शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांप्रति निष्ठा; जगनमोहन रेड्डींच्या नावे आमदाराने घेतली शपथ, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 11:11 IST

'मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे याबाबत कोणतीही राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नाही आहे.'

ठळक मुद्दे' जगन मोहन रेड्डी माझ्यासाठी भगवान आहेत.'भावनेच्या भरात नियमांना डावलून घेतली शपथ संविधानाच्या अनुच्छेद 188च्या नियमांनुसार आमदार शपथ घेतात.

विजयवाडा : आंध्र प्रदेशातील एका नवनिर्वाचित आमदाराने मुख्यमंत्री आणि व्हायएसआर काँग्रेस अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने शपथ घेतली. नेल्लोर ग्रामीण मतदारसंघातील आमदार कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी ईश्वर साक्ष शपथ घेतो की...असे न म्हणता मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नाव घेत शपथ घेतली. यावेळी कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांप्रति आपली निष्ठा व्यक्त करताना सांगितले की जगन मोहन रेड्डी माझ्यासाठी भगवान आहेत. 

आमदार कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी मुख्यमंत्र्यांचे नावे शपथ घेतली असली तरी त्यांना विधानसभेचे हंगामी सभापती अप्पाला नायडू यांनी तत्काळ दुसऱ्यांदा शपथ घेण्यास सांगितले. त्यानंतर कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी ईश्वर साक्षीने शपथ घेतली. कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी  यांनी भावनेच्या भरात नियमांना डावलून शपथ घेतली. 

यावेळी कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी म्हणाले,'मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे याबाबत कोणतीही राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नाही आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मला दोनवेळा आमदार केले आहे. त्यांच्या नावाने शपथ नावे शपथ घेण्यामागे माझी कोणतीही मंत्रीपदाची अपेक्षा नाही. गेल्या पाच वर्षांत माझा पगार गरीब मुलांसाठी दिला आहे. 

याचबरोबर, टीडीपीच्या काही आमदारांनी याआधी एनटी रामराव यांच्या नावाने शपथ घेतली होती, त्यावेळी असे करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती, असा दावा करत जर मी आपल्या नेत्याला भगवान मानतो, तर यात चुकीचे काय आहे, असेही कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी म्हणाले.  

दरम्यान, संविधानाच्या अनुच्छेद 188 च्या नियमांनुसार आमदार शपथ घेतात. यानुसार आमदार ईश्वराच्या साक्षीने किंवा संविधानाच्या साक्षीने शपथ घेतात. जानेवारी 2017 मध्ये भारतीय शपथ कायदा 1969 नुसार तिसरा पर्याय देण्यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. 

आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणाआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात 15 ऑक्टोबरपासून 'रायतू भरोसा' योजना लागू होणार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 12,500 रुपये दिले जाणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी टीडीपी सरकारची 'अन्नदाता सुखीभव' योजना रद्द केली आहे. आंध्र प्रदेशच्या आधीच्या सरकारनं फेब्रुवारी 2019ला निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत चंद्रबाबूंनी शेतकऱ्यांना वर्षाला 10 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. दुसरीकडे मुख्यमंत्री झाल्यापासून जगनमोहन रेड्डी जलद गतीनं निर्णय घेत आहेत. तत्पूर्वी जगनमोहन यांनी स्वतःच्या कार्यालयातील पहिल्याच दिवशी वृद्धांची पेन्शन वाढवण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश