शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन भारतात दुर्गा होती संरक्षणमंत्री, लक्ष्मी वित्तमंत्री - उपराष्ट्रपती नायडू यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 02:30 IST

प्राचीन भारतात देवी दुर्गा ही संरक्षणमंत्री होती तर संपत्तीची देवी असलेली लक्ष्ंमी वितंतमंत्री होती, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.

नवी दिल्ली : प्राचीन भारतात देवी दुर्गा ही संरक्षणमंत्री होती तर संपत्तीची देवी असलेली लक्ष्ंमी वितंतमंत्री होती, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.मोहाली येथील इंडियन स्कूल आॅफ बिझिनेसमध्ये आयोजित ‘लीडरशिप समिट’मध्ये बोलताना नायडू यांनी महिला सशक्तीकरणाचे महत्व विषद करण्यासाठीविविध देवींचा संदर्भ दिला. पुराणांचा हवाला देऊन ते म्हणाले की, देवी सरस्वती शिक्षणमंत्री, देवी दुर्गा संरक्षणमंत्री तर देवी लक्ष्मी वित्तमंत्री होती असे दिसते.भारतीय तत्त्वज्ञान आणि ंसंस्कृतीमध्ये स्त्रीशक्तीला सर्वोच्च महत्व दिले आहे, असे नमूदकरून नायडू यांनी महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी देण्यावर भर दिला. आपण आपल्या देशाला ‘भारतमाता’ म्हणतो. एवढेच नव्हे तर गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, महानदी, तापी या देशातील महत्वाच्या नद्यांची नावेही स्त्रीवाचकच आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.विद्यार्थ्यांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा आदर बाळगायला हवा, असे सांगून उपराष्ट्रपतींनी समोरच्या व्यक्तीला तुमची भाषा सजत नसेल तरच त्याच्याशी दुसºया भाषेत बोला, असा सल्ला दिला.नायडू म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समाजातील असहिष्णुता यावर गेले काही दिवस बरीच चर्चा होत आहे. पण समाजात अहिष्णुता वाढत आहे, असे म्हणणे बरोबर होणार नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार जरूर आहे. पण ही अभिव्यक्तीही राज्यघटनेच्या चौकटीतच असायला हवी.उपराष्ट्रपती म्हणाले की, व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जायला हवीच. पण देशाच्या एकात्मतेहून ती मोठी असू शकत नाही. लोकशाही टिकविण्यासाठी काही नियम व बंधने पाळायलाच हवीत.नवभारताच्या उभारणीसाठी प्रत्येकाने आपल्या आत्मिक शक्तींचा पुरेपूर वापर करायलाहवा, हे अधोरेखित करून त्यांनी विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार, सांप्रदायिकता, जातीयवाद, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, लैंगिक भेदभाव आणि महिला व दुर्बल घटकांवरील अत्याचारांविरुद्ध एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.आपण मनापासून जे वाटते, ते स्पष्टपणे बोलून मोकळे होतो. बºयाच वेळा तसे करणे राजकीयदृष्ट्या योग्यही नसते, अशी कबुली देत नायडू म्हणाले की, आता उपराष्ट्रपती झाल्याने बोलताना जरा संयम बाळगावा, असा काही लोक मला सल्ला देतात, पण मन मोकळे केले नाही, तर मी ‘फुगत’ जाईन व ते माझ्या प्रकृतीसाठी चांगले नाही!