शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

अमरनाथ दहशतवादी हल्ला - जखमींना एअरलिफ्ट करुन आणणार दिल्लीत

By admin | Updated: July 11, 2017 08:19 IST

अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या 32 यात्रेकरुंना एअरलिफ्ट करुन दिल्लीला आणण्यात येणार आहे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 11 - अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या 32 यात्रेकरुंना एअरलिफ्ट करुन दिल्लीला आणण्यात येणार आहे. याशिवाय अमरनाथ यात्रेच्या  वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नसून आधीप्रमाणे सुरु राहणार आहे. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारी रात्री अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 32 जण जखमी झाले आहेत. जखमींना एअरलिफ्ट केलं जाईल असं निर्मल सिंह यांनी सांगितलं आहे. 
 
संबंधित बातम्या
अमरनाथ यात्रेवर हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध
अमरनाथ हल्ला: पहिली घोडचूक, भाविकांच्या बसचं रजिस्ट्रेशन नव्हतं
 
 
उपमुख्यमंत्री निर्मल सिंह बोलले आहेत की, "जखमींना रात्रीच श्रीनगरला शिफ्ट करण्यात आलं आहे. यानंतर सकाळी बीएसएफच्या विशेष विमानाने त्यांना दिल्लीला पाठवण्यात येईल. जखमींसोबत मृतदेहही पाठवण्यात येणार आहेत". 2000 नंतर अमरनाथ यात्रेवर झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता. दहशतवाद्यांनी गुजरातहून आलेल्या एका बसवर निशाणा साधला, ज्यामध्ये बसमधील सहा महिलांसहित सात जणांचा मृत्यू झाला. जखमींना धोका नसल्याची माहिती निर्मल सिंह यांनी मेहबुबा मुफ्तींना दिली आहे. विभागीय आयुक्त मनदीप भंडारी यांनी सांगितलं आहे की, "यात्रेत कोणतीही अडचण येणार नाही. ठरल्याप्रमाणे मंगळवारी यात्रा सुरु राहणार आहे". 
 
मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दहशतवादी हल्ल्यावर बोलताना हा सर्व मुस्लिम आण काश्मिरींवर एक डाग असल्याचं म्हटलं आहे. अनंतनाग येथे रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यावर त्यांनी या घटनेमुळे काश्मिरींची मान शरमेने खाली झुकली असल्याचं सांगितलं आहे. "इतक्या अडचणी असतानाही यात्रेकरु दरवर्षी काश्मीरमध्ये येतात. आज सात लोकांचा मृत्यू झाला आहे. माझ्याकडे याचा निषेध करण्याशिवाय दुसरं काही नाही. सुरक्षा जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस कट रचणा-यांना अटक करुन कारवाई करतील अशी अपेक्षा आहे", असं मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत. "ही घटना सर्व काश्मिरी आणि मुस्लिमांवर एक डाग आहे. आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही", असंही त्यांनी सांगितलं आहे. 
 
जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद 
दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनंतनाग जिल्ह्याच्या एसपी कंट्रोल रुमकडून सूचना देण्यात आल्यानंतर जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.