शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर अमेरिकेची रिअ‍ॅक्शन, मोदींच्या परराष्ट्र धोरणावर साधला होता निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 10:25 IST

"1963 मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीरपणे शक्सगाम खोरे चीनला देवून टाकले. एवढेच नाही तर चीनने 1970 च्या दशकात पीओकेमधून काराकोरम हायवे बनवला होता. 1970 पासून दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ अण्वस्त्र सहकार्य होते. 2013 मध्ये चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरू झाला."

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला आणि अनेक गंभीर आरोप केले. यावेळी राहुल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अप्रभावी धोरणांमुळे चीन आणि पाकिस्तान पूर्वीच्या तुलनेत अधिक जवळ आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट स्पोक्स नेड प्राइस म्हणाले, ''मी ते पाकिस्तानी आणि पीआरसीवर त्यांच्या संबंधांसंदर्भात बोलण्यासाठी सोडेन. मी नक्कीच त्या टिप्पण्यांचे समर्थन करणार नाही.''

राहुल गांधींच्या आरोपांवर जयशंकर यांचाही पलटवार -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारवर केलेल्या आरोपांना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिले. परराष्ट्र मंत्री ट्विट करत म्हणाले, "राहुल गांधी लोकसभेत बोलताना म्हणाले, सध्या प्रजासत्ताक दिनी आपल्याला परदेशी पाहुणा मिळू शकत नाही. देशातील जनतेला हे माहित आहे की, आपण कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना करत आहोत. पाच मध्य आशियाई देशांचे राष्ट्रपती आपल्या देशात येणार होते. परंतु कोरोना संकटामुळे त्यांनी 27 जानेवारी रोजी व्हर्च्युअल माध्यमाने शिखर परिषदेला हजेरी लावली. लोकसभेत राहुल गांधी या गोष्टी विसरले का?

जयशंकर पुढे म्हणाले, राहुल गांधी यांनी लोकसभेत आरोप केला की, या सरकारने पाकिस्तान आणि चीनला एकत्र आणण्याचे काम केले. काँग्रेस नेत्याला (राहुल गांधींना) या घटना माहीत असायला हव्यात की, 1963 मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीरपणे शक्सगाम खोरे चीनला देवून टाकले. एवढेच नाही तर चीनने 1970 च्या दशकात पीओकेमधून काराकोरम हायवे बनवला होता. चीन आणि पाकिस्तानची मैत्री काही नवीन नाही. 1970 पासून दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ अण्वस्त्र सहकार्य होते. 2013 मध्ये चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरू झाला. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वतःलाच विचारायला हवे की, तेव्हा चीन आणि पाकिस्तान दूर होते? असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका