य नव्हते. तसेच वधू-वरांना हळद लावण्यात आली होती. म्हणून विवाह पुढे ढकलणे अशक्य होते. म्हणून दोन्ही पक्षाकडील ज्येष्ठ मंडळींनी पुढे येऊन विवाह तिथीनुसार मात्र, घरातच साध्या पद्धतीने लावण्याचे ठरवले. त्यानुसार सोमवारी सकाळी हा विवाह झाला.