शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर अमेरिकेची रिअ‍ॅक्शन, मोदींच्या परराष्ट्र धोरणावर साधला होता निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 10:25 IST

"1963 मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीरपणे शक्सगाम खोरे चीनला देवून टाकले. एवढेच नाही तर चीनने 1970 च्या दशकात पीओकेमधून काराकोरम हायवे बनवला होता. 1970 पासून दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ अण्वस्त्र सहकार्य होते. 2013 मध्ये चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरू झाला."

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला आणि अनेक गंभीर आरोप केले. यावेळी राहुल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अप्रभावी धोरणांमुळे चीन आणि पाकिस्तान पूर्वीच्या तुलनेत अधिक जवळ आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट स्पोक्स नेड प्राइस म्हणाले, ''मी ते पाकिस्तानी आणि पीआरसीवर त्यांच्या संबंधांसंदर्भात बोलण्यासाठी सोडेन. मी नक्कीच त्या टिप्पण्यांचे समर्थन करणार नाही.''

राहुल गांधींच्या आरोपांवर जयशंकर यांचाही पलटवार -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारवर केलेल्या आरोपांना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिले. परराष्ट्र मंत्री ट्विट करत म्हणाले, "राहुल गांधी लोकसभेत बोलताना म्हणाले, सध्या प्रजासत्ताक दिनी आपल्याला परदेशी पाहुणा मिळू शकत नाही. देशातील जनतेला हे माहित आहे की, आपण कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना करत आहोत. पाच मध्य आशियाई देशांचे राष्ट्रपती आपल्या देशात येणार होते. परंतु कोरोना संकटामुळे त्यांनी 27 जानेवारी रोजी व्हर्च्युअल माध्यमाने शिखर परिषदेला हजेरी लावली. लोकसभेत राहुल गांधी या गोष्टी विसरले का?

जयशंकर पुढे म्हणाले, राहुल गांधी यांनी लोकसभेत आरोप केला की, या सरकारने पाकिस्तान आणि चीनला एकत्र आणण्याचे काम केले. काँग्रेस नेत्याला (राहुल गांधींना) या घटना माहीत असायला हव्यात की, 1963 मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीरपणे शक्सगाम खोरे चीनला देवून टाकले. एवढेच नाही तर चीनने 1970 च्या दशकात पीओकेमधून काराकोरम हायवे बनवला होता. चीन आणि पाकिस्तानची मैत्री काही नवीन नाही. 1970 पासून दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ अण्वस्त्र सहकार्य होते. 2013 मध्ये चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरू झाला. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वतःलाच विचारायला हवे की, तेव्हा चीन आणि पाकिस्तान दूर होते? असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका