नवी दिल्ली : नौदलाने एका खास निर्णयाअंतर्गत ताज्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पाच नौदल कर्मचार्यांच्या विधवांना संरक्षण अधिकारी बनण्याची परवानगी दिली आहे़ दोन पाणबुड्यांवरील दुर्घटनेत नौदलाने आपले २१ कर्मचारी गमावले आहेत़ यापैकी १७ कर्मचार्यांच्या कुटुंबांनी नौदलाकडे नोकरीसाठी मदत मागितली आहे़ एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर अधिकारी व नाविकांच्या पाच विधवांना अधिकारी बनण्यासाठी अनेक नियम शिथिल केले गेले. निवड प्रक्रियेत उपस्थित होण्यापासून अनेक श्रेणींमध्ये त्यांना सूट दिली गेली आहे़ मुंबईतील निर्माणाधीन युद्धनौका आयएनएस कोलकातावर झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कमांडर कुंतल वाधवा यांची पत्नी सेवा निवड मंडळ आणि आरोग्य चाचणीत यशस्वी ठरली आहे व लवकरच नौदलात दाखल होणार आहेत़ अधिकारी बनण्यास पात्र नसणार्यांना गु्रप बी व ग्रुप सी पदांमध्ये ‘सिव्हिलियन एम्प्लॉई’ म्हणून नोकरी देण्यात येणार आहे़
(लोकमत न्यूज नेटवर्क)