शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आंध्रप्रदेशात 4 दिवसात झाली 200 कोटींची मद्यविक्री

By admin | Updated: July 6, 2017 16:34 IST

आंध्रप्रदेशात चार दिवसामध्ये विक्रमी मद्यविक्री झाल्याची नोंद झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. 6- आंध्रप्रदेशात चार दिवसामध्ये विक्रमी मद्यविक्री झाल्याची नोंद झाली आहे. चार दिवसात आंध्रप्रदेशात 200 कोटींची दारू विकली गेली आहे. तेथिल 70 टक्के दारूची दुकानं परवान्यांचं नुतनीकरण न झाल्याने बंद असूनही इतकी दारू विकली गेली आहे. शहरांतून जाणारे रस्ते हे महामार्ग या व्याख्येतून वगळता येतील, असं सुप्रीम कोर्टाने मंगळवारी स्पष्ट केल्यानंतर तेथिल दारूची दुकानं सुरू झाली होती. तसंच शहरामध्ये दारूची दूकानं बंद असावी या मागणीसाठी तेथिल महिलांनी आंदोलनही केलं होतं पण त्या आंदोलनाचा कुठलाही परिणाम दारू विक्रीवर झाला नसल्याचं चित्र दिसतं आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. 
 
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंगळवारी आंध्रप्रदेशातील दारूची दुकानं सुरू झाली. चार दिवसात झालेली दारू विक्री पाहून आम्हीही गोंधळलेलो आहे, अशी प्रतिक्रीया उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 200 कोटी रूपयांची दारू विक्री तेथे जास्त प्रमाणात असलेल्या दारूच्या अनधिकृत  दुकानांमुळे झाली आहे, असं उत्पादन शुल्क विभागातील काही कर्मचाऱ्यांनी नमूद केलं. 
 
आणखी वाचा
 

शहरांतील महामार्गांवर दारू मिळणार? सुप्रिम कोर्टानेच दाखवला "मार्ग’

भूतान फार आनंदी देश नाही, चिनी मीडियाचा कांगावा

बनावट जात प्रमाणपत्रामुळे येणार नोकरीवर कु-हाड

4 जुलै रोजी एपी ब्रेवेरीज कॉर्पोरेशन या कंपनीने 58.82 कोटी रूपयांचा माल बाजारात आणला होता. तसंच अनधिकृत दारूची दुकानं असल्याने जास्त विक्री झाली. याचा अर्थ सरकारकडून दारूविक्रीला प्रोत्साहन दिलं जातं आहे, असं एआयडीडब्लुएचे स्टेट जनरल सेक्रेटरी डी रामदेवी यांनी तक्रारीत म्हंटलं आहे. 

अधिकृत रेकॉर्डनुसार उत्पादन शुल्क विभागाने हायवेवरील दूकानं बंद असल्याचं गृहीत धरून जून महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसात मद्य पुरवठा केला नव्हता. तसंच परवानाधारक दारू विक्रेत्यांना  त्यांच्याकडील माल संपवून 1 जुलैपर्यत नवीन परवाना मिळविण्यासाठी तसंच पर्यायी स्थळांसाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर 1 जुलैपासून राज्यातील 10 ते 15 टक्के दुकानं नवे परवाने मिळाल्यानंतर सुरू झाली. या दुकानदारांनी पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जुलै रोजी 18 कोटींचा स्टॉक विकत घेतला. 2 जुलै रोजी 56.97 कोटी तर 3 जुलै रोजी एकूण 75.01 कोटींचा स्टॉक विकत घेतला होता.