शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ दहशतवादी हल्ला - जखमींना एअरलिफ्ट करुन आणणार दिल्लीत

By admin | Updated: July 11, 2017 08:19 IST

अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या 32 यात्रेकरुंना एअरलिफ्ट करुन दिल्लीला आणण्यात येणार आहे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 11 - अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या 32 यात्रेकरुंना एअरलिफ्ट करुन दिल्लीला आणण्यात येणार आहे. याशिवाय अमरनाथ यात्रेच्या  वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नसून आधीप्रमाणे सुरु राहणार आहे. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारी रात्री अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 32 जण जखमी झाले आहेत. जखमींना एअरलिफ्ट केलं जाईल असं निर्मल सिंह यांनी सांगितलं आहे. 
 
संबंधित बातम्या
अमरनाथ यात्रेवर हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध
अमरनाथ हल्ला: पहिली घोडचूक, भाविकांच्या बसचं रजिस्ट्रेशन नव्हतं
 
 
उपमुख्यमंत्री निर्मल सिंह बोलले आहेत की, "जखमींना रात्रीच श्रीनगरला शिफ्ट करण्यात आलं आहे. यानंतर सकाळी बीएसएफच्या विशेष विमानाने त्यांना दिल्लीला पाठवण्यात येईल. जखमींसोबत मृतदेहही पाठवण्यात येणार आहेत". 2000 नंतर अमरनाथ यात्रेवर झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता. दहशतवाद्यांनी गुजरातहून आलेल्या एका बसवर निशाणा साधला, ज्यामध्ये बसमधील सहा महिलांसहित सात जणांचा मृत्यू झाला. जखमींना धोका नसल्याची माहिती निर्मल सिंह यांनी मेहबुबा मुफ्तींना दिली आहे. विभागीय आयुक्त मनदीप भंडारी यांनी सांगितलं आहे की, "यात्रेत कोणतीही अडचण येणार नाही. ठरल्याप्रमाणे मंगळवारी यात्रा सुरु राहणार आहे". 
 
मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दहशतवादी हल्ल्यावर बोलताना हा सर्व मुस्लिम आण काश्मिरींवर एक डाग असल्याचं म्हटलं आहे. अनंतनाग येथे रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यावर त्यांनी या घटनेमुळे काश्मिरींची मान शरमेने खाली झुकली असल्याचं सांगितलं आहे. "इतक्या अडचणी असतानाही यात्रेकरु दरवर्षी काश्मीरमध्ये येतात. आज सात लोकांचा मृत्यू झाला आहे. माझ्याकडे याचा निषेध करण्याशिवाय दुसरं काही नाही. सुरक्षा जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस कट रचणा-यांना अटक करुन कारवाई करतील अशी अपेक्षा आहे", असं मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत. "ही घटना सर्व काश्मिरी आणि मुस्लिमांवर एक डाग आहे. आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही", असंही त्यांनी सांगितलं आहे. 
 
जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद 
दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनंतनाग जिल्ह्याच्या एसपी कंट्रोल रुमकडून सूचना देण्यात आल्यानंतर जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.