शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वैयक्तिक हजेरीतून आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना सूट नाही; वादग्रस्त गुंतवणुकीचे खटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 02:18 IST

यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांत जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचा पराभव करून सत्ता मिळविली होती

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या कंपन्यांमध्ये झालेल्या वादग्रस्त गुंतवणुकीच्या खटल्यांमध्ये सुनावणीच्या वेळेस वैयक्तिक हजेरीतून सूट मिळावी यासाठी त्यांनी केलेला अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

त्यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी २००४ ते २००९ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना, त्यांची मेहेरनजर व्हावी या हेतूने काही जणांनी जगनमोहन यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती, असा आरोप आहे.

आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री या नात्याने अनेक कामांमध्ये व्यग्र असल्याने या प्रकरणांच्या खटल्यातील सुनावणीला प्रत्येक वेळेस हजर राहणे शक्य नाही, असा जगनमोहन रेड्डी यांचा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. वैयक्तिक हजेरीतून सूट दिल्यास जगनमोहन रेड्डी यांना हवे ते करण्याची मुभा मिळेल. सत्ता, पैसा व बळाच्या जोरावर ते या खटल्यांतील साक्षीदारांवर प्रभावही टाकू शकतील, असे सीबीआयतर्फे न्यायालयात सांगण्यात आले.

गुंतवणुकीसंदर्भातील प्रकरणांमध्ये जगनमोहन रेड्डी यांना मे २०१२मध्ये अटक करण्यात आली होती. चंचलगुडा येथील तुरुंगात १५ महिने ठेवण्यात आल्यानंतर जगनमोहन यांची न्यायालयाने सप्टेंबर २०१३मध्ये जामिनावर सुटका केली. या खटल्यांतील साक्षीदारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू नये, अशी ताकीद न्यायालयाने जगनमोहन यांना जामीन मंजूर करताना दिली होती.या खटल्यांच्या प्रत्येक सुनावणीला त्यांनी न्यायालयात उपस्थित राहायलाच हवे, असेही न्यायालयाने बजावले होते. या प्रकरणांमध्ये सीबीआयने ११ आरोपपत्रे दाखल केली असून, त्याला पुरवणी आरोपपत्रेही जोडली आहेत. वादग्रस्त पार्श्वभूमीयंदा एप्रिल महिन्यात झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांत जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचा पराभव करून सत्ता मिळविली होती. मात्र, जगनमोहन यांची आधीची राजकीय कारकीर्द अत्यंत वादग्रस्त असून, त्यामुळे त्यांच्या कारभाराकडे विरोधक नेहमीच संशयाने पाहत असतात.