शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

"अमेरिकेचा शोध कोलंबसने नाही, भारतीय व्यक्तीने लावला", उच्च शिक्षण मंत्र्याचा जावईशोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 11:25 IST

Inder Singh Parmar Vasco da Gama : मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांनी अमेरिका आणि भारताच्या शोधाबद्दल नवा जावाईशोध लावला. अमेरिकेचा शोध भारतीय व्यक्तीने लावला होता, असा दावा त्यांनी केला.

Inder Singh Parmar Statement : अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला, तर भारताचा सोध वास्को द गामाने लावला, असे इतिहास सांगतो. पण, मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांनी नवा जावईशोध लावत वेगळेच दावे केले आहेत. वास्को द गामा चंदन नावाच्या भारतीय व्यापाऱ्याचे मागे मागे आलेला, असे ते म्हणाले. त्याचबरोबर अमेरिकेचा शोध भारतीय व्यक्तीने लावला होता, असा दावाही त्यांनी केला. महत्त्वाचे म्हणजे हे सगळे दावे त्यांनी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात केले. 

मध्य प्रदेशातील बरकतउल्ला विद्यापाठीचा पदवी प्रदान समारंभ राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमारही उपस्थित होते. 

इंदर सिंह परमार यांनी विद्यार्थ्यांना कोणता इतिहास सांगितला?

अमेरिकेच्या शोधाबद्दल बोलताना इंदर सिंह परमान म्हणाले, "एक भारतीय नावाडी ८व्य शतकात अमेरिकेत गेला होता. आणि सॅन डिएगोमध्ये त्याने मंदिरे बांधली. हे सगळे तिथल्या संग्रहालयांमध्ये लिहिलेले आहे. जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांची संस्कृती माया संस्कृतीनुसार विकसित करण्यास मदत केली." 

"माया संस्कृती भारताचा विचार आणि सभ्यतेची पद्धत आहे. त्याबद्दल भारतीय विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. जर काही शिकण्याची गरज असेल, तर ते म्हणजे योग्य पद्धतीने शिकवले गेले पाहिजे की, आपल्या पूर्वजांनी अमेरिकेचा शोध लावला होता, कोलंबसने नाही", असे इंदर सिंह परमार म्हणाले. 

"भारताचा शोध वास्को द गामाने लावला नाही" 

इंदर सिंह परमार पुढे असेही म्हणाले की, "पोर्तुगालच्या वास्को द गामाने भारताचा शोध लावला नाही. वास्को द गामा चंदन नावाच्या भारतीय व्यापाऱ्याच्या मागे मागे आलेला. व्यापारी चंदन याचे जहाज वास्को द गामाच्या जहाजापेक्षा चारपट मोठे होते. पण, इतिहासकारांनी भारतीयांना चुकीचा इतिहास सांगितला की, वास्को द गामाने भारताचा शोध लावला."

बीजिंग शहराचे डिझाईन भारतीय आर्किटेक्टने केले

इंदर सिंह परमार यांनी बीजिंग शहर वसवण्याबद्दलचाही वेगळा इतिहास सांगितला. परमार म्हणाले, "12 व्या शतकात जेव्हा बीजिंग शहर वसले. तेव्हा त्याचे डिझाईन आणि आर्किटेक्चर एका नेपाळी व्यक्तीने तयार केले. त्यावेळी नेपाळ भारताचा भाग होता", असेही ते म्हणाले.