शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानानंतर शाहांनी गिरिराज सिंहांना फटकारलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 08:17 IST

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गिरिराज सिंह यांना नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानावरून फटकारलं आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गिरिराज सिंह यांना नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानावरून फटकारलं आहे. अमित शाहांनी फोन करून गिरिराज सिंह यांना तंबी दिली आहे. तसेच अशा प्रकारची तक्रार पुन्हा येता कामा नये, असंही बजावलं आहे. गिरिराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी इफ्तार पार्टीत घेतलेल्या सहभागावर ट्विट करत टिपण्णी केली होती. गिरिराज सिंहांच्या त्या ट्विटनंतर बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूमधलं वातावरण गढूळ झालं. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांबरोबर वादविवाद होऊ लागले. या प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही भाष्य केलं आहे.ते म्हणाले, काही लोकांना कायम चर्चेत राहण्याची आवड असते, त्यामुळे ते असं काही तर बरळतात. दुसरीकडे गिरिराज सिंह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो ट्विटवर शेअर केले होते. ज्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपा नेते सुशील मोदी, जीतनराम मांझी, रामविलास पासवान आणि त्यांचा मुलगा चिराग पासवान हे एकत्र इफ्तार पार्टीत दिसत होते. गिरिराज सिंह यांनी ते फोटो ट्विट करत नितीश कुमारांना टार्गेट केलं आहे. ते म्हणाले, नवरात्रीतही असं चित्र पाहायला मिळालं असतं तर ते किती सुंदर दिसलं असतं. आपल्या कर्म-धर्माकडे आपण पाठ का फिरवतो. दिखावा करण्यासाठी सगळं करत असतो. बिहारमधल्या बेगुसराय मतदारसंघातून गिरिराज सिंह निवडून आले आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं असून, त्यांच्याकडे पशुपालन, डेअरी आणि मत्स्य मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपा 40 पैकी 17-17 जागांवर लढली होती. तर सहा जागा लोकजनशक्ती पार्टीला सोडण्यात आल्या होत्या.तर दुसरीकडे इफ्तारविषयी राष्ट्रीय जनता दलाचे नेते रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले की, आम्हाला नितीश कुमार यांचे वावडे (अ‍ॅलर्जी ) नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. तुमचे हे म्हणजे लालूप्रसाद यादव यांना मान्य होईल का, या प्रश्नावर सिंह म्हणाले की, मी आता माझे म्हणणे उघडपणे व्यक्त केले आहे. मी आणि लालुप्रसाद यांनी अनेक वर्षे एकत्र कामही केले आहे. नितीश कुमार यांच्याविषयी मांझी म्हणाले की, त्यांनी मला मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्याने माझे व त्यांचे बिनसले होते. पण त्याला चार वर्षे झाली. या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. माझे नितीश यांच्याशी कायमचे भांडण नाही.वेगळे होण्याची तयारी?केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपने नितीश कुमार यांच्या पक्षाला एकच मंत्रिपद देऊ केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाने मोदी मंत्रिमंडळात न जाण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर नंतर स्वत:च्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भाजपला विश्वासातही घेतले नाही. आता राज्यात स्वत:चा पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने नितीश कुमार यांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ते भाजपपासून दूर जाण्याची चर्चा सुरू आहे.