शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

किस्सा कुर्सी का...

By admin | Updated: October 6, 2014 04:46 IST

असत्य, अत्यल्प व अपूर्ण माहितीच्या आधारावर फेकूगिरी करण्याची सवय पंतप्रधान झाल्यावरही नरेंद्र मोदी यांनी सोडलेली नाही.

मोदींची फेकूगिरी सुरूचअसत्य, अत्यल्प व अपूर्ण माहितीच्या आधारावर फेकूगिरी करण्याची सवय पंतप्रधान झाल्यावरही नरेंद्र मोदी यांनी सोडलेली नाही. मुंबईकरांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या व्हिक्टोरिया टर्मिनसचे छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नामकरण अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झाले, असे त्यांनी तासगाव येथील सभेत ठोकून दिले. वास्तविक, व्ही.टी. स्टेशनचे छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नामकरण सुरेश कलमाडी रेल्वे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) असताना त्यांच्या काळात झाले. (बिच्चारे कलमाडी ही एक उपलब्धी सोडली तर त्यांची ओळख कॉमनवेल्थ पुरतीच उरते!) तासगावच्या सभेत त्यांनी जनधन योजनेतंर्गत गरीब खातेदारांनी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असे सांगून टाकले, तर अमेरिकेत असताना त्यांनी हाच आकडा १५०० कोटी असल्याचे सांगितले होते! मोदींनी त्यांच्या शनिवारच्या सभांत इंदिरा गांधी यांच्या काळात झालेल्या बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या निर्णयाचा उल्लेख करीत राष्ट्रीयकरणानंतरही बँकांमध्ये गरीब दिसत नाही, असा जावईशोध लावला. देशातील अनेक बँकांमध्ये शेतकरी, कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, महिला बचतगट यांची खाती असून ही सर्व गोरगरीब माणसं आहेत. परंतु ‘खोटं बोल पण रेटून बोल' या शाखेचे मोदी पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याने प्रधानसेवक झाल्यावरही त्यांची सवय सुटलेली नाही. उत्तराखंडात महाप्रलय झाल्यावर दोन दिवसांत १५ हजार गुजरातींना मोदी सरकारने बाहेर काढले, अशी थापेबाजी केली गेली. सरदार पटेल यांच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सहभागी झाले नव्हते, अशी लोणकढी थाप त्यांनी मारली. पण मोरारजी देसाई (हेही गुजराती) यांच्या ‘दी स्टोरी आॅफ माय लाईफ' ग्रंथाचा हवाला देत मोदींचा खोटारडेपणा काहीनी उघड केला. चंद्रगुप्त मौर्य यांना‘गुप्त' घराण्याच्या पदरात टाकण्याचे औधत्य मोदींनी दाखवले. वास्तवात ते मौैर्य घराण्याचे होते. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात असलेली तक्षशिला बिहारमध्ये आणून ठेवण्याची करामत याच मोदींनी केली होती. मोदींची गांधीगिरी किती प्रामाणिकपणे सुरु आहे हे सांगता येत नाही पण फेकूगिरी अखंड सुरु आहे.रविकिशनची कोलांटउडीलोकसभा निवडणूक जेमतेम तीन-चार महिन्यांपूर्वी झाली. त्यामुळे त्यावेळी काय झाले याचे विस्मरण व्हावे एवढा हा अवधी मोठा नाही. लोकसभा निवडणुकीत भोजपुरी कलाकार रविकिशन हे स्वत: काँग्रेसच्या तिकीटावर जौनपूरमधून निवडणूक लढवत होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिंडोशीतील उमेदवार राजहंस सिंह यांच्या निवडणूक प्रचाराकरिता रविकिशन हे आले होते. रविकिशन यांची झलक पाहण्याकरिता त्यावेळी उत्तर भारतीयांची गर्दी उसळली होती. लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदी लाटेत (भाजपाचीच मंडळी ती त्सुनामी होती असं म्हणतात) रविकिशन यांच्यासह काँग्रेसचे भलेभले उमेदवार वाहून गेले. आता तेच रविकिशन भाजपाचे मोहित कंबोज यांच्या प्रचाराकरिता दिंडोशीत येऊन गेले. रविकिशनची ही कोलांटउडी सध्या चर्चेचा विषय आहे.