शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

नेमाडेंंच्या ज्ञानपीठ सन्मानाने शहरातील साहित्य वर्तुळात आनंद (१)

By admin | Updated: February 7, 2015 02:04 IST

- हा मराठी साहित्याचाच सन्मान : मान्यवरांनी लोकमतजवळ व्यक्त केला आनंद

- हा मराठी साहित्याचाच सन्मान : मान्यवरांनी लोकमतजवळ व्यक्त केला आनंद
नागपूर : नागपूर : मराठी साहित्य विश्वाला कथाप्रकारातून कादंबरीकडे नेणारे आणि कादंबरीतून देशीवाद जपताना मर्ढेकरकेंद्री असणारे साहित्य नेमाडेकेंद्री करून स्वत:चा स्वतंत्र संप्रदाय निर्माण करणारे भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान जाहीर करण्यात आला. त्यांना हा सन्मान मिळाल्यावर साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून मान्यवर साहित्यिकांनी नेमाडेंना मिळालेला हा सन्मान म्हणजे मराठी साहित्य आणि परंपरेचाच सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नेमाडेंची साहित्याची आत्मीयता विलक्षणच
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान लाभल्याचा आनंद मोठा आहे. त्यांना लाभलेला हा सन्मान मराठी साहित्याला समोर नेणारा आहे. साहित्य अकादमीच्या केंद्रीय समितीवर त्यांच्यासोबत मी काम करतो आहे. यानिमित्ताने त्यांची कार्यशैली जवळून अनुभवता येते. साहित्याविषयीची त्यांची आत्मियता आणि त्यासाठी लागणारे परिश्रम यात ते कधीच तडजोड करीत नाहीत. तात्त्विक भूमिका घेऊन जगणारे नेमाडे यांचे व्यक्तिमत्व सूक्ष्म अभ्यास करणारे आहे. त्यांना हा सन्मान लाभणे म्हणजे मराठी साहित्याचाच गौरव आहे.
डॉ. अक्षयकुमार काळे
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक
-----------------
नेमाडेंची आव्हाने आजतागायत कायमच
नेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान मिळाला याचा खूप आनंद वाटतो. हा सन्मान मराठी साहित्यासाठी त्यांना मिळाला. नेमाडेंनी भारतीय भाषांमधील सर्वात पुढे जाणारे साहित्य निर्माण केले. सर्वच साहित्य प्रकारात त्यांनी केलेले लेखन श्रेष्ठ आहे. एकच कादंबरी आणि त्याचा नायक अर्धशतकापेक्षा जास्त काळ वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात हा अपवादच आहे. कोसला आणि त्यातला पांडुरंगने साहित्याच्या मानदंडापुढे जी आव्हाने निर्माण केली ती आजतागायत तशीच आहे. हेच नेमाडेंचे यश आहे, असे मी मानतो.
डॉ. प्रमोद मुनघाटे
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक
----------------------------------
साहित्याचा प्रवाह बदलविणारा लेखक
नेमाडे यांनी साहित्याचे प्रचलित प्रवाह बदलविला. प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्वत:चा विचार समाजाच्या सकारात्मकतेसाठी सांगण्यासाठी धाडस लागते. ते नेमाडेंनी दाखविले आणि साहित्याला आपल्या देशाचा रंग दिला. विदर्भ साहित्य संघातर्फे डॉ. शोभणे प्रत्यक्ष त्यांचे अभिनंदन करायला गेले आहेत. त्यांचा विदर्भ साहित्य संघातर्फे लवकरच जाहीर सत्कार करण्यात येईल.
मनोहर म्हैसाळकर
अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ