शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

अम्मांचा आज फैसला

By admin | Updated: May 10, 2015 23:53 IST

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्यासाठी उद्या सोमवारचा दिवस मोठा असणार आहे.

बंगळुरू : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्यासाठी उद्या सोमवारचा दिवस मोठा असणार आहे. सुमारे ६८ कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेला चार वर्षांचा कारावास आणि १०० कोटींच्या दंडांच्या शिक्षेविरुद्ध जयललितांनी दाखल केलेल्या अपिलावर कर्नाटक उच्च न्यायालय सोमवारी निर्णय सुनावणार आहे.न्यायालयाच्या सोमवारच्या निकालाचे तामिळनाडूच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यात उण्यापुऱ्या वर्षभरानंतर विधानसभा निवडणुका होणार असल्याने या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहे.कायद्याच्या जाणकारांच्या मते, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी. आर. कुमारस्वामी यांचे एकलपीठ निर्णय देईल, त्यावेळी ६७ वर्षीय जयललितांना यावेळी न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही. जयललिता यांनी १९९१ मध्ये मुख्यमंत्रिपदावर येण्यापूर्वी तीन कोटींची मालमत्ता जाहीर केली होती. आपल्या सत्ताकाळात त्यांनी दर महिन्याला केवळ १ रुपया मानधन घेतले होते. मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे ६६.६५ कोटींची मालमत्ता असल्याचे उघड झाले होते. १८ सप्टेंबर १९९६ रोजी त्यांच्याविरुद्ध याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता.निकालादिवशी प्रचंड संख्येने अण्णाद्रमुकचे समर्थक बंगळूरू येथे पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या एक किलोमीटर परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू केली आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आली आहे. चेन्नईत अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मंदिरांत पुजाअर्चा केली. जयललिता यांच्या बाजूने निकाल लागावा म्हणून प्रार्थना करण्यात आल्या. तामिळनाडूच्या अन्य भागांतही पक्ष कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. (वृत्तसंस्था)... तर दहा वर्षे निवडणूक बंदीगतवर्षी २७ सप्टेंबरला विशेष न्यायालयाने बेहिशेबी संपत्तीप्रकरणी जयललितांना चार वर्षांचा कारावास व १०० कोटींचा दंड ठोठावला होता. या शिक्षेला जयललिता व अन्य तिघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी सुटका झाल्यास तो जयललितांचा मोठा राजकीय पुनर्प्रवेश ठरेल. याउलट प्रतिकूल निकाल त्यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या राजकीय कारकीर्दीला सुरुंग लावणारा ठरेल. प्रतिकूल निकाल आल्यास लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत १० वर्षे निवडणूक लढण्यास त्यांना बंदी असेल. वरिष्ठ न्यायालयाने शिक्षा रद्द न केल्याच्या स्थितीत दोषसिद्धीच्या तारखेपासून चार वर्षे आणि त्यानंतर सहा वर्षांपर्यंत त्या निवडणूक लढवू शकणार नाहीत.