शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश, यांपैकी अल्पसंख्यकांचा खरा सहानुभूतीदार कोण? ओवेसींनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 12:07 IST

ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले, आपण कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुस्लिमांचा सामाजिक आणि शैक्षणिक स्तर बघा. मालदा आणि मुर्शिदाबादमधील मुस्लीम महिलांची बोटे बघा. बिडी तयार करून-करून भाजलेली आहेत.

अल्पसंख्याक समाज आणि यातही मुस्लीम समाजाच्या दृष्टीने देशात चालणारे राजकारण काही नवीन नाही. अल्पसंख्याक समाजाला आकर्षित करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष त्यांना सहनुभूती दाखवत असतात. मात्र, अशा सर्व पक्षांमध्ये खरा सहानुभूतीदार कोण? यासंदर्भात बोलताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी, सर्वच पक्षांनी अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडल्याचे म्हटले आहे.

हैदराबादचे खासदार असदुद्दी ओवेसी यांना टीवी 9 भारतवर्षच्या एका कार्यक्रमात प्रश्न करण्यात आला होता की, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि मायावती यांपैकी अल्पसंख्यकांचा सहानुभूतीदार कोण? यावर ते म्हणाले, सर्वांनीच अल्पसंख्याक समाजाचे मोठे नुकसान केले आहे. कुणी घाबरवून, कुणी हासून, कुणी कवाली म्हणून तर कुणी गोल टोपी घालून आम्हाला लॉलीपॉप दिले. अखिलेश यादव यांना मुस्लिमांची सर्वाधिक मते - ओवैसीअखिलेश यादव यांच्यासंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, उत्तर प्रदेशच्या इतिसाहात मुस्लिमांची जेवढी मते त्यांना मिळाली (2022 मध्ये) तेवढी कुणालाही मिळाली नाहीत. तरीही भाजपला हरवू शकले नाही. आता त्यांच्याच एका आमदाराचा पेट्रोलपंप तोडला जातो, तरी बोलू शकत नाहीत. 

राहुल गांधींवर निशाणा -राहुल गांधींवर निशाणा साधत ओवेसींनी प्रश्न केले की, राहुल गांधी यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री जी.बी.पंत यांच्याच काळात बाबरी मशिदीचा मुद्दा सुरू झाला नाही? आपले वडील पंतप्रधान असतानाच कुलूप उघडले गेले नाही? जेव्हा मशीद पाडली गेली, तेव्हा आपल्याच पक्षाचे पंतप्रधान होते? यांच्याच सरकारच्या  काळात 1986 मध्ये 350 मुस्लीमांना गोळ्या घातल्या गेल्या.

ममतांच्या बंगालमध्ये मुस्लिमांची स्थिती खराब -ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले, आपण कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुस्लिमांचा सामाजिक आणि शैक्षणिक स्तर बघा. मालदा आणि मुर्शिदाबादमधील मुस्लीम महिलांची बोटे बघा. बिडी तयार करून-करून भाजलेली आहेत. मालदा, मुर्शिदाबादच्या भूजलामध्ये आर्सेनिकचे प्रमाण WHO च्या निर्धारित मानकापेक्षा अधिक आहे.

मायावतींबद्दल काय म्हणाले? -मायावतींसंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, ते या तिघांपेक्षा त्यांचा अधिक आदर करतात. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी SC-ST समाजाला एक ओळख आणि राजकीय ताकद दिली. मात्र त्यांनी काही बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली नाही, याचे दुःख आहे. म्हणूनच आज त्या कमकुवत दिसत आहेत. त्या ज्या दिवशी स्पष्ट भूमिका घेईल, त्याना उत्तर प्रदेशात फायदा होईल.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीMuslimमुस्लीम