शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

...तर टाटा ग्रुप एअर इंडिया कंपनी खरेदी करेल- रिपोर्ट

By admin | Updated: June 21, 2017 16:40 IST

टाटा ग्रुप लवकरच एअर इंडिया ही विमान कंपनी खरेदी करण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - टाटा ग्रुप लवकरच एअर इंडिया ही विमान कंपनी खरेदी करण्याची शक्यता आहे. टाटा ग्रुप हा सिंगापूर एअरलाइन्सचा सहभागीदार आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, टाटा ग्रुपनं एअर इंडियाला खरेदी करण्याचा निश्चय केल्यास एअर इंडियाची पुन्हा घरवापसी होणार आहे. कारण एअर इंडिया ही कंपनी 1953ला राष्ट्रीयीकृत होण्याआधी टाटांच्या अधिपत्याखाली होती. रिपोर्टनुसार, टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी केंद्र सरकारशी अनौपचारिक चर्चांमध्ये एअर इंडिया कंपनीत 51 टक्के भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्र सरकार एक दशकाहून अधिक काळ तोट्यात चाललेल्या या विमान कंपनीचं खासगीकरण करण्यासाठी सकारात्मक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाला पाठिंबा दिला होता. एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी सर्व पर्यायांचा विचार करत आहोत, असंही जेटलींनी त्यावेळी सांगितलं होतं. एअर इंडियाच्या डोक्यावर जवळपास 52 हजार कोटींचे कर्ज आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी 30 हजार कोटींचं बेलआऊट पॅकेजही मंजूर केलं आहे. त्यात 24 हजार कोटी एवढी रक्कमही देण्यात आली आहे. 2013मध्येही टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी एअर इंडियाचं खासगीकरण केल्यास आम्हाला ती कंपनी खरेदी करण्यास नक्कीच आनंद होईल, असं वक्तव्य केलं होतं. टाटा ग्रुप पहिल्यापासूनच देशाच्या एव्हिएशन क्षेत्रात पाय रोवून उभा आहे. टाटा ग्रुपनं मलेशियन कंपनी एअर एशियासोबत मिळून एअर एशिया इंडिया आणि सिंगापूर एअरलाइन्ससोबत जॉइंट वेंचरसाठी गुंतवणूक केली होती. 2007मध्ये एअर इंडिया आणि इंडिया एअरलाईन्स यांचे विलीनीकरण होऊनही एअर इंडियाच्या परिस्थितीत फारसा फरक पडला नव्हता. त्यामुळेच नीती आयोगाने एअर इंडियाबाबत सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली होती. एअर इंडियाचे खासगीकरण केल्यास तोटा भरून काढण्यासाठी ओतावा लागणारा पैसा आरोग्य व शिक्षणासाठी वापरता येईल, असे नमूद केले होते. एअर इंडियाच्या डोक्यावर असलेल्या 52 हजार कोटींच्या कर्जापैकी 21 हजार कोटी हे विमान खरेदीसाठी घेतले होते, तर 8 हजार कोटी खेळत्या भांडवलाशी संबंधित आहेत. कंपनी विकल्यास जवळपास 30 हजार कोटींचे कर्ज ही नव्या मालकाची जबाबदारी राहील. त्यामुळे सरकारला इतर कामांसाठी मोठा निधी उपलब्ध होऊ शकतो, असा एक मतप्रवाह आहे.