शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

अनिल देशमुख....

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

युती शासनातर्फे जिल्‘ावर अन्याय

युती शासनातर्फे जिल्ह्यावर अन्याय
अनिल देशमुख : वार्षिक योजनेच्या निधीत केवळ ११ टक्के वाढ
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नागपुरातील तसेच अर्थमंत्री विदर्भाचे असतानादेखील भाजप-शिवसेना युती शासनाकडून नागपूर जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत केवळ ११ टक्क्यांनी वाढ केली असून ते जिल्ह्यावर अन्यायकारक असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून राज्य शासनाच्यावतीने विविध कामांसाठी निधी दिला जातो. या योजनेच्या माध्यमाने जिल्ह्यात विकास कामे केली जातात. राज्यात आघाडी सरकार असताना या निधीमध्ये दरवर्षी वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न राहीला. त्यामुळेच सन २०१०-११ मध्ये हा निधी ११७ कोटी रुपये होता. यात ३७ टक्क्यांनी वाढ करून हा निधी १६० कोटी करण्यात आला होता. तसेच २०१४-१५ मध्ये त्यात ३० टक्के वाढ करून १७५ कोटींवरून २२५ कोटीवर नेण्यात आली, अशी माहिती त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. परंतु भाजन-शिवसेनेचे शासन राज्यात आल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या. मुख्यमंत्री नागपुरातील तसेच अर्थमंत्री विदर्भातील असताना नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. नुकत्याच नागपूर येथील जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निधीत केवळ ११ टक्के वाढ करून २२५ कोटीवरून हा निधी केवळ २५० कोटी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी विविध नैसर्गिक संकटात सापडले आहेत. पॅकेजच्या नावाखाली युती शासन शेतकऱ्यांच्या तोंडांना पाने पुसण्याचे काम करीत आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात येत असल्याचे देशमुख म्हणाले. (प्रतिनिधी)