शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

अम्मांचा आज फैसला

By admin | Updated: May 10, 2015 23:53 IST

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्यासाठी उद्या सोमवारचा दिवस मोठा असणार आहे.

बंगळुरू : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्यासाठी उद्या सोमवारचा दिवस मोठा असणार आहे. सुमारे ६८ कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेला चार वर्षांचा कारावास आणि १०० कोटींच्या दंडांच्या शिक्षेविरुद्ध जयललितांनी दाखल केलेल्या अपिलावर कर्नाटक उच्च न्यायालय सोमवारी निर्णय सुनावणार आहे.न्यायालयाच्या सोमवारच्या निकालाचे तामिळनाडूच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यात उण्यापुऱ्या वर्षभरानंतर विधानसभा निवडणुका होणार असल्याने या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहे.कायद्याच्या जाणकारांच्या मते, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी. आर. कुमारस्वामी यांचे एकलपीठ निर्णय देईल, त्यावेळी ६७ वर्षीय जयललितांना यावेळी न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही. जयललिता यांनी १९९१ मध्ये मुख्यमंत्रिपदावर येण्यापूर्वी तीन कोटींची मालमत्ता जाहीर केली होती. आपल्या सत्ताकाळात त्यांनी दर महिन्याला केवळ १ रुपया मानधन घेतले होते. मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे ६६.६५ कोटींची मालमत्ता असल्याचे उघड झाले होते. १८ सप्टेंबर १९९६ रोजी त्यांच्याविरुद्ध याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता.निकालादिवशी प्रचंड संख्येने अण्णाद्रमुकचे समर्थक बंगळूरू येथे पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या एक किलोमीटर परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू केली आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आली आहे. चेन्नईत अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मंदिरांत पुजाअर्चा केली. जयललिता यांच्या बाजूने निकाल लागावा म्हणून प्रार्थना करण्यात आल्या. तामिळनाडूच्या अन्य भागांतही पक्ष कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. (वृत्तसंस्था)... तर दहा वर्षे निवडणूक बंदीगतवर्षी २७ सप्टेंबरला विशेष न्यायालयाने बेहिशेबी संपत्तीप्रकरणी जयललितांना चार वर्षांचा कारावास व १०० कोटींचा दंड ठोठावला होता. या शिक्षेला जयललिता व अन्य तिघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी सुटका झाल्यास तो जयललितांचा मोठा राजकीय पुनर्प्रवेश ठरेल. याउलट प्रतिकूल निकाल त्यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या राजकीय कारकीर्दीला सुरुंग लावणारा ठरेल. प्रतिकूल निकाल आल्यास लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत १० वर्षे निवडणूक लढण्यास त्यांना बंदी असेल. वरिष्ठ न्यायालयाने शिक्षा रद्द न केल्याच्या स्थितीत दोषसिद्धीच्या तारखेपासून चार वर्षे आणि त्यानंतर सहा वर्षांपर्यंत त्या निवडणूक लढवू शकणार नाहीत.