शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानानंतर शाहांनी गिरिराज सिंहांना फटकारलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 08:17 IST

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गिरिराज सिंह यांना नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानावरून फटकारलं आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गिरिराज सिंह यांना नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानावरून फटकारलं आहे. अमित शाहांनी फोन करून गिरिराज सिंह यांना तंबी दिली आहे. तसेच अशा प्रकारची तक्रार पुन्हा येता कामा नये, असंही बजावलं आहे. गिरिराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी इफ्तार पार्टीत घेतलेल्या सहभागावर ट्विट करत टिपण्णी केली होती. गिरिराज सिंहांच्या त्या ट्विटनंतर बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूमधलं वातावरण गढूळ झालं. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांबरोबर वादविवाद होऊ लागले. या प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही भाष्य केलं आहे.ते म्हणाले, काही लोकांना कायम चर्चेत राहण्याची आवड असते, त्यामुळे ते असं काही तर बरळतात. दुसरीकडे गिरिराज सिंह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो ट्विटवर शेअर केले होते. ज्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपा नेते सुशील मोदी, जीतनराम मांझी, रामविलास पासवान आणि त्यांचा मुलगा चिराग पासवान हे एकत्र इफ्तार पार्टीत दिसत होते. गिरिराज सिंह यांनी ते फोटो ट्विट करत नितीश कुमारांना टार्गेट केलं आहे. ते म्हणाले, नवरात्रीतही असं चित्र पाहायला मिळालं असतं तर ते किती सुंदर दिसलं असतं. आपल्या कर्म-धर्माकडे आपण पाठ का फिरवतो. दिखावा करण्यासाठी सगळं करत असतो. बिहारमधल्या बेगुसराय मतदारसंघातून गिरिराज सिंह निवडून आले आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं असून, त्यांच्याकडे पशुपालन, डेअरी आणि मत्स्य मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपा 40 पैकी 17-17 जागांवर लढली होती. तर सहा जागा लोकजनशक्ती पार्टीला सोडण्यात आल्या होत्या.तर दुसरीकडे इफ्तारविषयी राष्ट्रीय जनता दलाचे नेते रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले की, आम्हाला नितीश कुमार यांचे वावडे (अ‍ॅलर्जी ) नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. तुमचे हे म्हणजे लालूप्रसाद यादव यांना मान्य होईल का, या प्रश्नावर सिंह म्हणाले की, मी आता माझे म्हणणे उघडपणे व्यक्त केले आहे. मी आणि लालुप्रसाद यांनी अनेक वर्षे एकत्र कामही केले आहे. नितीश कुमार यांच्याविषयी मांझी म्हणाले की, त्यांनी मला मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्याने माझे व त्यांचे बिनसले होते. पण त्याला चार वर्षे झाली. या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. माझे नितीश यांच्याशी कायमचे भांडण नाही.वेगळे होण्याची तयारी?केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपने नितीश कुमार यांच्या पक्षाला एकच मंत्रिपद देऊ केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाने मोदी मंत्रिमंडळात न जाण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर नंतर स्वत:च्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भाजपला विश्वासातही घेतले नाही. आता राज्यात स्वत:चा पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने नितीश कुमार यांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ते भाजपपासून दूर जाण्याची चर्चा सुरू आहे.