शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

तीन सेकंदात घरबसल्या कळणार पाण्यातील फ्लोराईडची मात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 02:23 IST

प्रौद्योगिकी मंत्रालयातील वैज्ञानिकांनी बनविलेल्या विशेष पेपर किटमुळे अवघ्या तीन सेकंदात पाण्यातील फ्लोराईडची मात्रा तपासता येणार आहे, तेही अगदी घरबसल्या.

नितिन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील तब्बल १७ राज्यातील शेकडो नागरिकांना फ्लोराईडयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे अस्थिव्यंगाच्या भयंकर यातनांना सामोरे जावे लागते. पाण्यातील या घातक विषारी द्रव्याची आता त्वरित शहनिशा करणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयातील वैज्ञानिकांनी बनविलेल्या विशेष पेपर किटमुळे अवघ्या तीन सेकंदात पाण्यातील फ्लोराईडची मात्रा तपासता येणार आहे, तेही अगदी घरबसल्या.नॅनो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नॅनो विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्थेच्या शास्त्रज्ञाने 'लोकमत'शी बोलताना या पेपर किटबद्दल माहिती दिली. या पेपर कुठवर पाण्याचे काही थेंब टाकताच पाण्यातील फ्लोराईड आणि पेपर किटमधील रसायनांमध्ये रासायनिक प्रक्रिया घडायला सुरूवात होते. यात किटचा रंग लाल किंवा तांबूस होऊन जातो. पाण्यात फ्लोराईडची मात्रा जितकी जास्त तेव्हढ्या अधिक प्रमाणात किटचा रंग गडद व्हायला लागतो. पाण्यातील फ्लोराईडची मात्रा शोधण्याचा हा सर्वात स्वस्त आणि किफायतशीर किट असल्याचे या शास्त्रज्ञाने सांगितले. या किटचे पेटंट घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिवाय, आतापर्यंत दोन खासगी कंपन्यांनी या किटचे व्यावसायिक उत्पादन करून ती बाजारात आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलणी अद्याप सुरू आहेत.१७ राज्यांत फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्यामहाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या आहे. अशा प्रकारचे पाणी प्यायल्याने फ्लोरोसिस नावाचा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. या आजारामुळे दात खराब होतात. शिवाय, शरीरातील हाडे वाकडी झाल्याने अस्थिव्यंगातून कायमचे अपंगत्वाचाही मोठा धोका असतो. आतापर्यंत, पाण्यातील फ्लोराईडची मात्रा मोजण्याची कोणतीच साधी आणि घरच्याघरी वापरता येईल अशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. या पेपर किटमुळे ही अडचण दूर होण्यास मदत मिळणार आहे.>महाराष्ट्रात १५६३ ठिकाणी फ्लोराइडयुक्त पाणीनागपुरसह आसपासच्या विविध जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळून आले. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६४ आणि चंद्रपुरात ७२३ ठिकाणी फ्लोराईडयुक्त पाणी आढळून आले. याशिवाय, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातही अनेक विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्यात हा विषारी घटक आढळून आला आहे.>दरवर्षी हजारो कोटी पडतात खर्चीफ्लोराईडयुक्त पाण्यावर होणाºया खर्चाचा आकडा पाहिला तर या समस्येची तीव्रता तात्काळ ध्यानात येते. अलीकडेच केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार २७ हजार ५४४ गावांतील पाण्यात फ्लोराईड आढळून आले आहे. फ्लोराईडने प्रभावित राज्यांना २०१६-१७ या वर्षात सुमारे चार हजार कोटींचा निधी वितरीत करण्यात आला होता.