शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अमृतसरच्या दुर्घटनेत रेल्वे व ड्रायव्हरचा दोष नाही, रेल्वे राज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 06:54 IST

साठहून अधिक लोक ज्या रेल्वेखाली चिरडून ठार झाले, त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

अमृतसर : साठहून अधिक लोक ज्या रेल्वेखाली चिरडून ठार झाले, त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६१ झाली आहे. मृतांपैकी ९ जणांची ओळख पटणे शिल्लक आहे. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयलही अमेरिका दौरा सोडून परत आले.मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज जखमींची विचारपूस केली व या दुर्घटनेची दंडाधिकारीय चौकशी जाहीर केली. रेल्वेही गँगमनने ड्रायव्हरला लाल बावटा का दाखवला नाही, याची चौकशी करणार आहे. मंत्री नवज्योत सिद्धू यांनीही रुग्णालय व अपघातस्थळी भेट दिली. सिद्धू यांच्या पत्नी कार्यक्रमास हजर होत्या. मात्र त्या लवकर निघून गेल्या. त्यांनी सांगितले की, दहनाच्या वेळी रेल्वेमार्गावर उभे राहू नका, असे आयोजक वारंवार ध्वनिक्षेपकावरून सांगत होते. तसेच रेल्वेचा गेटमनही तेथे उपस्थित होता. त्याने लाल बावटा दाखवायला हवा होता. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले की, ही दुर्घटना होण्यात रेल्वेचा दोष नाही. त्यामुळे ड्रायव्हरवर कारवाई करण्यात येणार नाही.रेल्वे अधिकाऱ्यांनीही याचे खापर प्रशासनावरच फोडले. त्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेमार्ग ही उत्सवाची जागा नाही. रावणदहनासाठी येथे गर्दी करणे ही रेल्वेच्या हद्दीत घुसखोरी आहे. एवढी गर्दी जमेल, याची प्रशासनाने कल्पना दिलेली नव्हती.अपघाताची माहिती ड्रायव्हरने अमृतसर रेल्वे स्टेशनात जाऊन दिली. रेल्वे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांनुसार ड्रायव्हरचे म्हणणे असे की, रेल्वे फाटक बंद होते व गाडीला हिरवा सिग्नल होता. त्यामुळे गाडी थांबवण्याचे पूर्वसंकेत नव्हते. लोक जमले होते त्याआधी वळण असल्याने नियमानुसार भोंगेही वाजविले. पण तेथे प्रचंड धूर असल्याने पुढचे दिसत नव्हते. त्यामुळे गाडी जमावात शिरल्यावरच विपरीत घडल्याचे लक्षात आले.रुग्णालयांतील जखमींनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सांगितले की, रावणदहनाच्या वेळी फटाक्यांचा आवाज प्रचंड होता. त्यामुळे गाडीचा हॉर्न आम्हाला ऐकूच आला नाही.>रावणही पडला मृत्युमुखीही दुर्घटना घडली त्या भागात शेकडो लहान-मोठे उद्योग आहेत. त्यात बिहारव उत्तर प्रदेशमधीलकामगार काम करतात. रेल्वेमार्गालगतच्या मैदानावर त्यांचीच रामलीला असते. रामलीलेमध्ये रावणाचे पात्र रंगविले तो दलबीर सिंगही अपघातात मृत्यू पावला. रामलीला संपल्यावर तोही रावणदहन पाहण्यासाठी उभा होता. मात्र त्याने सात ते आठ जणांना वाचवले.

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटना