शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

अनिल देशमुख....

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

युती शासनातर्फे जिल्‘ावर अन्याय

युती शासनातर्फे जिल्ह्यावर अन्याय
अनिल देशमुख : वार्षिक योजनेच्या निधीत केवळ ११ टक्के वाढ
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नागपुरातील तसेच अर्थमंत्री विदर्भाचे असतानादेखील भाजप-शिवसेना युती शासनाकडून नागपूर जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत केवळ ११ टक्क्यांनी वाढ केली असून ते जिल्ह्यावर अन्यायकारक असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून राज्य शासनाच्यावतीने विविध कामांसाठी निधी दिला जातो. या योजनेच्या माध्यमाने जिल्ह्यात विकास कामे केली जातात. राज्यात आघाडी सरकार असताना या निधीमध्ये दरवर्षी वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न राहीला. त्यामुळेच सन २०१०-११ मध्ये हा निधी ११७ कोटी रुपये होता. यात ३७ टक्क्यांनी वाढ करून हा निधी १६० कोटी करण्यात आला होता. तसेच २०१४-१५ मध्ये त्यात ३० टक्के वाढ करून १७५ कोटींवरून २२५ कोटीवर नेण्यात आली, अशी माहिती त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. परंतु भाजन-शिवसेनेचे शासन राज्यात आल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या. मुख्यमंत्री नागपुरातील तसेच अर्थमंत्री विदर्भातील असताना नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. नुकत्याच नागपूर येथील जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निधीत केवळ ११ टक्के वाढ करून २२५ कोटीवरून हा निधी केवळ २५० कोटी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी विविध नैसर्गिक संकटात सापडले आहेत. पॅकेजच्या नावाखाली युती शासन शेतकऱ्यांच्या तोंडांना पाने पुसण्याचे काम करीत आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात येत असल्याचे देशमुख म्हणाले. (प्रतिनिधी)