शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तीन सेकंदात घरबसल्या कळणार पाण्यातील फ्लोराईडची मात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 02:23 IST

प्रौद्योगिकी मंत्रालयातील वैज्ञानिकांनी बनविलेल्या विशेष पेपर किटमुळे अवघ्या तीन सेकंदात पाण्यातील फ्लोराईडची मात्रा तपासता येणार आहे, तेही अगदी घरबसल्या.

नितिन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील तब्बल १७ राज्यातील शेकडो नागरिकांना फ्लोराईडयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे अस्थिव्यंगाच्या भयंकर यातनांना सामोरे जावे लागते. पाण्यातील या घातक विषारी द्रव्याची आता त्वरित शहनिशा करणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयातील वैज्ञानिकांनी बनविलेल्या विशेष पेपर किटमुळे अवघ्या तीन सेकंदात पाण्यातील फ्लोराईडची मात्रा तपासता येणार आहे, तेही अगदी घरबसल्या.नॅनो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नॅनो विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्थेच्या शास्त्रज्ञाने 'लोकमत'शी बोलताना या पेपर किटबद्दल माहिती दिली. या पेपर कुठवर पाण्याचे काही थेंब टाकताच पाण्यातील फ्लोराईड आणि पेपर किटमधील रसायनांमध्ये रासायनिक प्रक्रिया घडायला सुरूवात होते. यात किटचा रंग लाल किंवा तांबूस होऊन जातो. पाण्यात फ्लोराईडची मात्रा जितकी जास्त तेव्हढ्या अधिक प्रमाणात किटचा रंग गडद व्हायला लागतो. पाण्यातील फ्लोराईडची मात्रा शोधण्याचा हा सर्वात स्वस्त आणि किफायतशीर किट असल्याचे या शास्त्रज्ञाने सांगितले. या किटचे पेटंट घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिवाय, आतापर्यंत दोन खासगी कंपन्यांनी या किटचे व्यावसायिक उत्पादन करून ती बाजारात आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलणी अद्याप सुरू आहेत.१७ राज्यांत फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्यामहाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या आहे. अशा प्रकारचे पाणी प्यायल्याने फ्लोरोसिस नावाचा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. या आजारामुळे दात खराब होतात. शिवाय, शरीरातील हाडे वाकडी झाल्याने अस्थिव्यंगातून कायमचे अपंगत्वाचाही मोठा धोका असतो. आतापर्यंत, पाण्यातील फ्लोराईडची मात्रा मोजण्याची कोणतीच साधी आणि घरच्याघरी वापरता येईल अशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. या पेपर किटमुळे ही अडचण दूर होण्यास मदत मिळणार आहे.>महाराष्ट्रात १५६३ ठिकाणी फ्लोराइडयुक्त पाणीनागपुरसह आसपासच्या विविध जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळून आले. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६४ आणि चंद्रपुरात ७२३ ठिकाणी फ्लोराईडयुक्त पाणी आढळून आले. याशिवाय, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातही अनेक विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्यात हा विषारी घटक आढळून आला आहे.>दरवर्षी हजारो कोटी पडतात खर्चीफ्लोराईडयुक्त पाण्यावर होणाºया खर्चाचा आकडा पाहिला तर या समस्येची तीव्रता तात्काळ ध्यानात येते. अलीकडेच केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार २७ हजार ५४४ गावांतील पाण्यात फ्लोराईड आढळून आले आहे. फ्लोराईडने प्रभावित राज्यांना २०१६-१७ या वर्षात सुमारे चार हजार कोटींचा निधी वितरीत करण्यात आला होता.