शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांच्या ताफ्याची गाईला धडक, बीजेडी खासदारानं उडवली खिल्ली

By admin | Updated: July 7, 2017 13:49 IST

गाईवरुन बीजू जनता दलाला (बीजेडी) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांवर निशाणा साधण्याची आयती संधीच मिळाली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भाजपानं गो संरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे.  देशात गो संरक्षणाच्या नावाखाली कथित गो-रक्षकांकडून लोकांना मारहाण करणे,  हत्या करणे यांसारख्या  घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर गाईवरुन बीजू जनता दलाला (बीजेडी) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांवर निशाणा साधण्याची आयती संधीच मिळाली आहे. गुरुवारी ओडिशामध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या ताफ्यातील कारची एका गाईला धडक बसली. या घटनेत गाय जखमी झाली आहे. 
 
यावरुन बीजेडीचे नेते आणि खासदार तथागत सत्पथी यांनी शाह यांना टार्गेट करत म्हटले आहे की, ""अमित शाह यांच्या ताफ्यानं गाईला धडक दिली. ती वाईट पद्धतीनं जखमी झाली आहे. होली काउ"".  अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी भाजपा अध्यक्षांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
 
एका पोलीस अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (12 जुलै ) जजपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 5 वर बंडालो परिसरात ही घटना घडली. या परिसरातील पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक निरंजन सबर यांनी सांगितले की, अमित शाह यांच्या ताफ्यातील एक वाहनाची गाईला धडक बसली. ही गाय रस्ता ओलांडत असताना हा प्रकार घडला. या गाईदेखील जखमी झाली असून गाडीचंही किरकोळ नुकसान झाले आहे. अमित शाह ज्या कारमध्ये होते ती कार ती घटनास्थळावरुन आधीच पुढील मार्गाकडे रवाना झाली होती. 
 
भारतीय जनता पार्टीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ताफ्यात भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार प्रताप सारंगीदेखील होती. ताफ्यातील वाहनानं गाईला धडक दिल्यानंतर काही कार्यकर्त्यांसमवेत ते घटनास्थळी काही काळ थांबले होते. यावेळी जखमी गाईच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली. सारंगी यांनी तातडीनं जजपूरच्या जिल्हाधिका-यांसोबत संपर्क साधत जखमी गाईच्या उपचारांची व्यवस्था करण्यास सांगितले. 
 
सध्या गाईची प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळत आहे. गो संरक्षणाचा मुद्दा उचलून धरणा-या भाजपावर मात्र या घटनेनंतर विरोधकांकडून मिश्लिक टीका केली जात आहे.  
 
आणखी बातम्या वाचा
गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही)
(आसाममध्ये ट्रकमधून गाय घेऊन जाणा-याला बेदम मारहाण)
(‘बीफ’बाबत राष्ट्रीय धोरण स्पष्ट करा - उद्धव ठाकरे)
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतरही त्याचा काहीही परिणाम न झाल्याचेच पाहायला मिळत आहे. गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊ पाहणा-यांना इशारा दिल्यानंतरही देशात अशा प्रकारच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीत. आसाममधील सोनपूरमधील काही लोकांनी ट्रकमधून गाय घेऊन जाणा-या एका व्यक्तीला रस्त्यात रोखलं, इतकंच नाही तर त्याला बेदम मारहाणही केली. 
 
वृत्तसंस्था "एएनआय" दिलेल्या माहितीनुसार, काही जणांनी रस्त्याच्या मधोमध गाय घेऊन जाणारा ट्रक थांबवला व चालकाला मारहाण केली.  या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये दिसत आहे की, रस्त्याशेजारील एका ट्रकमागे काही जण उभे आहेत तर काही जण आत चढून ट्रकची तपासणी करत आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरच एका  व्यक्तीला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली जात आहे. या प्रकरणी आता आसाम पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. 
 
दरम्यान,  29 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मदी यांनी गुजरातमधील साबरमती येथे बोलताना गोरक्षणाच्या नावाखाली होणा-या हिंसेवर तीव्र आक्षेप नोंदवला होता. यावेळी गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा गोरक्षकांना देतानाच महात्मा गांधी व विनोबा भावे यांनी गोरक्षणाचा जो मार्ग दाखवला, त्याच मार्गाने आपण पुढे जायला हवे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. 
 
साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना मोदी म्हणाले होते की, आपण अहिंसेची शिकवण मिळालेल्या देशात आहोत. गांधीजींच्या देशात आपण राहतो. त्यांनी आपला अहिंसेचा मार्ग कसा यशस्वी ठरतो, हे दाखवून दिले आहे. त्यांनी आणि विनोबा भावे यांनी आपल्याला गोरक्षणाचा जो मार्ग दाखवला, तोच आपण आत्मसात करायला हवा. पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसाचाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत हिंसाचाराच्या घटनांबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती.