शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

आंध्र प्रदेशात केमिकल कारखान्यातून वायू गळती; आसपास राहणारे कित्येक जण घरातच बेशुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 10:14 IST

केमिकल कारखान्यातून पसरलेल्या वायूचा परिणाम ३ किलोमीटरच्या परिसरात; अनेकांवर उपचार सुरू

विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशच्या केमिकल कारखान्यातून वायू गळती झाल्यानं तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. विशाखापट्टणममध्ये असलेल्या आर. एस. व्यंकटपुरम गावातल्या एलजी पॉलिमर उद्योग कारखान्यातून वायू गळती झाली. मध्यरात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे २०० जणांची प्रकृती बिघडली आहे. वायू गळती होताच संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला.एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, केमिकल कारखान्यातून वायू गळती सुरू होताच परिसरात राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत जळजळ होऊ लागली. अनेकांना श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्या. श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. केमिकल कारखान्यातून पसरलेल्या वायूचा परिणाम ३ किलोमीटरच्या परिसरात जाणवत असल्याची माहिती पश्चिम विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त स्वरुपा रानी यांनी दिली. वायू गळतीची माहिती मिळताच अनेक जण केमिकल कारखान्याच्या परिसरात पोहोचले. विषारी वायूमुळे त्यांना डोळ्यांमध्ये जळजळ होऊ लागली. विषारी वायूची तीव्रता अतिशय जास्त असल्यानं आसपास राहणारे काही जण घरातच बेशुद्ध पडले. यामध्ये लहान मुलांची आणि वृद्धांची संख्या जास्त असल्याची माहिती स्वरुपा राणी यांनी दिली.