शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्राचीन भारतात दुर्गा होती संरक्षणमंत्री, लक्ष्मी वित्तमंत्री - उपराष्ट्रपती नायडू यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 02:30 IST

प्राचीन भारतात देवी दुर्गा ही संरक्षणमंत्री होती तर संपत्तीची देवी असलेली लक्ष्ंमी वितंतमंत्री होती, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.

नवी दिल्ली : प्राचीन भारतात देवी दुर्गा ही संरक्षणमंत्री होती तर संपत्तीची देवी असलेली लक्ष्ंमी वितंतमंत्री होती, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.मोहाली येथील इंडियन स्कूल आॅफ बिझिनेसमध्ये आयोजित ‘लीडरशिप समिट’मध्ये बोलताना नायडू यांनी महिला सशक्तीकरणाचे महत्व विषद करण्यासाठीविविध देवींचा संदर्भ दिला. पुराणांचा हवाला देऊन ते म्हणाले की, देवी सरस्वती शिक्षणमंत्री, देवी दुर्गा संरक्षणमंत्री तर देवी लक्ष्मी वित्तमंत्री होती असे दिसते.भारतीय तत्त्वज्ञान आणि ंसंस्कृतीमध्ये स्त्रीशक्तीला सर्वोच्च महत्व दिले आहे, असे नमूदकरून नायडू यांनी महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी देण्यावर भर दिला. आपण आपल्या देशाला ‘भारतमाता’ म्हणतो. एवढेच नव्हे तर गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, महानदी, तापी या देशातील महत्वाच्या नद्यांची नावेही स्त्रीवाचकच आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.विद्यार्थ्यांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा आदर बाळगायला हवा, असे सांगून उपराष्ट्रपतींनी समोरच्या व्यक्तीला तुमची भाषा सजत नसेल तरच त्याच्याशी दुसºया भाषेत बोला, असा सल्ला दिला.नायडू म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समाजातील असहिष्णुता यावर गेले काही दिवस बरीच चर्चा होत आहे. पण समाजात अहिष्णुता वाढत आहे, असे म्हणणे बरोबर होणार नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार जरूर आहे. पण ही अभिव्यक्तीही राज्यघटनेच्या चौकटीतच असायला हवी.उपराष्ट्रपती म्हणाले की, व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जायला हवीच. पण देशाच्या एकात्मतेहून ती मोठी असू शकत नाही. लोकशाही टिकविण्यासाठी काही नियम व बंधने पाळायलाच हवीत.नवभारताच्या उभारणीसाठी प्रत्येकाने आपल्या आत्मिक शक्तींचा पुरेपूर वापर करायलाहवा, हे अधोरेखित करून त्यांनी विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार, सांप्रदायिकता, जातीयवाद, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, लैंगिक भेदभाव आणि महिला व दुर्बल घटकांवरील अत्याचारांविरुद्ध एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.आपण मनापासून जे वाटते, ते स्पष्टपणे बोलून मोकळे होतो. बºयाच वेळा तसे करणे राजकीयदृष्ट्या योग्यही नसते, अशी कबुली देत नायडू म्हणाले की, आता उपराष्ट्रपती झाल्याने बोलताना जरा संयम बाळगावा, असा काही लोक मला सल्ला देतात, पण मन मोकळे केले नाही, तर मी ‘फुगत’ जाईन व ते माझ्या प्रकृतीसाठी चांगले नाही!