शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नवीन संसदेचे उद्घाटन करण्यावरून आरोप; राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे : राहुल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 05:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. त्याला राहुल गांधींसह विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करावे, पंतप्रधानांनी नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विटर हँडलवर लिहिले आहे.

सर्व विरोधी पक्ष आणि काँग्रेसने नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या तारखेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने म्हटले की, २८ मे ही हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे, त्यामुळे या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणे हा राष्ट्रनिर्मात्यांचा अपमान आहे.

१८ मे रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांना नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले होते. मात्र, त्यानंतर विरोधकांनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा सचिवालयाने संसद भवनावर तयार केलेल्या पुस्तिकेनुसार, नवीन संसद भवनाच्या लोकसभेच्या कक्षेत ८८८ सदस्यांची आसनव्यवस्था असेल आणि राज्यसभेत ३८४ सदस्य बसू शकतील. संयुक्त अधिवेशनादरम्यान सभागृहात १,२७२ सदस्यांची बसण्याची व्यवस्था असेल. पंतप्रधानांनी १० डिसेंबर २०२० रोजी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली होती.

संसदेची नवी इमारत पंतप्रधान मोदींचा ‘वैयक्तिक व्हॅनिटी प्रोजेक्ट’ आहे. २८ मे रोजी ते उद्घाटन करणार असलेल्या नवीन संसदेच्या इमारतीचे एकमेव आर्किटेक्ट, डिझायनर आणि कार्यकर्ता हे मोदीच आहेत. आमच्या सर्व राष्ट्रनिर्मात्यांचा अनादर आहे. गांधी, नेहरू, पटेल, बोस इत्यादींना पूर्णपणे नाकारले आहे. डॉ. आंबेडकरांचा तीव्र अपमान करण्यात येत आहे.- जयराम रमेश, काँग्रेसचे सरचिटणीस 

टॅग्स :ParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधी