शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

मुख्यमंत्र्यांप्रति निष्ठा; जगनमोहन रेड्डींच्या नावे आमदाराने घेतली शपथ, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 11:11 IST

'मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे याबाबत कोणतीही राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नाही आहे.'

ठळक मुद्दे' जगन मोहन रेड्डी माझ्यासाठी भगवान आहेत.'भावनेच्या भरात नियमांना डावलून घेतली शपथ संविधानाच्या अनुच्छेद 188च्या नियमांनुसार आमदार शपथ घेतात.

विजयवाडा : आंध्र प्रदेशातील एका नवनिर्वाचित आमदाराने मुख्यमंत्री आणि व्हायएसआर काँग्रेस अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने शपथ घेतली. नेल्लोर ग्रामीण मतदारसंघातील आमदार कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी ईश्वर साक्ष शपथ घेतो की...असे न म्हणता मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नाव घेत शपथ घेतली. यावेळी कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांप्रति आपली निष्ठा व्यक्त करताना सांगितले की जगन मोहन रेड्डी माझ्यासाठी भगवान आहेत. 

आमदार कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी मुख्यमंत्र्यांचे नावे शपथ घेतली असली तरी त्यांना विधानसभेचे हंगामी सभापती अप्पाला नायडू यांनी तत्काळ दुसऱ्यांदा शपथ घेण्यास सांगितले. त्यानंतर कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी ईश्वर साक्षीने शपथ घेतली. कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी  यांनी भावनेच्या भरात नियमांना डावलून शपथ घेतली. 

यावेळी कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी म्हणाले,'मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे याबाबत कोणतीही राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नाही आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मला दोनवेळा आमदार केले आहे. त्यांच्या नावाने शपथ नावे शपथ घेण्यामागे माझी कोणतीही मंत्रीपदाची अपेक्षा नाही. गेल्या पाच वर्षांत माझा पगार गरीब मुलांसाठी दिला आहे. 

याचबरोबर, टीडीपीच्या काही आमदारांनी याआधी एनटी रामराव यांच्या नावाने शपथ घेतली होती, त्यावेळी असे करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती, असा दावा करत जर मी आपल्या नेत्याला भगवान मानतो, तर यात चुकीचे काय आहे, असेही कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी म्हणाले.  

दरम्यान, संविधानाच्या अनुच्छेद 188 च्या नियमांनुसार आमदार शपथ घेतात. यानुसार आमदार ईश्वराच्या साक्षीने किंवा संविधानाच्या साक्षीने शपथ घेतात. जानेवारी 2017 मध्ये भारतीय शपथ कायदा 1969 नुसार तिसरा पर्याय देण्यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. 

आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणाआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात 15 ऑक्टोबरपासून 'रायतू भरोसा' योजना लागू होणार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 12,500 रुपये दिले जाणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी टीडीपी सरकारची 'अन्नदाता सुखीभव' योजना रद्द केली आहे. आंध्र प्रदेशच्या आधीच्या सरकारनं फेब्रुवारी 2019ला निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत चंद्रबाबूंनी शेतकऱ्यांना वर्षाला 10 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. दुसरीकडे मुख्यमंत्री झाल्यापासून जगनमोहन रेड्डी जलद गतीनं निर्णय घेत आहेत. तत्पूर्वी जगनमोहन यांनी स्वतःच्या कार्यालयातील पहिल्याच दिवशी वृद्धांची पेन्शन वाढवण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश