शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

अमृतसरच्या दुर्घटनेत रेल्वे व ड्रायव्हरचा दोष नाही, रेल्वे राज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 06:54 IST

साठहून अधिक लोक ज्या रेल्वेखाली चिरडून ठार झाले, त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

अमृतसर : साठहून अधिक लोक ज्या रेल्वेखाली चिरडून ठार झाले, त्या प्रकरणात रेल्वेचा दोष नसल्याने, गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६१ झाली आहे. मृतांपैकी ९ जणांची ओळख पटणे शिल्लक आहे. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयलही अमेरिका दौरा सोडून परत आले.मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज जखमींची विचारपूस केली व या दुर्घटनेची दंडाधिकारीय चौकशी जाहीर केली. रेल्वेही गँगमनने ड्रायव्हरला लाल बावटा का दाखवला नाही, याची चौकशी करणार आहे. मंत्री नवज्योत सिद्धू यांनीही रुग्णालय व अपघातस्थळी भेट दिली. सिद्धू यांच्या पत्नी कार्यक्रमास हजर होत्या. मात्र त्या लवकर निघून गेल्या. त्यांनी सांगितले की, दहनाच्या वेळी रेल्वेमार्गावर उभे राहू नका, असे आयोजक वारंवार ध्वनिक्षेपकावरून सांगत होते. तसेच रेल्वेचा गेटमनही तेथे उपस्थित होता. त्याने लाल बावटा दाखवायला हवा होता. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले की, ही दुर्घटना होण्यात रेल्वेचा दोष नाही. त्यामुळे ड्रायव्हरवर कारवाई करण्यात येणार नाही.रेल्वे अधिकाऱ्यांनीही याचे खापर प्रशासनावरच फोडले. त्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेमार्ग ही उत्सवाची जागा नाही. रावणदहनासाठी येथे गर्दी करणे ही रेल्वेच्या हद्दीत घुसखोरी आहे. एवढी गर्दी जमेल, याची प्रशासनाने कल्पना दिलेली नव्हती.अपघाताची माहिती ड्रायव्हरने अमृतसर रेल्वे स्टेशनात जाऊन दिली. रेल्वे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांनुसार ड्रायव्हरचे म्हणणे असे की, रेल्वे फाटक बंद होते व गाडीला हिरवा सिग्नल होता. त्यामुळे गाडी थांबवण्याचे पूर्वसंकेत नव्हते. लोक जमले होते त्याआधी वळण असल्याने नियमानुसार भोंगेही वाजविले. पण तेथे प्रचंड धूर असल्याने पुढचे दिसत नव्हते. त्यामुळे गाडी जमावात शिरल्यावरच विपरीत घडल्याचे लक्षात आले.रुग्णालयांतील जखमींनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सांगितले की, रावणदहनाच्या वेळी फटाक्यांचा आवाज प्रचंड होता. त्यामुळे गाडीचा हॉर्न आम्हाला ऐकूच आला नाही.>रावणही पडला मृत्युमुखीही दुर्घटना घडली त्या भागात शेकडो लहान-मोठे उद्योग आहेत. त्यात बिहारव उत्तर प्रदेशमधीलकामगार काम करतात. रेल्वेमार्गालगतच्या मैदानावर त्यांचीच रामलीला असते. रामलीलेमध्ये रावणाचे पात्र रंगविले तो दलबीर सिंगही अपघातात मृत्यू पावला. रामलीला संपल्यावर तोही रावणदहन पाहण्यासाठी उभा होता. मात्र त्याने सात ते आठ जणांना वाचवले.

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटना