नेमाडेंंच्या ज्ञानपीठ सन्मानाने शहरातील साहित्य वर्तुळात आनंद (१)
By admin | Updated: February 7, 2015 02:04 IST
- हा मराठी साहित्याचाच सन्मान : मान्यवरांनी लोकमतजवळ व्यक्त केला आनंद
नेमाडेंंच्या ज्ञानपीठ सन्मानाने शहरातील साहित्य वर्तुळात आनंद (१)
- हा मराठी साहित्याचाच सन्मान : मान्यवरांनी लोकमतजवळ व्यक्त केला आनंद नागपूर : नागपूर : मराठी साहित्य विश्वाला कथाप्रकारातून कादंबरीकडे नेणारे आणि कादंबरीतून देशीवाद जपताना मर्ढेकरकेंद्री असणारे साहित्य नेमाडेकेंद्री करून स्वत:चा स्वतंत्र संप्रदाय निर्माण करणारे भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान जाहीर करण्यात आला. त्यांना हा सन्मान मिळाल्यावर साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून मान्यवर साहित्यिकांनी नेमाडेंना मिळालेला हा सन्मान म्हणजे मराठी साहित्य आणि परंपरेचाच सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नेमाडेंची साहित्याची आत्मीयता विलक्षणच भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान लाभल्याचा आनंद मोठा आहे. त्यांना लाभलेला हा सन्मान मराठी साहित्याला समोर नेणारा आहे. साहित्य अकादमीच्या केंद्रीय समितीवर त्यांच्यासोबत मी काम करतो आहे. यानिमित्ताने त्यांची कार्यशैली जवळून अनुभवता येते. साहित्याविषयीची त्यांची आत्मियता आणि त्यासाठी लागणारे परिश्रम यात ते कधीच तडजोड करीत नाहीत. तात्त्विक भूमिका घेऊन जगणारे नेमाडे यांचे व्यक्तिमत्व सूक्ष्म अभ्यास करणारे आहे. त्यांना हा सन्मान लाभणे म्हणजे मराठी साहित्याचाच गौरव आहे. डॉ. अक्षयकुमार काळेज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक -----------------नेमाडेंची आव्हाने आजतागायत कायमचनेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान मिळाला याचा खूप आनंद वाटतो. हा सन्मान मराठी साहित्यासाठी त्यांना मिळाला. नेमाडेंनी भारतीय भाषांमधील सर्वात पुढे जाणारे साहित्य निर्माण केले. सर्वच साहित्य प्रकारात त्यांनी केलेले लेखन श्रेष्ठ आहे. एकच कादंबरी आणि त्याचा नायक अर्धशतकापेक्षा जास्त काळ वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात हा अपवादच आहे. कोसला आणि त्यातला पांडुरंगने साहित्याच्या मानदंडापुढे जी आव्हाने निर्माण केली ती आजतागायत तशीच आहे. हेच नेमाडेंचे यश आहे, असे मी मानतो. डॉ. प्रमोद मुनघाटेज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक ----------------------------------साहित्याचा प्रवाह बदलविणारा लेखक नेमाडे यांनी साहित्याचे प्रचलित प्रवाह बदलविला. प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्वत:चा विचार समाजाच्या सकारात्मकतेसाठी सांगण्यासाठी धाडस लागते. ते नेमाडेंनी दाखविले आणि साहित्याला आपल्या देशाचा रंग दिला. विदर्भ साहित्य संघातर्फे डॉ. शोभणे प्रत्यक्ष त्यांचे अभिनंदन करायला गेले आहेत. त्यांचा विदर्भ साहित्य संघातर्फे लवकरच जाहीर सत्कार करण्यात येईल. मनोहर म्हैसाळकर अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ